शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या खासदारांची केंद्राकडे १५ कोटींची उधारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:18 IST

जळगाव : खासदार दत्तक गाव योजनेंतर्गत जिल्ह्यातील खासदारांनी गावे दत्तक घेतली, तेथे कामे झाली खरी मात्र यासाठीचा तब्बल १५ ...

जळगाव : खासदार दत्तक गाव योजनेंतर्गत जिल्ह्यातील खासदारांनी गावे दत्तक घेतली, तेथे कामे झाली खरी मात्र यासाठीचा तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडे थकला आहे. यात खासदार रक्षा खडसे यांच्यासह माजी खासदार ए.टी. पाटील व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या निधीचा समावेश आहे.

२०१४ मध्ये खासदार दत्तक गाव योजना राबवून खासदारांनी त्या गावांमध्ये विकास कामे करावी, असा निर्णय झाला. यामध्ये एकेका खासदारांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला. २०१४ ते २०१९ या पंचवार्षिकमध्ये खासदार रक्षा खडसे व तत्कालीन खासदार ए.टी. पाटील यांनी गावे दत्तक घेत, तेथे कामे प्रस्तावित केली. या कामांना मान्यता मिळून खासदार रक्षा खडसे यांनी दत्तक घेतलेल्या खिर्डी, ता.रावेर व ए.टी. पाटील यांनी दत्तक घेतलेल्या लोहटार, ता.पाचोरा येथे ही कामे झाली. मात्र, दोन्ही खासदारांचा कार्यकाळ संपत आला असताना, झालेल्या कामांपैकी दोघही खासदारांचा प्रत्येकी केवळ अडीच कोटी रुपयांचा निधी आला. मात्र, यामध्ये दोघांनी दत्तक घेतलेल्या गावांमध्ये प्रत्येकी पाच कोटी रुपयांची कामे झाली होती. यापैकी केवळ अडीच-अडीच कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, दोघांचे मिळून एकूण पाच कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणे बाकी आहे.

गेल्या वर्षाचाही निधी अडकला

२०१४मधील निधी अडकलेला असताना, आता पुन्हा २०१९-२० या आर्थिक वर्षात खासदार रक्षा खडसे यांनी चांगदेव, ता. मुक्ताईनगर व खासदार उन्मेष पाटील यांनी सांगवी, ता.चाळीसगाव या दत्तक घेतलेल्या गावांमध्ये प्रत्येकी पाच कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानुसार, ही कामेही झाली. मात्र, यासाठी केवळ प्रत्येकी अडीच कोटी रुपयेच निधी आला. २०१९-२० हे आर्थिक वर्ष संपत असतानाच कोरोनाचा संसर्ग पसरला व सर्वच निधी मिळणे बंद झाला. त्यात दोघंही खासदारांचे प्रत्येकी अडीच कोटी निधी मिळणे बाकी आहे.

यंदाचे पाच कोटी आलेच नाही

योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी खासदार रक्षा खडसे यांच्या निधीतून भुसावळ तालुक्यातील तळवेल गावाची निवड करण्यात आली. मात्र, हे आर्थिक वर्ष संपत आले, तरी त्यांचा पाच कोटींचा निधी आलाच नाही. खासदार उन्मेष पाटील यांच्या निधीतून या वर्षात गाव प्रस्तावित नव्हते.