शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या बाजारपेठेत तीन आठवड्यांपासून धान्य, डाळींमध्ये तेजी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:40 IST

धान्य खरेदीसाठी गर्दी

विजयकुमार सैतवालजळगाव - जळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी गर्दी कायम असून गव्हासह सर्वच डाळींना मागणी वाढत असल्याने गेल्या तीन आठवड्यांपासून तेजी सुरूच आहे. सध्या वर्षभरासाठीच्या धान्य खरेदीसह डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कमी पावसामुळे शेती मालाची आवक घटून सुरुवातीपासूनच त्यांचे भाव वाढण्यास सुरुवात झाली होती. त्यात लोकसभा निवडणुकीमुळे बाजारपेठेवर सरकारचे नियंत्रण नसल्याने भाववाढ होण्यास मदत होत आहे. गव्हामध्ये दर आठवड्याला तेजी येत असल्याने ग्राहकांची चिंता वाढली आहे. दोन आठवड्यांपासून भाववाढ होणाऱ्या तांदळाचे भाव या आठवड्यात स्थिर राहिल्याने तेवढा ग्राहकांना दिलासा मिळाला.कमी पावसामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊन कडधान्याची आवक कमी असल्याने डाळीवर परिणाम झाला व सुरुवातीपासूनच डाळींचे भाव वाढू लागले. त्यात कडधान्याच्या आयातीच्या प्रमाणावर निर्बंध येण्यासह वायदे बाजाराची चलती असल्याने डाळींचे भाव आणखी वाढत असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.गेल्या आठवड्यात ८००० ते ८५०० रुपये प्रती क्विंटल असलेली मुगाची डाळ या आठवड्यात ८४०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटल झाली आहे. उडीदाच्या डाळीचेही भावदेखील ६००० ते ६५०० रुपये प्रती क्विंटलवरून ६२०० ते ७००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ६१०० ते ६५०० रुपये प्रती क्विंटल झाले आहे. तसेच तूरडाळीचेदेखील भाव ८५०० ते ८८०० रुपये प्रती क्विंटलवरुन ८९०० ते ९४०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत.गव्हातही तेजीवर्षभरासाठी धान्य खरेदी अद्यापही कायम असून ती १५ जूनपर्यंत अशीच राहणार असल्याने गव्हाला मागणी वाढून तीन आठवड्यापासून गव्हाचे भाव वाढत आहे. या आठवड्यात तर गव्हाची आवक कमी झाल्याने भाववाढीस मदत होत आहे. २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या १४७ गव्हाचे भाव २३५० ते २४५० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. अशाच प्रकारे लोकवन गव्हाचे भावदेखील २२५० ते २३०० रुपये प्रती क्विंटलवरून २३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलवर तर चंदोसीचे भाव ३८०० ते ४००० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. या सोबतच शरबती गव्हाचे भाव २४०० ते २५०० रुपये प्रती क्विंटलवर पोहचले आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू असून तिचे प्रमाण कमी झाले आहे.तांदुळाचे भाव स्थिरतांदुळाची आवक नसल्याने व मागणी कायम असल्याने गेल्या दोन आठवड्यापासून तांदळाच्या भावातही वाढ झाली होती. मात्र या आठवड्यात हे भाव स्थिर आहे. यात चिनोर ३२०० ते ३६०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४२०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४८०० ते ५००० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २७०० ते २८०० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती ९००० ते १ हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव