शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात पावसाची पन्नाशीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 12:48 IST

दमदार पावसाने जिल्हा आबादानी

जळगाव : जिल्हाभरात जामनेरवर यंदा वरूणराजाची कृपादृष्टी असून सततच्या पावसामुळे जामनेरात पावसाच्या टक्केवारीने शतकाकडे वाटचाल केली आहे़ जामनेरात आजपर्यंत ६५ टक्क््यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़ दरम्यान, श्रावण महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने दमदार हजेरी दिल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे़ जिल्ह्यात ४७.४ टक्के पाऊस झाला असून पावसाळ््याच्या दोन महिन्यात पन्नाशीकडे वाटचालीमुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.यंदा सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते़ मात्र, पावासाने हळूहळू हजेरी लावत जुलै अखेर पर्यंत हे चिंतेचे ढग दूर केले़ गेल्या वर्षी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २८ टक्के पावसाची नोंद झाली होती, त्यात यंदा १९ टक्क््यांची वाढ होऊन ४७.४ टक्के पाऊस झाला आहे़ जिल्हाभरात जामनेर खालोखाल पाचोऱ्यात ३७० मिमि पाऊस झाला आहे़ सततच्या पावसांमुळे धरणांच्या साठयातही वाढ होत आहे़गिरणा धरणाचा पाणीसाठा ११ टक्क्यांवर तर वाघूर धरणात २७ टक्के पाणीसाठा झाला आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला असून शेतीचे चक्र सुस्थितीत आले आहे़सात तालुक्यात तीनशे पारजिल्हाभरात एरंडोल, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा या तालुक्यांमध्ये पावसाने तीनशेचा आकडा पार केला आहे़ या सात तालुक्यांमध्ये ३०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे तर जळगावसह सात तालुक्यांमध्ये २५० ते ३०० मिमिच्या आत पावसाची नोंद झाली आहे़ अमळेनर तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे, काही तालुक्यात दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे़ जळगाव शहरात दुपारी झालेल्या पावसाने रस्ते जलमय झाले होते़ सर्वत्र पाणी साचले होते़जामनेर तालुक्यात टंचाई दूर, अमळनेरात सर्वात कमीजामनेर तालुक्यात शनिवारी ३६ मिमीच्या अधिक पावसाची नोंद झाली़ आजपर्यंत सर्वाधिक ४७० मिमी पाऊस जामनेरमध्ये झाला आहे़ त्यामुळे जामनेरवरील टंचाईचे ढग दूर होण्यास मदत झाली आहे़ यंदा सर्वाधिक जामनेर तालुक्यात टँकर सुरू होते़ अशा स्थितीत या पावसामुळे दिलासा मिळाला आहे़ दुसरीकडे अमळनेरात २१८ मिमी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे़शेतीची कामे रखडली...पावसामुळे अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे. मात्र सतत सुरु असलेल्या पावसामुळे वाफसा नसल्याने निंदणी करता येत नाही. शनिवारी सकाळी काही वेळ उघडीप होती त्यावेळी शेतांमध्ये निंदणी सुरु झाली. पाऊस सुरु झाल्याने ही कामे आता रखडली आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव