शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जळगाव जिल्ह्यात पावसाची पन्नाशीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 12:48 IST

दमदार पावसाने जिल्हा आबादानी

जळगाव : जिल्हाभरात जामनेरवर यंदा वरूणराजाची कृपादृष्टी असून सततच्या पावसामुळे जामनेरात पावसाच्या टक्केवारीने शतकाकडे वाटचाल केली आहे़ जामनेरात आजपर्यंत ६५ टक्क््यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़ दरम्यान, श्रावण महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने दमदार हजेरी दिल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे़ जिल्ह्यात ४७.४ टक्के पाऊस झाला असून पावसाळ््याच्या दोन महिन्यात पन्नाशीकडे वाटचालीमुळे सर्वांनाच दिलासा मिळाला आहे.यंदा सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते़ मात्र, पावासाने हळूहळू हजेरी लावत जुलै अखेर पर्यंत हे चिंतेचे ढग दूर केले़ गेल्या वर्षी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत २८ टक्के पावसाची नोंद झाली होती, त्यात यंदा १९ टक्क््यांची वाढ होऊन ४७.४ टक्के पाऊस झाला आहे़ जिल्हाभरात जामनेर खालोखाल पाचोऱ्यात ३७० मिमि पाऊस झाला आहे़ सततच्या पावसांमुळे धरणांच्या साठयातही वाढ होत आहे़गिरणा धरणाचा पाणीसाठा ११ टक्क्यांवर तर वाघूर धरणात २७ टक्के पाणीसाठा झाला आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला असून शेतीचे चक्र सुस्थितीत आले आहे़सात तालुक्यात तीनशे पारजिल्हाभरात एरंडोल, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा या तालुक्यांमध्ये पावसाने तीनशेचा आकडा पार केला आहे़ या सात तालुक्यांमध्ये ३०० मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे तर जळगावसह सात तालुक्यांमध्ये २५० ते ३०० मिमिच्या आत पावसाची नोंद झाली आहे़ अमळेनर तालुक्यात यंदा पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे, काही तालुक्यात दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे़ जळगाव शहरात दुपारी झालेल्या पावसाने रस्ते जलमय झाले होते़ सर्वत्र पाणी साचले होते़जामनेर तालुक्यात टंचाई दूर, अमळनेरात सर्वात कमीजामनेर तालुक्यात शनिवारी ३६ मिमीच्या अधिक पावसाची नोंद झाली़ आजपर्यंत सर्वाधिक ४७० मिमी पाऊस जामनेरमध्ये झाला आहे़ त्यामुळे जामनेरवरील टंचाईचे ढग दूर होण्यास मदत झाली आहे़ यंदा सर्वाधिक जामनेर तालुक्यात टँकर सुरू होते़ अशा स्थितीत या पावसामुळे दिलासा मिळाला आहे़ दुसरीकडे अमळनेरात २१८ मिमी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे़शेतीची कामे रखडली...पावसामुळे अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले आहे. मात्र सतत सुरु असलेल्या पावसामुळे वाफसा नसल्याने निंदणी करता येत नाही. शनिवारी सकाळी काही वेळ उघडीप होती त्यावेळी शेतांमध्ये निंदणी सुरु झाली. पाऊस सुरु झाल्याने ही कामे आता रखडली आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव