शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जळगाव जिल्ह्यात जलयुक्त शिवार टप्पा दोनची १२५ कामे राहणार अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 10:38 IST

जलयुक्त शिवारचा घोळ: निधी वितरीत होऊनही यंत्रणेचे दूर्लक्ष

ठळक मुद्देशिल्लक कामांमध्ये एरंडोल कृषी विभाग, जि.प. लघुसिंचन विभाग आघाडीवर दुसऱ्या टप्प्यातील १४६ कोटींच्या निधीपैकी ९७ कोटीच खर्चटप्पा ३च्या ६५९ कामांना प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी

जळगाव: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१६-१७ मधील टप्पा दोनची शिल्लक कामे मुदतवाढ मिळाल्याने मार्च २०१८ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे आवश्यक असताना त्यापैकी १२५ अद्यापही अपूर्णच आहेत. त्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत ५९ तर जि.प. लघुसिंचन विभागांतर्गत ५२ कामांचा समावेश आहे. कृषी विभागातील प्रलंबित कामांमध्ये सर्वाधिक ४९ कामे एरंडोल तालुक्यातील आहेत. तसेच नियोजनानुसार टप्पा ३ची कामे देखील मे २०१८ अखेर पूर्ण करावयाची असल्याने त्यांच्या प्रशासकीय मान्यता मार्च अखेर पूर्ण होणे अपेक्षित असताना मंजुर आराखड्यातील ४२७१ कामांपैकी अद्यापही ६५९ कामांना प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे. त्यामुळे या टप्प्याचे कामही लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.शासनाने पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्याच्या उद्देशाने जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २०१५-१६ मध्ये २३२ गावांमध्ये ही योजना राबविण्यात आली. तर दुसरा टप्पा २०१६-१७ या वर्षात राबविण्यासाठी २२२ गावांची निवड करण्यात आली. तिसºया टप्प्यात २०१७-१८ मध्ये २०६ गावांची निवड या अभियानांतर्गत करण्यात आली. तर आता चौथ्या टप्प्यासाठी २०१८-१९ साठी १६० गावांची निवड करण्यात आली आहे. मात्र अद्यापही टप्पा २ची कामेच अपूर्ण असल्याने योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दुसºया टप्प्यातील १४६ पैकी ९७ कोटीच खर्चदुसºया टप्प्यात मंजूर आरखड्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या अंतर्गत १९३३ कामे, कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग जि.प. यांच्या अंतर्गत ५५२, वरिष्ठ भूवैज्ञानिक ४७२, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.प. विभाग (जि.प.) १२३३ कामे, कार्यकारी अभियंता जलसंधारण (स्थानिकस्तर) २५४ कामे, वनविभाग ४१२ अशा ४८५६ कामे प्रस्तावित होती. त्यासाठी १४६ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर होता. ही कामे मार्च २०१७ अखेरच पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र मोठ्या संख्येने कामे निधीची अडचण नसतानाही अपूर्ण राहिल्याने ही कामे मार्च २०१८ पर्यंत पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतरही तब्बल १२५ कामे मार्च महिना संपण्यास दोन आठवडेच शिल्लक असतानाही अपूर्ण आहेत. मंजूर १४६ कोटींच्या निधीपैकी केवळ ९७ कोटींचा निधीच आतापर्यंत या कामांवर खर्च झाला आहे. उर्वरीत निधी मार्चअखेर खर्च न झाल्यास परत जाणार आहे. कामे अपूर्ण असलेल्या विभागांमध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ५९, कार्यकारी अभियंता लघुसिंचन विभाग जि.प. यांच्या अंतर्गत ५२,कार्यकारी अभियंता जलसंधारण (स्थानिकस्तर) १४ यांच्या कामांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या प्रलंबित कामांपैकी एरंडोल विभागाकडील १२८ कामांपैकी ४९ कामे प्रलंबित आहेत. काही कामे सुरूच झालेली नाहीत. एरंडोल विभागातील कृषी विभागाच्या अधिकाºयांना वरिष्ठांकडून वारंवार सूचना देऊनही या कामांना सुरूवात झालेली नाही.