शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

...अन्‌ जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले, वकील लावा पण ‘एजंट’ नको; शेतकऱ्यांना केले आवाहन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 18:50 IST

शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे महामार्गासाठी भूसंपादित जमिनीपोटी वाढीव मोबदला मिळावा, यासाठी सुनावणी होणार होती.

कुंदन पाटील 

जळगाव : महामार्गासाठी संपादित झालेल्या जमिनीपोटी वाढीव मोबदला मिळावा, यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी करण्यापूर्वीच संपूर्ण प्रतिज्ञापत्रासह संपूर्ण दस्ताऐवज सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यामुळे २२०० प्रकरणांना २१ दिवसांनी सुनावणी घेऊ, असे सांगत दालनाबाहेर शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी सामोरे गेले. गतकाळात काय झाले, याची जाणीव आहे. मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिेजे. दलालांना नको. म्हणून बाजू मांडण्यासाठी वकील लावा पण ‘एजंट’ नको, अशा सूचक शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले.

शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे महामार्गासाठी भूसंपादित जमिनीपोटी वाढीव मोबदला मिळावा, यासाठी सुनावणी होणार होती. जिल्ह्यातील २२०० प्रकरणांवर सुनावणी होणार असताना शेतकऱ्यांच्यावतीने वकिलांनी बाजू मांडली.न्यायालयीन निवाड्यानुसार सुनावणी सुरु ठेवावी, अशी विनंती वकिलांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र सुनावणी घेण्यास नकार दिला. प्रतिज्ञापत्रासह संपूर्ण दस्ताऐवज सादर होत नाही तोपर्यंत सुनावणीत वेळ खर्ची करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी मांडले. त्यावर वकिलांनी वेळ मागितली. १५ दिवसात प्रतिज्ञापत्र व दस्ताऐवज सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर वकिलांनी हा कालावधी अपूर्ण पडेल म्हणत सुनावणीचा कालावधी वाढवून मिळावी, अशी मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ दिवसानंतर सुनावणी घेण्याचा निर्णय जाहीर केला.

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही....जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दालनाबाहेर पडले. तेव्हा त्यांना व्हरांड्यात शेतकऱ्यांची गर्दी दिसली. तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि ‘दलाली’चे कान पिळण्यासाठी त्यांनी रोखठोक सल्लाच देऊन टाकला. ‘गतकाळात काय झाले आहे, हे मला माहिती आहे. शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम मिळत नाही. मात्र ‘एजंट’ वेळ मारुन नेतात. म्हणून सुनावणीदरम्यान, वकील लावा पण ‘एजंट’ लावू नका, अशा शब्दात सूचक इशारा दिला. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी कागदपत्रांविषयी अडचणी येत असल्याची तक्रार मांडली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी वकील लावता येत नसेल माझ्याकडे या. मी सहकाऱ्यांकरवी तुमचे कागदपत्र तयार करुन देतो.दस्ताऐवजातील पूर्तताही करुन देतो.शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्रत्येकाला मी कागदपत्रे पुरवायला तयार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने कुठले कागदपत्र दिले, तेही देतो. संपूर्ण पारदर्शकताही जपायला तयार आहे. मात्र मला कुणाचा फोन आणू नका. जेव्हा मोबदल्याचा पूर्ण असलेला दस्ताऐवज सादर केला की अंतिम सुनावणी घेईल. तत्पूर्वी शेतकऱ्यांशी वैयक्तिक चर्चा करेल, अशा शब्दही त्यांनी यावेळी दिला. 

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी