शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

...अन्‌ जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले, वकील लावा पण ‘एजंट’ नको; शेतकऱ्यांना केले आवाहन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 18:50 IST

शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे महामार्गासाठी भूसंपादित जमिनीपोटी वाढीव मोबदला मिळावा, यासाठी सुनावणी होणार होती.

कुंदन पाटील 

जळगाव : महामार्गासाठी संपादित झालेल्या जमिनीपोटी वाढीव मोबदला मिळावा, यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी करण्यापूर्वीच संपूर्ण प्रतिज्ञापत्रासह संपूर्ण दस्ताऐवज सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. त्यामुळे २२०० प्रकरणांना २१ दिवसांनी सुनावणी घेऊ, असे सांगत दालनाबाहेर शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी सामोरे गेले. गतकाळात काय झाले, याची जाणीव आहे. मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिेजे. दलालांना नको. म्हणून बाजू मांडण्यासाठी वकील लावा पण ‘एजंट’ नको, अशा सूचक शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले.

शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे महामार्गासाठी भूसंपादित जमिनीपोटी वाढीव मोबदला मिळावा, यासाठी सुनावणी होणार होती. जिल्ह्यातील २२०० प्रकरणांवर सुनावणी होणार असताना शेतकऱ्यांच्यावतीने वकिलांनी बाजू मांडली.न्यायालयीन निवाड्यानुसार सुनावणी सुरु ठेवावी, अशी विनंती वकिलांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र सुनावणी घेण्यास नकार दिला. प्रतिज्ञापत्रासह संपूर्ण दस्ताऐवज सादर होत नाही तोपर्यंत सुनावणीत वेळ खर्ची करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी मांडले. त्यावर वकिलांनी वेळ मागितली. १५ दिवसात प्रतिज्ञापत्र व दस्ताऐवज सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर वकिलांनी हा कालावधी अपूर्ण पडेल म्हणत सुनावणीचा कालावधी वाढवून मिळावी, अशी मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ दिवसानंतर सुनावणी घेण्याचा निर्णय जाहीर केला.

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही....जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दालनाबाहेर पडले. तेव्हा त्यांना व्हरांड्यात शेतकऱ्यांची गर्दी दिसली. तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि ‘दलाली’चे कान पिळण्यासाठी त्यांनी रोखठोक सल्लाच देऊन टाकला. ‘गतकाळात काय झाले आहे, हे मला माहिती आहे. शेतकऱ्यांना मोबदल्याची रक्कम मिळत नाही. मात्र ‘एजंट’ वेळ मारुन नेतात. म्हणून सुनावणीदरम्यान, वकील लावा पण ‘एजंट’ लावू नका, अशा शब्दात सूचक इशारा दिला. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी कागदपत्रांविषयी अडचणी येत असल्याची तक्रार मांडली. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी वकील लावता येत नसेल माझ्याकडे या. मी सहकाऱ्यांकरवी तुमचे कागदपत्र तयार करुन देतो.दस्ताऐवजातील पूर्तताही करुन देतो.शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्रत्येकाला मी कागदपत्रे पुरवायला तयार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने कुठले कागदपत्र दिले, तेही देतो. संपूर्ण पारदर्शकताही जपायला तयार आहे. मात्र मला कुणाचा फोन आणू नका. जेव्हा मोबदल्याचा पूर्ण असलेला दस्ताऐवज सादर केला की अंतिम सुनावणी घेईल. तत्पूर्वी शेतकऱ्यांशी वैयक्तिक चर्चा करेल, अशा शब्दही त्यांनी यावेळी दिला. 

टॅग्स :JalgaonजळगावFarmerशेतकरी