शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

जळगाव : करप्याला प्रतिकारक केळी वाणाचा शोध, दोन महिने आधीच होणार निसवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 08:42 IST

अतिवृष्टी आणि वादळीवा-याचा पहिला फटका केळीला बसत असतो. यामुळे उत्पादकांचे मोठेच नुकसान होते. यावर उपाय म्हणून जळगावच्या केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी केळीची नवे वाण शोधून काढले आहे.

चुडामण बोरसे/जळगाव - अतिवृष्टी आणि वादळीवा-याचा पहिला फटका केळीला बसत असतो. यामुळे उत्पादकांचे मोठेच नुकसान होते. यावर उपाय म्हणून जळगावच्या केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी केळीची नवे वाण शोधून काढले आहे. करप्याला प्रतिकारक असलेले हे वाण कमी कालावधित तयार होत असल्याचा या शास्त्रज्ञांचा दावा आहे.

केळी हे दीर्घ मुदतीचे आणि अधिक उत्पादन देणारे पीक मानले जाते. प्रति हेक्टरी उत्पादन वाढवायचे असल्यास सध्याचे खते वापरण्याचे प्रमाण व पद्धतीत बदल आवश्यक आहे. केळीसाठी पाण्याचे कार्यक्षम नियोजन ही यशस्वी केळी उत्पादनाची गुरुकिल्ली आहे.जिल्ह्यातील सध्या असलेल्या केळी ही तापमान आणि अतिवृष्टी तसेच वादळाला बळी पडते. वादळी वारे आले की त्याचा पहिला फटका हा जणू केळीला बसत असतो.

यावर या संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी केळीचे एक नवीन वाण शोधून काढले आहे. बीआरएस सिलेक्शन २०१३-३ (बीआरएस म्हणजे बनाना रिसर्च स्टेशन) असे केळीच्या वाणाचे नामकरण करण्यात आले आहे. या नव्या वाणाला अद्याप मान्यता मिळालेली नाही. पुढील वर्षी संयुक्त कृषी संशोधन मंडळाच्या बैठकीत या नव्या वाणाला मान्यता दिली जाईल, अशी माहिती केळी संशोधन केंद्रातील उद्यानविद्यावेत्ता प्रा.एन.बी शेख यांनी दिली.

सन २०१३ पासून या संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी या नव्या वाणाच्या केळीवर संशोधन सुरु केले. त्याला तब्बल चार वर्षांनी यश आले आहे. या नवीन बीआरएस वाणाची जळगावाच्याच केळी संशोधन केंद्र व इतर ठिकाणी साधारण केळीची २०० झाडे लावण्यात आली. त्यावर संशोधन सुरू झाले. ठिबकच्या साहाय्याने खते देण्यात आली. त्यात केळीच्या एका झाडाला २०० गॅ्रम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद आणि २०० ग्रॅम पालाश अशी खते गरजेनुसार देण्यात आली. केळीच्या गुणधर्मात कुठलाही बदल होणार नाही, याची काळजी पहिल्यापासून घेण्यात आली. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रदीर्घ अशा संशोधनातून नवीन वाण पुढे आले आहे. संशोधित केलेल्या नवीन केळीचे झाडांची उंची दीड मीटर आहे. या झाडाचे वजन २२ किलोपर्यंत आहे. विशेष म्हणजे हे झाड करपाही सहन करु शकते, अशी याची क्षमता आहे. आणि अतिशय अल्प अशा खर्चात केळी पिकविली जाऊ शकते. एका फणीला १३ ते १४ केळी लागली आहेत. ३२१ दिवसात येणाºया या केळीचा गोडवा नेहमीच्या केळीसारखाच आहे.

या संशोधनासाठी केळी संशोधन केंद्रातील प्रा.एन.बी.शेख यांच्यासह त्यांचे सहकारी व्ही.पी. भालेराव, प्रा. सुरेश परदेशी, वेदांतिका राजे निंबाळकर, अंजली मेढे, डॉ. राकेश सोनवणे यांनी सहकार्य केले.सामान्य शेतक-याला हे वाण परवडेल, त्याला खर्च कमी लागेल आणि कमी दिवसात चांगले उत्पन्न मिळू शकेल, असे वाण संशोधन करावे, असे गेल्या काही वर्षापासून मनात होते, त्याला यश आले आहे. पुढील वर्षी या वाणला मान्यता मिळेल, अशी अशा आहे.- प्रा.एन.बी. शेख, उद्यानविद्यावेत्ता, केळी संशोधन केंद्र, जळगाव 

 

टॅग्स :foodअन्नFarmerशेतकरीJalgaonजळगाव