शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय स्वच्छता समितीकडून जळगाव शहराच्या तपासणीला सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 19:19 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनपा प्रशासनाने यावर्षी विविध योजना राबविल्याचा दावा केला आहे. त्याच्या पाहणीसाठी सोमवाारी शहरातील केंद्रीय समितीचे सदस्य दाखल झाले असून, त्यांच्याकडून सकाळी १० वाजेपासून मनपाच्या स्वच्छतेसंदर्भातील दस्तऐवजांची पाहणी करण्यात आली. दोन दिवस समितीकडून दस्तऐवजांची पाहणी केली जाणार असून, बुधवारपासून शहरात प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमोबाईलव्दारे पाठविला जातोय केंद्राकडे अहवाल दोन दिवसानंतर शहरात होणार प्रत्यक्ष पाहणीप्रत्यक्ष पाहणीसाठी स्वतंत्र समिती

आॅनलाईन लोकमत

जळगाव-स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनपा प्रशासनाने यावर्षी विविध योजना राबविल्याचा दावा केला आहे. त्याच्या पाहणीसाठी सोमवाारी शहरातील केंद्रीय समितीचे सदस्य दाखल झाले असून, त्यांच्याकडून सकाळी १० वाजेपासून मनपाच्या स्वच्छतेसंदर्भातील दस्तऐवजांची पाहणी करण्यात आली. दोन दिवस समितीकडून दस्तऐवजांची पाहणी केली जाणार असून, बुधवारपासून शहरात प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.

केंद्रीय समितीचे दोन सदस्य सोमवारी शहरात दाखल झाले. यामध्ये निखील पाटील व राहुल पाटील यांचा समावेश आहे. सोमवारी मनपाच्या आरोग्य विभागात दोन्ही सदस्यांनी स्वच्छतेसंदर्भातील दस्तऐवजांची तपासणी केली. तसेच या दस्तएवेजांमध्ये जे काही दोष, चांगल्या बाबी या समितीच्या सदस्यांकडून  मोबाईल अ‍ॅपद्वारे केंद्र शासनाकडे पाठविण्यात येत असल्याची माहीती समिती सदस्यांनी दिली आहे.

सकाळी समिती दाखल

केंद्र्र शासनाची समिती सकाळी ९.३० वाजताच महापालिकेत दाखल झाली. सकाळपासून निखिल पाटील यांनी महापालिकेच्या स्वच्छता,  ओला सुका कचरा, घंटा गाड्या, कचरा कुंड्याची संख्या व इतर माहीती घेतली. तसेच स्वच्छता संदभार्तील कामांच्या दस्तऐवजांची तपासणी सुरु केली होती. विशेष म्हणजे  संबधित दस्तऐवज केंद्र शासनाच्या हौसिंग व अर्बन या विभागाकडे मोबाइलच्या अ‍ॅपच्या माध्यमातून पाठवत होते. त्यामुळे प्रत्यक्षात केंद्र शासनातील अधिकारी देखिल दिल्लीत बसून या कागदपत्रांची तपासणी करीत होते. चारशे नागरिकांचा घेणार अभिप्रायसमितीकडून सोमवार व मंगळववारी कागदपत्रांची तपासणी झाल्यानतंर बुधवार व गुरुवारी समितीककडून शहरातील प्रत्येक प्रभागात फिरुन प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पाहणीचे फाटो देखिल लोकेशनसह केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. समितीतील सदस्य पाहणी करुन त्याचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर करणार आहे. तसेच शहरातील विविध भागांमधील चारशे नागरिकांचा अभिप्राय समितीकडून घेतला जाणार असून, नागरिकांना सहा प्रश्नांची प्रश्नावली दिली जाणार आहे. प्रत्यक्ष पाहणीसाठी स्वतंत्र समितीकागदपत्र तपासणी व प्रत्यक्ष पाहणी झाल्यानंतर सोमवारी दाखल झालेल्या समितीतील काही सदस्य परत जाणार असून, इतर सदस्य बुधवारी शहरात दाखल होती. नागरिकांच्या प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी स्वतंत्र समिती येणार आहे. ही समिती शहरातील प्रत्यक प्रभागात जावून पाहणी करतील. या समितीत तीन ते चार सदस्य राहणार आहेत. तीन ते चार दिवस समितीकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. समितीच्या सदस्यांनी स्वच्छतेसाठी ४ हजार गुणांचे निकष तयार केले आहेत. यामध्ये कागदपत्र पुर्ततेसाठी १४०० गुण, नागरिकांचा अभिप्राय १४०० गुण आणि प्रत्यक्ष पाहणी १२०० गुणांची राहिल.