शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

केंद्रीय स्वच्छता समितीकडून जळगाव शहराच्या तपासणीला सुरवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 19:19 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनपा प्रशासनाने यावर्षी विविध योजना राबविल्याचा दावा केला आहे. त्याच्या पाहणीसाठी सोमवाारी शहरातील केंद्रीय समितीचे सदस्य दाखल झाले असून, त्यांच्याकडून सकाळी १० वाजेपासून मनपाच्या स्वच्छतेसंदर्भातील दस्तऐवजांची पाहणी करण्यात आली. दोन दिवस समितीकडून दस्तऐवजांची पाहणी केली जाणार असून, बुधवारपासून शहरात प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमोबाईलव्दारे पाठविला जातोय केंद्राकडे अहवाल दोन दिवसानंतर शहरात होणार प्रत्यक्ष पाहणीप्रत्यक्ष पाहणीसाठी स्वतंत्र समिती

आॅनलाईन लोकमत

जळगाव-स्वच्छ भारत अभियानांतर्गत मनपा प्रशासनाने यावर्षी विविध योजना राबविल्याचा दावा केला आहे. त्याच्या पाहणीसाठी सोमवाारी शहरातील केंद्रीय समितीचे सदस्य दाखल झाले असून, त्यांच्याकडून सकाळी १० वाजेपासून मनपाच्या स्वच्छतेसंदर्भातील दस्तऐवजांची पाहणी करण्यात आली. दोन दिवस समितीकडून दस्तऐवजांची पाहणी केली जाणार असून, बुधवारपासून शहरात प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे.

केंद्रीय समितीचे दोन सदस्य सोमवारी शहरात दाखल झाले. यामध्ये निखील पाटील व राहुल पाटील यांचा समावेश आहे. सोमवारी मनपाच्या आरोग्य विभागात दोन्ही सदस्यांनी स्वच्छतेसंदर्भातील दस्तऐवजांची तपासणी केली. तसेच या दस्तएवेजांमध्ये जे काही दोष, चांगल्या बाबी या समितीच्या सदस्यांकडून  मोबाईल अ‍ॅपद्वारे केंद्र शासनाकडे पाठविण्यात येत असल्याची माहीती समिती सदस्यांनी दिली आहे.

सकाळी समिती दाखल

केंद्र्र शासनाची समिती सकाळी ९.३० वाजताच महापालिकेत दाखल झाली. सकाळपासून निखिल पाटील यांनी महापालिकेच्या स्वच्छता,  ओला सुका कचरा, घंटा गाड्या, कचरा कुंड्याची संख्या व इतर माहीती घेतली. तसेच स्वच्छता संदभार्तील कामांच्या दस्तऐवजांची तपासणी सुरु केली होती. विशेष म्हणजे  संबधित दस्तऐवज केंद्र शासनाच्या हौसिंग व अर्बन या विभागाकडे मोबाइलच्या अ‍ॅपच्या माध्यमातून पाठवत होते. त्यामुळे प्रत्यक्षात केंद्र शासनातील अधिकारी देखिल दिल्लीत बसून या कागदपत्रांची तपासणी करीत होते. चारशे नागरिकांचा घेणार अभिप्रायसमितीकडून सोमवार व मंगळववारी कागदपत्रांची तपासणी झाल्यानतंर बुधवार व गुरुवारी समितीककडून शहरातील प्रत्येक प्रभागात फिरुन प्रत्यक्ष स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पाहणीचे फाटो देखिल लोकेशनसह केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. समितीतील सदस्य पाहणी करुन त्याचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर करणार आहे. तसेच शहरातील विविध भागांमधील चारशे नागरिकांचा अभिप्राय समितीकडून घेतला जाणार असून, नागरिकांना सहा प्रश्नांची प्रश्नावली दिली जाणार आहे. प्रत्यक्ष पाहणीसाठी स्वतंत्र समितीकागदपत्र तपासणी व प्रत्यक्ष पाहणी झाल्यानंतर सोमवारी दाखल झालेल्या समितीतील काही सदस्य परत जाणार असून, इतर सदस्य बुधवारी शहरात दाखल होती. नागरिकांच्या प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी स्वतंत्र समिती येणार आहे. ही समिती शहरातील प्रत्यक प्रभागात जावून पाहणी करतील. या समितीत तीन ते चार सदस्य राहणार आहेत. तीन ते चार दिवस समितीकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. समितीच्या सदस्यांनी स्वच्छतेसाठी ४ हजार गुणांचे निकष तयार केले आहेत. यामध्ये कागदपत्र पुर्ततेसाठी १४०० गुण, नागरिकांचा अभिप्राय १४०० गुण आणि प्रत्यक्ष पाहणी १२०० गुणांची राहिल.