शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पहिल्याच पावसात जळगाव शहर ‘जल’मय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 13:15 IST

एका तासात धो, धो धुतले

जळगाव : गेल्या १५ दिवसांपासून चातकाप्रमाणे वाट पाहिली जात असलेल्या मेघराजाने शहर परिसरात तब्बल एक तास हजेरी लावत संपूर्ण शहर जलमय करून टाकले. मात्र या दमदार हजेरीने सर्वत्र समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले होते.मृग नक्षत्राला यंदा ८ जूनपासून प्रारंभ झाला. यंदा दुष्काळाच्या संकटाने हैराण झालेल्या जनतेला दमदार पावसाची प्रतीक्षा होती. या आठवड्यात एक, दोन वेळा पाऊस झाला, मात्र तो समाधानकारक नव्हता. उलट या पावसापाठोपाठ उकाड्याने जनता हैराण झाली होती. संपूर्ण मृग नक्षत्र पावसाच्या प्रतीक्षेत गेले. गेल्या आठवड्यात शनिवारी २२ पासून आर्द्रता नक्षत्रास सुरूवात झाली. या नक्षत्रात पाऊस पडेल याकडे सर्वच आशेने डोळे लावून होते.नाल्याचे पाणी रस्त्यावरश्रीकृष्ण कॉलनी, उदय कॉलनी भागातून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी रस्त्यावर येऊन या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. पाण्याचा प्रवाह वेगात असल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावरच वाहने लावून पाणी कमी होण्याची वाट पाहिली. तब्बल ७.३० पर्यंत या भागात ही परिस्थिती होती. या भागातून जाणारा नाल्याची सफाई करण्यात यावी, अशी तक्रार आपण आपले सरकार पोर्टलवर केली होती, अशी माहिती या भागातील रहिवासी संजय भोकरडोळे यांनी दिली.बेंडाळे चौकात झाड पडलेपुष्पलता बेंडाळे चौकातही एक झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. जेसीबीने हे झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.बजरंग बोगद्यावरील वाहतूक थांबविलीबजरंग बोगदा अक्षरश: पाण्याखाली गेल्यामुळे या भागात वाहनांच्या रांगा लागून पिंप्राळा रेल्वेगेटकडे अनेकांनी आपला मोर्चा वळवून तेथून वाहने नेली. मात्र या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर व अन्य १२ वाहतूक कर्मचाऱ्यांनी तब्बल एक तास या भागात थांबून वाहतूक सुरळीत केली.जनमानस सुखावलेसायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान सुरू झालेला हा पाऊस ६.३० पर्यंत म्हणजे तब्बल एक तास सुरू होता. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे बराच दिलास मिळाला, पहिल्याच दमदार हजेरीने जनमानस सुखावले. दरम्यान, नालेसफाई न झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते.पावसाची दमदार हजेरीबुधवारी सकाळपासून प्रचंड उकाडा व उन्हाचा चटका जाणवत होता. अंगावरून घामाच्या धारा वाहत असल्यामुळे जनमानस अस्वस्थ असताना सायंकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान जोरदार वादळाला सुरूवात झाली. पावसाच्या वातावरणामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची त्रेधा उडाली. वादळी वाºयामुळे शनिपेठ, सुभाष चौक भागात बाजारातील व्यावसायिकांनी लावलेले प्लॅस्टिक कागद, छत्र्या उडून गेल्या. वादळा पाठोपाठ जोरदार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. पाहता, पहाता विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. बाजारापेठेत आलेल्या नागरिकांची यामुळे पळापळ सुरू झाल्याचे दृश्य दिसून आले.वीज पुरवठा खंडीत५.३० वाजता वादळ व त्या पाठोपाठ पाऊस सुरू झाल्याने वीज पुरवठाही खंडीत झाला होता. बºयाच भागात आठ वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद होता तर काही भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांच्या तक्रारी सुरू होत्या.बजरंग बोगदा परिसर जलमयया पावसामुळे जुना व नवा बजरंग बोगदा पाण्याने भरल्याचे दृश्य दिसून आले. या भागात तब्बल दीड तास वाहने खाळंबली होती. परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर पुलावर रेल्वेही थांबून होती. या पुलातील पाण्यातून अनेकांनी वाहने टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांची वाहने मध्येच बंद पडली.खडसेंच्या घराजवळ वृक्ष उन्मळलाशिवराम नगर भागात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या घरासमोर एक मोठा वृक्ष उन्मळून पडला होता, मात्र यात कुठलेही नुकसान झाले नाही. तात्काळ जेसीबी पाठवून हे झाड रस्त्यावरून बाजूला करण्यात आले.विविध भागात तळे साचलेया पावसामुळे काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाचा परिसर, कोर्ट चौक, नवीपेठेतील बॅँक स्ट्रिट, बालगंधर्व खुले नाट्यगृह परिसर, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान परिसर, पुष्पलता बेंडाळे चौकापासून सिव्हील हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता संपूर्ण जलमय झाला होता. गुडघ्यापर्यंत पाणी बºयाच ठिकाणी साचले होते. यात काही जाणारी-येणारी वाहनेही बंद पडली. एस.एम.आय.टी. कॉलेज जवळील नाला पावसामुळे दुथडी भरून वाहताना दिसत होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव