शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

आठवडाभरासाठी जळगाव, भुसावळ, अमळनेर पुन्हा ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2020 12:38 PM

अनियंत्रित गर्दीमुळे कोरोनावरचेही नियंत्रण सुटले

जळगाव : कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या जळगाव, भुसावळ, अमळनेर या तीन शहरात सात दिवस कडकडीत बंद जाहीर करण्यात आला आहे़ अनलॉकच्या काळात जळगाव शहरातील अनियंत्रित गर्दी व त्यामुळे झपाट्याने पसरणारा कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय पुढे करण्यात आला आहे. दरम्यान, आधीच १०० दिवसांचा लॉकडाऊन झाला आहे मग आता सात दिवसांचा लॉकडाऊन कशासाठी असा प्रश्न करीत निर्णयाला सोशल मिडीयातून जोरदार विरोध सुरु झाला आहे.आता लॉकडाऊनआधी रविवार आणि सोमवारी होणारी गर्दी रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे.४१ टक्के रुग्ण तीन शहरातजळगाव शहर हे जिल्हाभरातील सर्वात मोठे हॉटस्पॉट म्हणून समोर आले आहे़ या पाठोपाठ भुसावळ व अमळनेरातही रुग्णवाढीचा वेग अत्यंत धोकादायक आहे़ या तीनही शहरांमधील रुग्णसंख्या ही एकत्रित जिल्ह्याच्या ४१ टक्के आहे़ त्यामुळे या भागात लॉकडाऊनची अत्यंत आवश्यकता असल्याचा सूर मध्यंतरीच्या काळात उमटत होेता़ सोशल मीडियासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, अनेक डॉक्टर्स यांच्याकडूनही तशा मागण्या जोर धरीत होती.प्रतिबंधात्मक उपायच महत्त्वाचेजुलै महिना हा कोरोनाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असणार आहे़ असे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात येत आहे. डॉक्टर्सनीही ते मान्य केले होते़ अशा स्थितीत केवळ बेडची संख्या वाढवून जळगावात भागणार नाही़ त्यासाठी हा संसर्ग रोखणेच अत्यंत गरजेचे व अत्यावश्यक ठरणार आहे़ त्यामुळे परिस्थिती नियंत्राबाहेर जाऊ नये म्हणून अखेर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे़ सद्या स्थितीत बेडची संख्या वाढविली तरी रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशे मनुष्यबळ आहे का असाही एक प्रश्न उपस्थित करण्यात आला होता़ त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाकडे बघितले जात आहेत़ शहरात दरारोज सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते़ सरासरी रुग्ण आढळण्याचे प्रमाण हे जळगाव शहरात प्रचंड होते़ शुक्रवारी एकाच दिवसात ५५ नवे रुग्ण आढळून आले होते़ अशा स्थितीत शहरात लॉकडाऊनची मागणी जोर धरत होती़‘कण्टेनमेंट झोन’मधील वातावरण सुरक्षित असतं तर?जळगावमध्ये कन्टेनमेंट झोनमधील वातावरण असुरक्षित होतं. या झोनमध्ये बाहेरून आत जाता येत होतं आणि या झोनमधील नागरिकही बाहेर मुक्तपणे वावरत होते. याबाबत ‘लोकमत’ने स्टींग आॅपरेशनही केले होते. जर याबाबत प्रशासनाने जागरूकता दाखवली असती तर कोरोनाचा वाढत्या आकड्याला बºयाचप्रमाणात आळा घालता आला असता. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला हेदेखील एक कारण असल्याचे म्हटले जात आहे.रेडझोनमधून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना- राऊतलॉकडाऊनचे आदेश सर्वांनी अत्यंत बारकाईन वाचावे, यात सर्व माहिती इत्यंभूत व सोप्यापद्धतीने दिली आहे़ लॉकडाऊनचे तंतोतंत पालन केल्यास आपण रेड झोनच्या निकषातून बाहेर पडू, याचा जिल्ह्याच्या आरोग्यावर व पर्यावरणावर चांगला परिणाम होईल, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटले असून लॉकडाऊनचे पालन करण्याचे आवाहन केले आहे़पोलीस बंदोबस्तात वाढ : पोलीस अधीक्षकजळगाव, भुसावळ व अमळनेर या तीन शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. भुसावळ शहरात आधीच एसआरपी कंपनी तैनात करण्यात आली आहे. त्याशिवाय इतर ठिकाणी शेजारील तालुके व पोलीस ठाणे, मुख्यालय व नियंत्रण कक्षातून बंदोबस्त मागवून तैनात केला जाणार आहे. बंदोबस्ताची आखणी व नियोजन पूर्ण झाले असून नागरिकांनी देखील स्वत:ची जबाबदारी समजून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालक करावे, घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी केले आहे.आता ही गर्दी रोखणार कशीनागरिकांना खरेदीसाठी रविवार आणि सोमवार असा दोन दिवसांचा अवधी मिळणार आहे. त्यामुळे ही गर्दी आवरण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि जिल्हा प्रशासनासमोर राहणार आहे. गर्दीला रोखण्यासाठीच लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आता दोन दिवसांची ही गर्दी रोखण्यासाठी प्रशासनाला मोठीच कसरत करावी लागणार आहे. आधीचाच लॉकडाऊन कडक केला असता तर आज ही वेळ आली नसती, असेही सांगितले जात आहे.सरकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्रावरच परवानगीलॉकडाऊन काळात ग्रामीण भागातून तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी येणाºया सरकारी अधिकारी व कर्मचाºयांना ओळखपत्राशिवाय परवानगी मिळणार नाही. दुचाकीवर येताना देखील फक्त एकच व्यक्ती येऊ शकते, सोबत दुसºया व्यक्तीला परवानगी नाही. दूध, भाजीपाला वाहतूक करणाºया वाहनांना मात्र प्रवेश असेल, त्याव्यतिरिक्त कोणतेही वाहन फिरु शकणार नाही. यावेळेचे लॉकडाऊन अतिशय कडक असणार आहे.वृत्तपत्रांचे घरपोच वितरण होणारसात दिवसांच्या लॉकडाऊनच्या या कालावधीत वृत्तपत्रांचे घरपोच वितरण करता येईल, असे जिल्हाधिकाºयांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव