शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

जलसंपदा विभाग म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ - शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:50 AM

पाणी प्रश्नांसंदर्भात बैठक

ठळक मुद्देपाणी आवर्तनाची पूर्तता होईनाआंदोलन नाही, कॅनॉलच तोडणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28- जिल्ह्यात पाण्याचे आवर्तन सोडण्याची पूर्तता तर होत नाही व पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर दुरावस्था झालेल्या चा:यांमुळे बहुतांश पाणी वायाच जाते. यास   जलसंपदा विभागाचा नियोजन शून्य कारभार कारणीभूत असून जलसंपदा विभाग म्हणजे अंधेर नगरी, चौपट राजा असल्याची टीका शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी बुधवारी केली. पाचोरा-भडगाव तालुक्यातील पाणी प्रश्नांसंदर्भात आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला  आमदार  किशोर पाटील हेदेखील उपस्थित होते. बैठकीनंतर आमदार पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, गिरणा धरणातून दोन आवर्तन सोडण्यासंदर्भात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात यापूर्वी तीन-तीन वेळा आवर्तन सोडले जात होते. त्यामुळे पाचोरा-भडगाव परीसरातील शेतक:यांना शेतीला पाणी मिळत होते. त्यात आता कापसावरील बोंडअळीमुळे कृषी विभागाने कापूस उपटून टाकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शेतक:याला फरदडही घेता येत नाही. अशात पाणी आवर्तन सोडण्याबाबत जलसंपदा विभागाचा गलथान कारभार असून दोनच आवर्तन सोडणार असल्याने 50 टक्के शेतक:यांनी अर्जच भरले नसल्याचे त्यांनी सांगितले. पाचोरा-भडगाव परिसरात कालव्यांचीदेखील दुरूस्ती झालेली  नसून चा:यांनाही गळती लागली  असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जलसंपदा विभागाची ऐपत नसेल तर आमदार निधीतून या चारी दुरूस्त करण्यासाठी परवानगी मागितली असल्याचे ते म्हणाले.  त्यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. बहुळा धरण ज्यावेळी बांधले गेले त्यावेळी त्याच्यावर धरण नव्हते. मात्र आता बहुळा धरणाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. नवीन कामांचे सोडा पण  जिल्ह्यात जे जुने प्रकल्प आहेत ते तरी पूर्णत्वास नेले पाहीजे असा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला. आवर्तन सोडूनही शेतक:याला यंदा रब्बी पीक घेता येणार नसल्याचे ते म्हणाले.  जलसंपदा खात्याचे मंत्री आपल्याच जिल्ह्याचे असूनही अशी दुरवस्था का, असा प्रश्न आमदार पाटील यांना विचारला असता ते म्हणाले, मी त्यांच्याबद्दल नाही जलसंपदा विभागाबाबत बोलत आहे, असे सांगून त्यांनी राज्याचा जलसंपदा विभाग म्हणजे अंधेर नगरी, चौपट राजा असल्याची टिका शेवटी केली.  

आंदोलन नाही, कॅनॉलच तोडणारपाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर आपण आंदोलन, उपोषण वैगेरे काही करणार नाहीतर थेट कॅनॉल तोडू, असा इशारा आमदार पाटील यांनी या वेळी दिला.