शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

झटपट सोयाबीन; पाऊस कधीही झाला तरी शेतकरी मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST

(डमी ११८१) अजय पाटील लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये खरीप हंगामात उडीद, मुगाच्या तुलनेत सोयाबीनचे ...

(डमी ११८१)

अजय पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये खरीप हंगामात उडीद, मुगाच्या तुलनेत सोयाबीनचे क्षेत्र वाढू लागले आहे. सोयाबीनच्या बियाणांतदेखील आता लवकर येणारे, मध्यम कालावधीत येणारे व उशिराने येणारे बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पाऊस कधीही झाला तरी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदाच होणार असून, जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यावरदेखील सोयाबीनचे पीक तग धरून आहे.

सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळत असल्यानेदेखील इतर पिकांच्या तुलनेत शेतकरी सोयाबीनच्या लागवडीलाच प्राधान्य देत आहेत. पाऊस कमी झाला की जास्त झाला तरीही उडीद व मुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. मात्र, सोयाबीनला जास्त फरक पडत पडत नसल्याने जिल्ह्यात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यात खरीप क्षेत्रात ३० ते ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होत आहे.

जिल्ह्यात वाढला सोयाबीनचा पेरा

२०१७ - २१ हजार हेक्टर

२०१८ - २३ हजार हेक्टर

२०१९ - २४ हजार हेक्टर

२०२० - २७ हजार हेक्टर

२०२१ - २९ हजार हेक्टर

झटपट येणारे सोयाबीन

जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर जूनच्या अखेरच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यात सोयाबीनची लागवड होत असते. झटपट येणारे सोयाबीनच्या बियाणाची लागवड केल्यानंतर सुमारे तीन महिन्यात हे पीक काढण्याचा स्थितीत येते. त्यामुळे सुरुवातील व मधे केव्हाही पाऊस झाला तरी या पिकाला फायदाच होतो.

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन

मध्यम कालावधीत येणाऱ्या सोयाबीनची लागवड हीदेखील जूनच्या शेवटच्या आठवड्यात होते. लागवड झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पीक काढणीयोग्य होत असते. सद्यस्थितीत या पिकाची स्थिती चांगली असून, यंदा हंगाम चांगला राहण्याची शक्यता आहे.

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

या सोयाबीनचा कालावधी हा पूर्ण चार महिन्यांचा असतो. जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागवड झालेल्या सोयाबीनची काढणी ही ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होते. जास्त कालावधीसाठी लागवड झालेल्या सोयाबीनच्या पिकाला परतीचा पावसामुळे काही प्रमाणात नुकसान होण्याची भीती असते.

काय म्हणतात शेतकरी..

सोयाबीन हे पीक जास्त पावसातही तग धरून असते. तसेच गेल्या काही वर्षात सोयाबीनला चांगला भावदेखील मिळत आहे. त्यामुळे उडीद, मूग या पिकांपेक्षा सोयाबीन हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदा देणारे असल्याने या पिकाच्या लागवडीला प्राधान्य आहे.

- जितेंद्र वसंत चौधरी, शेतकरी

उडीद व मुगाचे पावसामुळे नुकसान झाल्यामुळे पूर्ण हंगाम वाया जातो. त्या तुलनेत सोयाबीनचे नुकसान झाले तरी खराब मालाला दोन ते अडीच हजारपर्यंतचा भाव हा बाजारात मिळूनच जातो. त्यात पीक चांगले आले तर बाजारात सोयाबीनला चांगलाच भाव आहे.

- रमेश रामसिंग पाटील, शेतकरी

कोट

यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीनला फायदा आहे. मात्र, ज्या शेतात पाण्याचा निचरा झालेला नाही अशा ठिकाणी सोयाबीनचे नुकसान झाले आहे. मात्र, सरासरी स्थिती पाहिल्यास सोयाबीनच्या पिकाची गुणवत्ता चांगलीच आहे.

-संभाजी ठाकूर, कृषी अधीक्षक