शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

अमळेनरात फेरीवाला धोरण गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 1:06 AM

अमळनेर शहरात फेरीवाला धोरण राबवण्याऐवजी ते गुंडाळले गेल्याने फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून सामान्य नागरिकाला ते उघडपणे दादागिरी करू लागले आहेत. विक्रेत्यांनी रस्ते अडविल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे

ठळक मुद्देकिरकोळ विक्रेत्यांनी रस्ते अडविले प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

अमळनेर : शहरात फेरीवाला धोरण राबवण्याऐवजी ते गुंडाळले गेल्याने फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून सामान्य नागरिकाला ते उघडपणे दादागिरी करू लागले आहेत. विक्रेत्यांनी रस्ते अडविल्याने वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहेशहरातील मुख्य भाजीपाला मार्केट परिसर, लालबाग पाण्याच्या टाकीचा परिसर, सुभाष चौक ते कुंटे रोड , गंगा घाट, बसस्थानक परिसरात हातगाड्या व किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे वाहतूक खोळंबते. महिला, आबालवृद्धांना जाण्यास जागा नसते फेरीवाले रस्त्यातून हलायला तयार नसतात. उलटपक्षी बाजूला होण्यास सांगितले तर दादागिरी करतात हातगाडी हलवत नाहीत, अशा तक्रारी आहेत. शासनाच्या आदेशानुसार पालिकेने फेरीवाला धोरण राबविण्याचा निर्णय घेतला होता परंतु त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. समितीची बैठक होते की नाही ही देखील शोधाची बाब आहे. फेरीवाला धोरणात हातगाड्यांना क्रमांक देऊन त्यांना विभाग ठरवून द्यायचा आहे. ज्या त्या भागातील हातगाड्या त्यांच्याच भागात पाहिजे इतरत्र आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मात्र हातगाड्यांचे शहराच्या मध्यवर्ती भागात केंद्रीकरण झाले असल्याने बेशिस्त वर्तन हातगाडी चालकांकडून घडत असल्याच्या तक्रारी आहेत.शहराची हद्द वाढल्यामुळे चारही दिशांना भाजीपाला बाजार असला पाहिजे मात्र तसे होताना दिसत नाही. वाटेल तिथे रस्त्यावर गाडया उभ्या करून पाहिजे त्यावेळी माल विकायला उभे राहत असल्याने प्रवाशी वाहनांना थांबावे लागते. किरकोळ विक्रेत्यांसाठी न.पा ने लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ ओटे बांधून दिले होते . मर्यादा रेषा आखून दिली होती परंतु सर्व मर्यादा ओलांडून रस्त्यावर गाड्या उभ्या असतात. तथापि न. प. चे अधिकारी किंवा कर्मचारी कारवाई करताना दिसत नाहीत.एक विशिष्ट समाजाच्या दबावाला बळी पडून कारवाई होत नसल्याचे बोलले जाते.

टॅग्स :hawkersफेरीवाले