शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

रस्ते अपघातातील मृत्यूत जगात भारत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:08 AM

जळगाव : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार रस्ता अपघातात मृत्यूत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. ५५ टक्के अपघात हे भरधाव ...

जळगाव : जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार रस्ता अपघातात मृत्यूत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. ५५ टक्के अपघात हे भरधाव वेगाने वाहने चालविण्यामुळे झालेले आहेत. विशेष म्हणजे अपघातात मृत झालेल्या ७० टक्के व्यक्ती या १८ ते ४५ वयोगटातील अर्थात कुटुंबातील कर्त्या व्यक्ती होत्या. त्यातदेखील ३२ टक्के अपघात हे दुचाकीस्वारांचेच असल्याचे उघड झाले आहे.

जगातील एकूण रस्ते अपघातातील मृत्यूंपैकी ११ टक्के मृत्यू भारतात होत आहे. २०१८ मध्ये देशात ४ लाख ६७ हजार ४४ अपघात झाले तर १ लाख ५१ हजार ४१७ जणांचा मृत्यू झाला आहे. ४ लाख ६९ हजार ४१८ जण जखमी झाले आहेत. ही आकडेवारी रस्ता सुरक्षा अभियानात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सादर केली. जळगाव जिल्ह्यात मागील वर्षभरात ७५२ अपघात झाले असून त्यात ४७१ जणांचा मृत्यू झालेला आहे तर ५१४ जण जखमी झालेले आहेत. २०१९ च्या तुलनेत अपघाताच्या संख्येत घट झालेली असली तरी मृत्यूमध्ये ४ टक्के वाढ झालेली आहे. २०१९ मध्ये ८३५ अपघात झाले होते तर ४५४ जणांचा मृत्यू झाला होता.

या कारणांमुळे होतो अपघात

रस्त्यावरील अपघाताचे मुख्यत्वे कारणे अतिवेगाने वाहन चालविणे, सुरक्षित अंतर न ठेवणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालविणे, ओव्हरटेकिंग, लेनकटिंग, रॅश ड्रायव्हिंग, मद्यपान करून वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, रात्रीच्या वेळी वाहन चालविणे आदी प्रमुख कारणे समोर आलेली आहेत. देशातील एकूण रस्त्याच्या लांबीपैकी २ टक्के लांबी राष्ट्रीय महामार्गाने व्यापलेली असताना याच महामार्गावर सर्वाधिक ३५ टक्के अपघात झालेले आहेत. राज्य मार्गावर २५ टक्के अपघात झाले आहेत. ज्या दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान केलेले आहे, त्यांचा जीव या अपघातात वाचल्याचेही समोर आले आहे. अपघातात मृत्यू होणाऱ्यांमध्ये पादचारी, सायकलस्वार व दुचाकीस्वार यांची संख्या ५४ टक्के आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने रस्त्यावरील अपघातांची सं‌ख्या दरवर्षी १० टक्क्यांनी कमी करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

एक नजर अपघातांवर

देशातील अपघातांची संख्या : ४,६७,०४४

देशातील अपघातांतील मृत्यू : १,५१,४१७

जळगाव जिल्हा अपघात : ७५२

जळगाव जिल्हा अपघातात मृत्यू : ४७१

अपघातात मृत झालेल्या तरुणांची संख्या : ७० टक्के

अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू : ३६.५ टक्के