शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

भाजपापुढील अडचणींमध्ये पुन्हा वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 11:16 IST

खडसे यांच्या अंबानींविषयी वक्तव्याने रावेरमधील उमेदवारीविषयी अनिश्चिततेचे संकेत ; श्रेष्ठींसोबत पुन्हा बिनसले ? धनगर समाजाच्या सवलतींविषयी घोषणेने आदिवासी जनतेमध्ये असंतोष ; गावीत, पाडवी यांचे प्रयत्न तोकडे

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला तरी राजकीय पक्षांचा उमेदवारीचा घोळ काही अद्याप संपताना दिसत नाही. खान्देशात नंदुरबार, धुळे मतदारसंघातील दोन्ही पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत तर जळगाव मतदारसंघात भाजपाची उमेदवारी अनिश्चित आहे. रावेरमध्ये राष्टÑवादी आणि भाजपा दोघांच्या उमेदवारीचे चित्र धूसर असून एकमेकांच्या हालचालीवर पुढील रणनीती आखली जात आहे. खडसे यांच्या नव्या विधानामुळे उमेदवारीचा घोळ वाढला आहे. राजकीय चर्चेनुसार पक्षश्रेष्ठी स्वत: खडसे यांनी उमेदवारी करावी, या मताचे आहेत. परंतु, खडसे यांची इच्छा नाही. शरद पवार हे देखील खडसे यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून असल्याने उमेदवार जाहीर करीत नाही. राफेलच्या मुद्यावरुन विरोधी पक्ष मोदी आणि अंबानी यांच्या लाभदायी मैत्रीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असताना खडसे यांच्यासारखा ज्येष्ठ नेता थेट अंबानींच्या निवासस्थानाचा मुद्दा मांडतो, यामागे निश्चित भूमिका वाटते. पुढील काळात त्या भूमिकेमागील राजकारण स्पष्ट होईल.तिकडे नंदुरबारात धनगर आणि आदिवासी सवलतीचा मुद्दा काँग्रेसने प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविला आहे. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार के.सी.पाडवी यांनी आमदारकीचा देऊ केलेला राजीनामा हा रणनीतीचा भाग आहे. आदिवासींमधील रोष दूर करण्यासाठी भाजपा आमदारांनी पत्रकार परिषदा तर घेतल्या, पण आदिवासींपर्यंत जाऊन हा गैरसमज असेल तर दूर करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, हे आव्हान आता भाजपापुढे राहणार आहे.रावेर, नंदुरबारमध्ये भाजपापुढे नवीन अडचणी उभ्या राहिल्या आहेत, त्यासोबतच धुळ्यातही उपमहापौर कल्याण अंपळकर यांनी महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेत राजीनाम्याचा इशारा दिल्याने धुळे महापालिकेत घवघवीत यश मिळविलेल्या भाजपामध्ये सुंदोपसुंदी सुरु झाल्याचे चित्र समोर आले आहे. अंपळकर या निष्ठावंत असल्याने त्यांच्या नाराजीमुळे पक्षांतर्गत खदखद समोर आली आहे. पाणी योजनेच्या ठेकेदारावर केलेली मेहेरनजर, आरोग्याधिकारी नियुक्तीवरुन मतभेद हे प्रकार पाहता जळगावसोबतच धुळे भाजपामध्ये अंतर्गंत मतभेद वाढू लागल्याचे संकेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती भाजपासाठी सुखावह नाही.जळगावात खासदार ए.टी.पाटील यांच्या उमेदवारीवर गंडांतर येण्याची शक्यता लक्षात घेऊन माजी मंत्री एम.के.पाटील, डॉ.संजीव पाटील, प्रकाश पाटील, आमदार उन्मेष पाटील, डॉ.बी.एस.पाटील, प्रा.अस्मिता पाटील, डॉ.सुरेश सुर्यवंशी, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ, पाचोऱ्याचे शांताराम सोनजी पाटील यांच्यासह डझनभर उमेदवारांनी प्रयत्न चालविले आहेत.एकनाथराव खडसे यांनी अंबानी यांना केलेले लक्ष्य पाहता भाजपाच्या रावेरमधील उमेदवारीविषयी अनिश्चितता स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्र्यांचा भुसावळ दौरा आणि खडसे यांच्या मागणीवरुन मंत्रालयात आणि जळगावात झालेल्या आढावा बैठका पाहता पक्षश्रेष्ठी, मुख्यमंत्री आणि खडसे यांच्यात समेट झाल्याचे वाटत होते. पण खडसेंच्या नव्या विधानावरुन सारे काही आलबेल नाही, असेच दिसून येत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात उलथापालथीची शक्यता बळावली आहे.धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे सवलती देण्यात येईल, या राज्य सरकारच्या भूमिकेमुळे खान्देशातील आदिवासी समाजामध्ये असंतोष पसरला आहे. नंदुरबार मतदारसंघ तर आदिवासींसाठी राखीव आहे, त्याशिवाय रावेर आणि धुळे या मतदारसंघात आदिवासी समाजाचे मतदान परिणामकारक ठरु शकते. काँग्रेसने हा मुद्दा प्रभावीपणे उचलून जनसामान्यांपर्यंत नेला. आमदार के.सी.पाडवी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.. भाजपाचे आमदारद्वयी डॉ.विजयकुमार गावीत आणि उदेसिंग पाडवी यांनी पत्रकार परिषद घेऊन गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव