शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

वधारलेल्या खाद्य तेलात नरमाई टमाटे, बटाटेही झाले स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या महिन्यापासून भाववाढ झालेल्या खाद्य तेलाच्या भावात या आठवड्यात घसरण झाली असून सोयाबीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या महिन्यापासून भाववाढ झालेल्या खाद्य तेलाच्या भावात या आठवड्यात घसरण झाली असून सोयाबीन तेलाचे भाव १२५ ते १३० रुपयांवरून ११५ ते १२० आले आहेत. शेंगदाणा तेल मात्र स्थिर असून शेंगदाण्याचे भाव वाढले आहे आहे तर साबुदाण्याचे भाव कमी झाले आहेत. भाजीपाल्याच्या भावात मात्र बहुतांश भाज्यांचे भाव मात्र स्थिर आहे तर टमाटे, बटाटे स्वस्त झाले आहेत.

दोन आठवड्यापूर्वी किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात चांगलीच वाढ झाली होती. मात्र या आठवड्यात खाद्य तेलाचे भाव कमी झाल्याने तेवढा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून १२५ ते १३० रुपयांवर असलेल्या सोयाबीन तेलाच्या भावात घसरण होऊन ते ११५ ते १२० रुपयांवर आले आहेत.

शेंगदाणा तेल मात्र अजूनही १६० ते १७० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. शेंगदाणे १०५ ते ११० रुपयांवरून ११० ते १२० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे तर साबुदाण्याचे भाव कमी होऊन ते ६५ ते ७० रुपयांवरून ५५ ते ६० रुपयांवर आले आहे.

साखर अजूनही स्थिर

तीन आठवड्यांपूर्वी भाव कमी झालेल्या साखरेचा गोडवा अजूनही कायम आहे. त्या वेळी ३८ रुपये प्रति किलोवरून ३६ रुपये प्रति किलोवर आली होती. ती अद्यापही याच भावावर कायम आहे. मकर संक्रांत झाली तरी या काळात साखरेचे भाव वाढले नव्हते.

टमाट्याची आवक वाढली

एरव्ही हिवाळ्यामध्ये टमाट्याचे भाव कमी असतात. डिसेंबरमध्ये अधिक भाव असलेल्या टमाट्याचे भाव कमी होऊन १० रुपये प्रति किलोवर आले आहेत.

बटाटे आवाक्यात

गेल्या दोन ते तीन महिन्यात बटाट्याचे भाव चांगलेच वधारून ते ५० रुपये प्रति किलोवर पोहचले होते. मात्र गेल्या महिन्यापासून नवीन बटाट्याची आवक वाढून हे भाव कमी-कमी होत गेले व आता तर लहान बटाटे १० ते १५ रुपये प्रति किलोवर आले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी ते ३० रुपये प्रति किलो होते.

खाद्य तेलासह बटाट्याचेही भाव कमी झाल्याने दिलासा आहे. विशेष म्हणजे टमाट्याचे भाव एकदच कमी झाल्याने व किराणा साहित्याचे भाव कमी झाल्याचा लाभ आहे.

- संजय चौधरी,

ग्राहक

गेल्या अनेक दिवसांपासून भाव वाढ झालेल्या सोयाबीन तेलाच्या भावात या आठवड्यात घसरण झाली आहे. शेंगदाण्याचे भाव वाढले असून साबुदाणा मात्र स्वस्त झाला आहे.

- सचिन छाजेड,

व्यापारी

सध्या टमाटे, बटाटे यांची आवक चांगलीच वाढली असून त्यामुळे त्यांचे भाव कमी झाले आहे. यासह कोथिंबीर व इतर भाज्याचे भाव स्थिर असून सध्या आवक चांगली आहे.

- रमेश वाणी, भाजीपाला विक्रेते