शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

जळगावात उन्हाळी फळांना वाढली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 17:42 IST

उन्हाळा लागताच बाजारात उन्हाळी फळांची आवक वाढली आहे. सध्या टरबूज, द्राक्ष, खरबूज, संत्री यांना जास्त मागणी आहे. दररोज तीन चे चार क्विंटल टरबूजची विक्री होत असून त्या खालोखाल द्राक्षांना मागणी आहे.

ठळक मुद्दे‘गरीबांच्या फ्रिज’ला मागणीटरबूज खरेदीला अधिक प्राधान्य दिले जात आहेसध्या उन्हाळी फळांना चांगलीच मागणी

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.९ : उन्हाळा लागताच बाजारात उन्हाळी फळांची आवक वाढली आहे. सध्या टरबूज, द्राक्ष, खरबूज, संत्री यांना जास्त मागणी आहे. दररोज तीन चे चार क्विंटल टरबूजची विक्री होत असून त्या खालोखाल द्राक्षांना मागणी आहे. सध्या टरबूजचे भावही आवाक्यात असून २० रुपये प्रति किलोने ते विक्री होत असल्याने त्यास ग्राहकीही चांगली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.‘गरीबांच्या फ्रिज’ला मागणीगरीबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या पाण्याच्या माठांनाही चांगलीच मागणी वाढली आहे. शहरातील आकाशवाणी चौक, रिंग रोड, अजिंठा चौफुली, महामार्गावरच्या बाजूला, पिंप्राळा रस्त्यावर माठ विक्रेत्यांनी दुकाने थाटली असून तेथे खरेदीसाठी लगबग दिसून येते. सध्या माठही वेगवेगळ््या आकार व प्रकारात उपलब्ध असून त्यांना पसंती दिली जात आहे. माठाला आता तोटीही बसवून मिळत असल्याने त्यांना मागणी असल्याचे विके्रत्यांनी सांगितले. या सोबतच गोलाकार माठासह नक्षीकाम असलेले, रंगबिरंगी माठ विक्रीसाठी आले आहेत. दररोज किमान दीडशे ते दोनशे माठ विक्री होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. १०० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत लहान-मोठे माठ उपलब्ध आहेत.सध्या मागणी असलेल्या फळांचे भाव

  • टरबूज- २० रुपये प्रती किलो
  • खरबूज - ३० रुपये
  • द्राक्ष - ७० ते ८० रुपये
  • संत्री ५० ते ६० रुपये
  • मोसंबी - ६० ते ७० रुपये
  • सफरचंद - १२० ते १६० रुपये
  • रामफळ - ९० ते १२० रुपये

(भाव प्रति किलो)

 सध्या उन्हाळी फळांना चांगलीच मागणी वाढली असून टरबूज खरेदीला अधिक प्राधान्य दिले जात आहे.-पिरन शहा, फळ विक्रेते.

टॅग्स :fruitsफळेJalgaonजळगावHealth Tipsहेल्थ टिप्स