शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

भावा, दुचाकी चोरीचा भरोसा नाय; मग विमा का काढला जात नाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 10:44 IST

Jalgaon : चोरीच्या घटनांमध्ये वाढ, ८० टक्के दुचाकींचा विमाच नाही

जळगाव : एकीकडे दुचाकी चोरीच्या घटना वाढलेल्या असताना दुचाकींचा विमा काढणाऱ्यांची संख्या मात्र बोटावर मोजण्याइतकीच आहे. बाईक खरेदी करताना विमा काढला जातो तो पहिला आणि अखेरचा असतो. नंतर मात्र विमा काढण्याची तसदीच घेतली जात नाही. आरटीओच्या म्हणण्यानुसार शंभरात फक्त २० जण दुचाकीचा विमा काढतात, ८० जण विमाच काढत नसल्याची धक्कादायक माहिती आहे.

जळगाव जिल्ह्यात २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत १ हजार ८४४ दुचाकी चोरी झालेल्या आहेत तर त्यापैकी फक्त ५४१ दुचाकींचा शोध लागलेला आहे. १ हजार ३०३ दुचाकींचा अद्यापही शोध लागलेला नाही. पोलिसांकडून दुचाकी व चोरट्यांचा शोध सुरू आहे. चोरी झालेल्या १ हजार ८४४ पैकी फक्त २० टक्के दुचाकींचाच विमा होता, असेही निष्पन्न झालेले आहे.

दुचाकी चोरीवर्ष -   चोरीस गेल्या -  शोधण्यात यश२०२१ - ७५७         - २४८२०२० - ६२०          - १६८२०१९ - ४६७          - १२५

खरेदी करताना विमा पहिला अन् शेवटचाबहुतांश मालक दुचाकी खरेदी केल्यानंतर दुसऱ्या वेळी विमा काढायचे नावच घेत नाही. सुरुवातीला कंपनीकडूनच पाच वर्षांचा विमा काढला जातो. नंतर पुढे मालकाला तो काढायचा असतो. अनेक मालकांनी खरेदी करतानाच जो विमा काढलेला असतो तोच शेवटचा असतो. नंतर विमा काढण्याची तसदीच घेतली जात नाही.

किंमत पण कमी नायदुचाकीच्या किमती आधी कमी होत्या. आता कुठलीही दुचाकी ५० ते ६० हजारांपासून सुरू होते. त्यामुळे ती चोरीस गेल्यास मोठा फटका बसतो. काही दुचाकींच्या किमती तर एक ते पाच लाखांपर्यंत आहेत. या महागड्या दुचाकीच चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे. अपघात असो किंवा चोरी अशावेळी विम्यामुळे मोठा दिलासा मिळतो.

दुचाकी चोरी गेल्यानंतर डोळे उघडतेवाहन कोणतेही असो त्याचा विमा काढणे कायद्याने सक्ती तर आहेच पण वैयक्तिक देखील फायदेशीरच आहे. दुचाकी चोरी गेली की तेव्हा त्याचे महत्त्व कळते. विमा काढलेला असला तर दुचाकी चोरी झाली तरी त्याची रक्कम मालकाला विमा कंपनीकडून मिळते.-किशोर पाटील, विमा प्रतिनिधी

विम्याचे महत्त्व अजूनही लोकांना कळलेले नाही. सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे, चोरी गेलेले वाहन सापडलेच याची शाश्वती नाही. त्यामुळे विमा काढून दुचाकीचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. चोरी गेली तर कंपनीकडून मोबदला मिळतो.- शिवाजी पाटील, विमा प्रतिनिधी

विम्याबाबत दुचाकीस्वार काय म्हणतात?नियमित कामाच्या व्यापात दुचाकीच्या विम्याची मुदत कधी संपते, ते कळतही नाही. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते. पेट्रोलचे वाढते दर, मजुरी कमी व घरखर्च याचा ताळमेळ बसवताना मोठी कसरत होते, म्हणून विमा काढायला टाळाटाळ होते.-पुंडलिक संतोष पाटील, दुचाकीस्वार

इच्छा असूनही विमा काढला जात नाही. विम्याला एका वर्षासाठी दीड हजारापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते. दहा वर्षांत तर जुन्या दुचाकीच्या किमतीइतकीच रक्कम विम्याची होती. विमा काढणे फायदेशीरच आहे.-मुकेश गंगाधर शिंदे, दुचाकीस्वार

शंभरात २० दुचाकींचाच विमादुचाकीचा विमा काढणाऱ्यांची संख्या फक्त २० टक्के इतकीच असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी ‘लोकमत’ ला दिली. नवीन दुचाकी घेताना सुरुवातीला पाच वर्षांचा विमा असतो, नंतर मात्र विमा काढण्याकडे मालकाकडून दुर्लक्ष होते. विमा नसला तरी दुचाकी हस्तांतर केली जात नाही.

टॅग्स :bikeबाईकJalgaonजळगाव