शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

भावा, दुचाकी चोरीचा भरोसा नाय; मग विमा का काढला जात नाय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 10:44 IST

Jalgaon : चोरीच्या घटनांमध्ये वाढ, ८० टक्के दुचाकींचा विमाच नाही

जळगाव : एकीकडे दुचाकी चोरीच्या घटना वाढलेल्या असताना दुचाकींचा विमा काढणाऱ्यांची संख्या मात्र बोटावर मोजण्याइतकीच आहे. बाईक खरेदी करताना विमा काढला जातो तो पहिला आणि अखेरचा असतो. नंतर मात्र विमा काढण्याची तसदीच घेतली जात नाही. आरटीओच्या म्हणण्यानुसार शंभरात फक्त २० जण दुचाकीचा विमा काढतात, ८० जण विमाच काढत नसल्याची धक्कादायक माहिती आहे.

जळगाव जिल्ह्यात २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत १ हजार ८४४ दुचाकी चोरी झालेल्या आहेत तर त्यापैकी फक्त ५४१ दुचाकींचा शोध लागलेला आहे. १ हजार ३०३ दुचाकींचा अद्यापही शोध लागलेला नाही. पोलिसांकडून दुचाकी व चोरट्यांचा शोध सुरू आहे. चोरी झालेल्या १ हजार ८४४ पैकी फक्त २० टक्के दुचाकींचाच विमा होता, असेही निष्पन्न झालेले आहे.

दुचाकी चोरीवर्ष -   चोरीस गेल्या -  शोधण्यात यश२०२१ - ७५७         - २४८२०२० - ६२०          - १६८२०१९ - ४६७          - १२५

खरेदी करताना विमा पहिला अन् शेवटचाबहुतांश मालक दुचाकी खरेदी केल्यानंतर दुसऱ्या वेळी विमा काढायचे नावच घेत नाही. सुरुवातीला कंपनीकडूनच पाच वर्षांचा विमा काढला जातो. नंतर पुढे मालकाला तो काढायचा असतो. अनेक मालकांनी खरेदी करतानाच जो विमा काढलेला असतो तोच शेवटचा असतो. नंतर विमा काढण्याची तसदीच घेतली जात नाही.

किंमत पण कमी नायदुचाकीच्या किमती आधी कमी होत्या. आता कुठलीही दुचाकी ५० ते ६० हजारांपासून सुरू होते. त्यामुळे ती चोरीस गेल्यास मोठा फटका बसतो. काही दुचाकींच्या किमती तर एक ते पाच लाखांपर्यंत आहेत. या महागड्या दुचाकीच चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे. अपघात असो किंवा चोरी अशावेळी विम्यामुळे मोठा दिलासा मिळतो.

दुचाकी चोरी गेल्यानंतर डोळे उघडतेवाहन कोणतेही असो त्याचा विमा काढणे कायद्याने सक्ती तर आहेच पण वैयक्तिक देखील फायदेशीरच आहे. दुचाकी चोरी गेली की तेव्हा त्याचे महत्त्व कळते. विमा काढलेला असला तर दुचाकी चोरी झाली तरी त्याची रक्कम मालकाला विमा कंपनीकडून मिळते.-किशोर पाटील, विमा प्रतिनिधी

विम्याचे महत्त्व अजूनही लोकांना कळलेले नाही. सध्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे, चोरी गेलेले वाहन सापडलेच याची शाश्वती नाही. त्यामुळे विमा काढून दुचाकीचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. चोरी गेली तर कंपनीकडून मोबदला मिळतो.- शिवाजी पाटील, विमा प्रतिनिधी

विम्याबाबत दुचाकीस्वार काय म्हणतात?नियमित कामाच्या व्यापात दुचाकीच्या विम्याची मुदत कधी संपते, ते कळतही नाही. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते. पेट्रोलचे वाढते दर, मजुरी कमी व घरखर्च याचा ताळमेळ बसवताना मोठी कसरत होते, म्हणून विमा काढायला टाळाटाळ होते.-पुंडलिक संतोष पाटील, दुचाकीस्वार

इच्छा असूनही विमा काढला जात नाही. विम्याला एका वर्षासाठी दीड हजारापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते. दहा वर्षांत तर जुन्या दुचाकीच्या किमतीइतकीच रक्कम विम्याची होती. विमा काढणे फायदेशीरच आहे.-मुकेश गंगाधर शिंदे, दुचाकीस्वार

शंभरात २० दुचाकींचाच विमादुचाकीचा विमा काढणाऱ्यांची संख्या फक्त २० टक्के इतकीच असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी ‘लोकमत’ ला दिली. नवीन दुचाकी घेताना सुरुवातीला पाच वर्षांचा विमा असतो, नंतर मात्र विमा काढण्याकडे मालकाकडून दुर्लक्ष होते. विमा नसला तरी दुचाकी हस्तांतर केली जात नाही.

टॅग्स :bikeबाईकJalgaonजळगाव