शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्ती आल्यास अत्याधुनिक रेल्वे इंजिन एवढेच वाफेचे इंजिन ही महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 16:50 IST

जपानमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर रेल्वेसह अनेक विभागात केला जातो. तेथे रेल्वे ताशी १२० ते ३०० किलोमीटर प्रति ताशी धावते. टेक्नॉलॉजीचा वापरात देशात जपान सर्वात पुढे आहेत, परंतु त्यासोबतच पारंपरिक व जुन्या यंत्रणेलाही जपानमध्ये तितक्याच प्रमाणात महत्त्व दिले जाते. नैसर्गिक आपत्ती आल्यास वीजपुरवठा खंडित झाल्यास पारंपरिक वाफेचे इंजिन याचा आधार घेऊन तिथली यंत्रणा काम करत असते, अशी माहिती भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी जपान दौºयावरून आल्यानंतर ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देजपानमध्ये रेल्वे प्रशिक्षणानंतर सुनील मिश्रा यांची प्रतिक्रियामध्य रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांची निवड

भुसावळ, जि.जळगाव : जपानमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर रेल्वेसह अनेक विभागात केला जातो. तेथे रेल्वे ताशी १२० ते ३०० किलोमीटर प्रति ताशी धावते. टेक्नॉलॉजीचा वापरात देशात जपान सर्वात पुढे आहेत, परंतु त्यासोबतच पारंपरिक व जुन्या यंत्रणेलाही जपानमध्ये तितक्याच प्रमाणात महत्त्व दिले जाते. नैसर्गिक आपत्ती आल्यास वीजपुरवठा खंडित झाल्यास पारंपरिक वाफेचे इंजिन याचा आधार घेऊन तिथली यंत्रणा काम करत असते, अशी माहिती भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी जपान दौºयावरून आल्यानंतर ‘लोकमत’ला दिली.भारतीय रेल्वे मध्ये जपानच्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करता यावा तसेच रेल्वेच्या प्रशिक्षणासाठी रेल्वेच्या ४० अधिकाºयांना जपान दौºयावर पाठविण्यात आले होते. यात मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे सुनील मिश्रा व वरिष्ठ डीएसटी निशांत त्रिवेदी यांचा समावेश होता.जपानमध्ये सुरक्षेला फार महत्त्व दिले जाते. गाडी चालवताना रेल्वेचालकाला आरोग्याच्या दृष्टीने काही समस्या निर्माण झाल्यास इंजिनला स्वयंचलित ब्रेक लावलेले जाते. तसेच तेथील सिग्नल यंत्रणादेखील स्वयंचलित आहे.वाफेवरच्या इंजिनलाही तितकेच महत्वरेल्वे टेक्नॉलॉजीमध्ये जपान सर्वात पुढे असला सन १८८० च्या काळातील वाफेवरच्या इंजिनलाही तितकेच महत्त्व देऊन काळजीपूर्वक जतन करण्यात आले आहे. नैसर्गिकदृष्ट्या वीजपुरवठा खंडित झाला तर वाफेवरच्या इंधनाचा उपयोग करता यावा यासाठी एकेक महिन्यात त्याची चाचणी घेतली जाते. भारतात सन २०२३ मध्ये मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे, याची तांत्रिक माहिती घेण्यासाठी व रेल्वेत टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे बदल करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या ४० उच्च पदस्थ अधिकाºयांनी जपानला १२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान भेट दिली.जागरूकता महत्त्वाचीतेथील रेल्वे प्रशासनाला नागरिक जागरूक असल्यामुळे फार मोठे सहकार्य लाभते. तेथे कोणत्याही ठिकाणी इंचभरही कचरा व अस्वच्छता दिसत नाही. आपल्या देशातही लोकांमध्ये हळूहळू जागरूकता येत आहे. शेवटी नागरिकांच्या सहकार्याशिवाय स्वच्छता ठेवणे शक्य नाही.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ