शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्ती आल्यास अत्याधुनिक रेल्वे इंजिन एवढेच वाफेचे इंजिन ही महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 16:50 IST

जपानमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर रेल्वेसह अनेक विभागात केला जातो. तेथे रेल्वे ताशी १२० ते ३०० किलोमीटर प्रति ताशी धावते. टेक्नॉलॉजीचा वापरात देशात जपान सर्वात पुढे आहेत, परंतु त्यासोबतच पारंपरिक व जुन्या यंत्रणेलाही जपानमध्ये तितक्याच प्रमाणात महत्त्व दिले जाते. नैसर्गिक आपत्ती आल्यास वीजपुरवठा खंडित झाल्यास पारंपरिक वाफेचे इंजिन याचा आधार घेऊन तिथली यंत्रणा काम करत असते, अशी माहिती भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी जपान दौºयावरून आल्यानंतर ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देजपानमध्ये रेल्वे प्रशिक्षणानंतर सुनील मिश्रा यांची प्रतिक्रियामध्य रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांची निवड

भुसावळ, जि.जळगाव : जपानमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर रेल्वेसह अनेक विभागात केला जातो. तेथे रेल्वे ताशी १२० ते ३०० किलोमीटर प्रति ताशी धावते. टेक्नॉलॉजीचा वापरात देशात जपान सर्वात पुढे आहेत, परंतु त्यासोबतच पारंपरिक व जुन्या यंत्रणेलाही जपानमध्ये तितक्याच प्रमाणात महत्त्व दिले जाते. नैसर्गिक आपत्ती आल्यास वीजपुरवठा खंडित झाल्यास पारंपरिक वाफेचे इंजिन याचा आधार घेऊन तिथली यंत्रणा काम करत असते, अशी माहिती भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी जपान दौºयावरून आल्यानंतर ‘लोकमत’ला दिली.भारतीय रेल्वे मध्ये जपानच्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करता यावा तसेच रेल्वेच्या प्रशिक्षणासाठी रेल्वेच्या ४० अधिकाºयांना जपान दौºयावर पाठविण्यात आले होते. यात मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे सुनील मिश्रा व वरिष्ठ डीएसटी निशांत त्रिवेदी यांचा समावेश होता.जपानमध्ये सुरक्षेला फार महत्त्व दिले जाते. गाडी चालवताना रेल्वेचालकाला आरोग्याच्या दृष्टीने काही समस्या निर्माण झाल्यास इंजिनला स्वयंचलित ब्रेक लावलेले जाते. तसेच तेथील सिग्नल यंत्रणादेखील स्वयंचलित आहे.वाफेवरच्या इंजिनलाही तितकेच महत्वरेल्वे टेक्नॉलॉजीमध्ये जपान सर्वात पुढे असला सन १८८० च्या काळातील वाफेवरच्या इंजिनलाही तितकेच महत्त्व देऊन काळजीपूर्वक जतन करण्यात आले आहे. नैसर्गिकदृष्ट्या वीजपुरवठा खंडित झाला तर वाफेवरच्या इंधनाचा उपयोग करता यावा यासाठी एकेक महिन्यात त्याची चाचणी घेतली जाते. भारतात सन २०२३ मध्ये मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे, याची तांत्रिक माहिती घेण्यासाठी व रेल्वेत टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे बदल करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या ४० उच्च पदस्थ अधिकाºयांनी जपानला १२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान भेट दिली.जागरूकता महत्त्वाचीतेथील रेल्वे प्रशासनाला नागरिक जागरूक असल्यामुळे फार मोठे सहकार्य लाभते. तेथे कोणत्याही ठिकाणी इंचभरही कचरा व अस्वच्छता दिसत नाही. आपल्या देशातही लोकांमध्ये हळूहळू जागरूकता येत आहे. शेवटी नागरिकांच्या सहकार्याशिवाय स्वच्छता ठेवणे शक्य नाही.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ