शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मला पक्षशिस्त शिकवण्याची गरज नाही : माजी मंत्री एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 19:44 IST

मला पक्षशिस्त शिकवण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत भाजपा नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. पक्षात ४० वर्षे घालवली असून पक्षशिस्त मला माहीत आहे. त्यानुसारच मी वागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देउदय वाघ यांच्याबाबत प्रदेशाध्यक्षांशीही बोललोपोलीस अधीक्षक करताय दबावात कामपक्षाचे सर्व संकेत पाळत असतो.

जळगाव- मला पक्षशिस्त शिकवण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत भाजपा नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. पक्षात ४० वर्षे घालवली असून पक्षशिस्त मला माहीत आहे. त्यानुसारच मी वागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विधानाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना ते बोलत होते.शनिवारी सायंकाळी जळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी ही पत्रपरिषद झाली. यावेळी एका प्रश्नास उत्तर देताना ते म्हणाले की, अंजली दमानियांमार्फत माझी बदनामी करण्यामागे भाजपातील एका मंत्र्याचा हात आहे, हे विधान माझे नाहीच, तर सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांंनी हे विधान केले आहे. यावरुन मी मुख्यमंत्र्यांकडे हा मंत्री कोण? याची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच मुख्यमंत्र्यानीही याबाबत चौकशीचे आदेश दिले आहे. मी हे विधान केले नसताना माझ्या तोंडी ते घालण्यात आले. काय बोलावे व कोठे बोलावे हे मला समजते, असेही खडसे म्हणाले. त्यासाठी कुणी पक्षशिस्त शिकविण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.अवैध धंद्यात वाचविण्यासाठी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या पैशांच्या डिलींगबाबत जो आरोप झाला आहे, तो गंभीर आहे. माझ्यावर आरोप झाले असता मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. वाघ यांंनीही नैतिकता दाखवून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. आपली ही मागणी पक्षहिताच्या दृष्टीने असून आरोपात तथ्य नाही आढळले तर पुन्हा वाघ यांनी पद स्विकारावे, अशीच आपली भूमिका आहे. याबाबतही प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी आपण बोललो आहे. ही बाब पक्षापुढे ठेवल्यानंतरच मिडियापुढे मांडली. एवढेच नाही तर मी आज ही पत्रपरिषद बोलावली आहे, त्याबाबतही दानवे यांना कल्पना दिली आहे. त्यामुळे पक्षशिस्त मला सांगण्याची गरज नाही. मी सर्व संकेत पाळूनच वागत असतो, असेही खडसे म्हणाले.अंजली दमानिया यांच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात दाखल तक्रारीत चौकशी अधिकारी हा दमानिया यांच्या मागणीवरुन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांंनी बदलला असून कराळे हे कोणाच्या तरी दबावात किंवा आर्थिक व्यवहारामुळे नियमबाह्य काम करीत असल्याचा आरोपही खडसे यांनी पत्र परिषदेत केला.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेchandrakant patilचंद्रकांत पाटीलJalgaonजळगावPoliticsराजकारण