शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

वरणगाव येथे वृक्षतोडीमुळे बगळ्यांच्या दीडशे पिलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 02:00 IST

शरंंगगार जातीच्या वृक्षाची कत्तल केल्यामुळे या वृक्षावर वस्ती केलेल्या गायबगळे आणि पाणकावळ्यांच्या दिडशे पिलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच पक्षीप्रेमी चातक टिम आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोनशेच्यावर पक्षी वाचवण्यात आले.

ठळक मुद्देजखमी पिलांवर केले पक्षीप्रेमींनी उपचारवृक्षतोडीच्या चौकशीची पालिकेकडे मागणी

खिर्डी, ता रावेर जि. जळगाव : वरणगाव येथील रावजी बुवा समाधी परिसरातील शारंगगार जातीच्या झाडाची अज्ञात इसमाने शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास कत्तल केल्याने झाडावरील असलेले गायबगळे व पाणकावळ्यांची दिडशे छोटी पिल्ले व त्यांची अंडी मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. दरम्यान, चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या पक्षीमित्रांना माहिती मिळताच सदर ठिकाणी धाव घेवून त्यांनी दोनशेवर छोटया पिलांना वाचविण्यात यश मिळविले.परिसरातील नागरिकांना पक्षांचा त्रास होत होता, या हेतुने हे कृत्य केल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र याबाबत पक्षीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर पक्षी वाचविण्यासाठी चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या मार्गदर्शनाखालीव मदतकायार्साठी लक्ष्मीकांत नेवे, अपर्णा नेवे, सत्यपालसिंग राजपूत, अतुल वाणी, सुरेश ठाकूर, प्रशांत पाटील यांनी सहकार्य केले. तसेच मुक्ताईनगर वनविभागाचे अधिकारी एन.एम.वानखेड़े, सुनिल पाटील, देवचंद तायडे यांनीदेखील सहकार्य केले . दरम्यान, सदर घटनेची वनविभागाने चौकशी करुन वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करावी व पालिका प्रशासनाने वृक्षतोड़ीबाबत कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, याबाबत वरणगाव नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता तो झाला नाही. 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य