शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

वाघ वाचणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:29 PM

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा येथील पूर्णा नदीपात्रात आढळून आलेल्या वाघाच्या मृतदेहाविषयी कारणाचा उलगडा झाला आहे. उसाच्या शेतात मुक्कामी असलेल्या वाघाला तारेच्या कुंपणात वीज प्रवाह सोडून ठार मारण्यात आले. वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नायलॉनच्या दोरीने बांधून बैलांकरवी हा मृतदेह फरफटत नदीपात्राजवळ नेण्यात आला. तेथे तो पाण्यात ढकलून देण्यात आला. पाणी ...

- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा येथील पूर्णा नदीपात्रात आढळून आलेल्या वाघाच्या मृतदेहाविषयी कारणाचा उलगडा झाला आहे. उसाच्या शेतात मुक्कामी असलेल्या वाघाला तारेच्या कुंपणात वीज प्रवाह सोडून ठार मारण्यात आले. वाघाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नायलॉनच्या दोरीने बांधून बैलांकरवी हा मृतदेह फरफटत नदीपात्राजवळ नेण्यात आला. तेथे तो पाण्यात ढकलून देण्यात आला. पाणी पिण्यासाठी आलेला वाघ बुडून मेल्याची बतावणी करण्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा प्रयत्न फसला आहे. उसाच्या शेतात वाघाचे केस आढळले असून शेतापासून नदीपात्रापर्यंत फरफटल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत. वनविभागाने चौघा शेतकºयांना अटक केली आहे. पुढील कारवाई कायद्यानुसार होईल, पण वाघाच्या हत्येनंतर मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा वनक्षेत्रातील वाघांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोन महिन्यापूर्वीच एका वाघीणीचा मृत्यू झाला. ती वृध्द असल्याचे वनविभागाचे म्हणणे होते. त्यापूर्वीही सातत्याने वाघाचे मृत्यू, अपघाती मृत्यू घडत आहेत. दुर्देवाने स्थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधी, वनविभाग आणि वन्यजीवप्रेमी व्यक्ती आणि संस्था घटना घडल्यावर चर्चा करतात, मात्र नंतर पाठपुरावा होत नाही, हे वास्तव आहे. व्याघ्र संचार मार्ग, अधिवास क्षेत्र, सौर कुंपण, डोलारखेडा येथील शेतकºयांचे पुनर्वसन असे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. व्याघ्र संरक्षण रॅली काढली जाते. व्याघ्र परिषदा होतात. पण त्यात बाहेरगावाहून येणारे वक्ते भाषणे देतात; स्थानिक टाळ्या वाजवतात आणि सोहळा संपतो. पुन्हा पुढील वर्षी ‘ये रे माझ्या मागल्या’ असे होते. रोही, रानडुक्कर यांचा मोठा उपद्रव शेतकºयांना होतो. अन्नसाखळी असल्याने या प्राण्यांचा पाठलाग वाघ करतो आणि गारव्यामुळे केळी वा उसाच्या शेतात मुक्काम ठोकतो. तशा अर्थाने वाघ माणसाळलादेखील आहे. पण रोही, रानडुक्करांना मारण्याची परवानगी वनविभागाने दिली असली तरी ती प्रक्रिया सोपी नाही. वाघ गायब झाल्यावर विदर्भात रान पेटते. गहजब होतो. याठिकाणी तर लागोपाठ दोन वाघांचे मृत्यू झाले तरी प्रशासन गाढ झोपेत आहे. कागदे रंगवित आहे. शतकोटी वृक्ष लागवडीचा संकल्प चांगला असला तरी वन्यप्राणी नसतील, तर जंगल काय कामाचे?

टॅग्स :TigerवाघJalgaonजळगाव