शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
2
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
3
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
4
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
5
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
6
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
7
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
8
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
9
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
10
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
11
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
12
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
13
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
14
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
15
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
16
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
17
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
18
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
19
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
20
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने नांदगावमधील पेटत्या चुली विझल्या, अन्नदात्या शेतकऱ्यावरच उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सायगाव, ता. चाळीसगाव : सायगाव आणि संपूर्ण गिरणा व मन्याड परिसरात हातातोंडाशी आलेला घास वरुणराजाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सायगाव, ता. चाळीसगाव : सायगाव आणि संपूर्ण गिरणा व मन्याड परिसरात हातातोंडाशी आलेला घास वरुणराजाने हिरावून नेला. आज अनेक शेतकरी संसार उघड्यावर आल्याने उपाशी आहेत, तर अनेकांच्या घरी पुरानंतर चूलही पेटलेली नाही. खायचं काय? असा प्रश्न या जगाच्या पोशिंद्याला पडला आहे. विशेष म्हणजे कपाशी अतिवृष्टीने गिळंकृत केल्यानंतर शासनाने या पिकाला हमीभाव दिला आहे.

आज शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे की, संपूर्ण शेतीचा खर्चदेखील निघणार नाही आणि आज शासन कपाशीला जास्तीचा भाव देत आहे. म्हणजे शासनाने शेतकऱ्यांची अवहेलनाच केली अशी प्रतिक्रिया पूरग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे. ज्या वेळेस शेतकऱ्यांजवळ भरमसाठ कापूस राहतो, त्यावेळीस शासन शेतीमालाला चांगला भाव देत नाही आणि आज कापसाचे उत्पन्न कमी आहे तर जास्त भाव दिला गेल्याचे.

तेल गेले आणि तुपाला काय महत्त्व?

सायगाव परिसरच नव्हे तर आज संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात पावसाच्या जोरदार आगमनाने शेतकऱ्यांचे कधी नव्हे एवढे मोठे नुकसान झाले आहे. कोणाची कपाशी, कोणाचा ऊस व कोणाची इतर पिके रोगराईच्या कचाट्यात व पाण्याच्या धडाक्याने पूर्णत: नेस्तानाबूत झाली आहेत. नुकसानीने आज प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू येत आहेत आणि कपाशीला भाव म्हणजे शासन आज शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, अशी चर्चा शेतकरी आपापसांत करत आहेत. म्हणजे आज शेतकऱ्याजवळ माल नाही तर भाव आणि शेतकऱ्याजवळ माल राहिला तर भाव एकदम खाली, असा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांना तेल गेले आणि तुपाला काय महत्त्व? असाच झाला आहे.

शेतकऱ्यांना मदतीच्या हाताची गरज

सलग चार ते पाच दिवस वरुणराजा बरसला आणि शेतकऱ्यांचे सर्वांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. खासकरून सायगाव येथून जवळ असलेल्या नांद्रे गावाला एवढा मोठा तडाखा बसला आहे. कधी नव्हे एवढा मोठा धक्का बसला आहे. शेतीच्या शेती पूर्णत: पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. आज लाखोच्या घरात येणारी पिके नसल्याने त्यांच्या हातात एक छदाम पैसा येणार नाही. आमदार मंगेश चव्हाण एक दिवसाच्या दौऱ्यावर आल्यानंतर गावाकडे फिरकलेच नाही, असे तेथील लोकांनी सांगितले. आज नांद्रे येथे जाण्यासाठी पूल सोडला तर रस्तादेखील नाही आहे.

नांद्रेला शासनाची काहीच मदत नाही

सायगाव येथून जवळ असलेल्या नांद्रे गावाला जोरदार पावसाचा व पुराचा तडाखा बसला असल्याने नांद्रे गाव होरपळून निघाले आहे. आज गोरगरीब हातावर मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांना खायलादेखील अन्न नाही, अशा परिस्थितीत आपले नांद्रे गाव पूर्वपदावर आणण्यासाठी नांद्रे येथील उपसरपंच किरण पाटील यांनी स्वत:च्या खर्चाने खिचडी खाऊ घातली व तलाठी गणेश गढरी, मंडळ अधिकारी गणेश सोनवणे, कोतवाल सागर पाटील, उपसरपंच किरण पाटील, पोलीस पाटील नितीन निकम, सदस्य दीपक गांगुर्डे हे परोपरीने मदत करत आहेत. तहसीलदार अमोल मोरे, पुरवठा अधिकारी रणजित पाटील, रेशन दुकानदार संदीप पाटील यांनी तात्काळ मोफत रेशन वाटप केले आहे. किरण पाटील अहोरात्र झटून गावातील ग्रामस्थांच्या मदतीला धावून गेले आहेत.

आज नांद्रे गावांची परिस्थिती इतकी भयानक आहे की, गोरगरिबांना खायला अन्न नाही. गुराढोरांना चारा नाही. गावाला जाण्यायेण्यासाठी रस्ता नाही. फक्त पंचनामे पूर्ण केले आहेत. तरी गावाला तात्काळ मदत देण्यात यावी.

-किरण पाटील, उपसरपंच, नांद्रे