शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीने नांदगावमधील पेटत्या चुली विझल्या, अन्नदात्या शेतकऱ्यावरच उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सायगाव, ता. चाळीसगाव : सायगाव आणि संपूर्ण गिरणा व मन्याड परिसरात हातातोंडाशी आलेला घास वरुणराजाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सायगाव, ता. चाळीसगाव : सायगाव आणि संपूर्ण गिरणा व मन्याड परिसरात हातातोंडाशी आलेला घास वरुणराजाने हिरावून नेला. आज अनेक शेतकरी संसार उघड्यावर आल्याने उपाशी आहेत, तर अनेकांच्या घरी पुरानंतर चूलही पेटलेली नाही. खायचं काय? असा प्रश्न या जगाच्या पोशिंद्याला पडला आहे. विशेष म्हणजे कपाशी अतिवृष्टीने गिळंकृत केल्यानंतर शासनाने या पिकाला हमीभाव दिला आहे.

आज शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे की, संपूर्ण शेतीचा खर्चदेखील निघणार नाही आणि आज शासन कपाशीला जास्तीचा भाव देत आहे. म्हणजे शासनाने शेतकऱ्यांची अवहेलनाच केली अशी प्रतिक्रिया पूरग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे. ज्या वेळेस शेतकऱ्यांजवळ भरमसाठ कापूस राहतो, त्यावेळीस शासन शेतीमालाला चांगला भाव देत नाही आणि आज कापसाचे उत्पन्न कमी आहे तर जास्त भाव दिला गेल्याचे.

तेल गेले आणि तुपाला काय महत्त्व?

सायगाव परिसरच नव्हे तर आज संपूर्ण चाळीसगाव तालुक्यात पावसाच्या जोरदार आगमनाने शेतकऱ्यांचे कधी नव्हे एवढे मोठे नुकसान झाले आहे. कोणाची कपाशी, कोणाचा ऊस व कोणाची इतर पिके रोगराईच्या कचाट्यात व पाण्याच्या धडाक्याने पूर्णत: नेस्तानाबूत झाली आहेत. नुकसानीने आज प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू येत आहेत आणि कपाशीला भाव म्हणजे शासन आज शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, अशी चर्चा शेतकरी आपापसांत करत आहेत. म्हणजे आज शेतकऱ्याजवळ माल नाही तर भाव आणि शेतकऱ्याजवळ माल राहिला तर भाव एकदम खाली, असा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांना तेल गेले आणि तुपाला काय महत्त्व? असाच झाला आहे.

शेतकऱ्यांना मदतीच्या हाताची गरज

सलग चार ते पाच दिवस वरुणराजा बरसला आणि शेतकऱ्यांचे सर्वांत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. खासकरून सायगाव येथून जवळ असलेल्या नांद्रे गावाला एवढा मोठा तडाखा बसला आहे. कधी नव्हे एवढा मोठा धक्का बसला आहे. शेतीच्या शेती पूर्णत: पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. आज लाखोच्या घरात येणारी पिके नसल्याने त्यांच्या हातात एक छदाम पैसा येणार नाही. आमदार मंगेश चव्हाण एक दिवसाच्या दौऱ्यावर आल्यानंतर गावाकडे फिरकलेच नाही, असे तेथील लोकांनी सांगितले. आज नांद्रे येथे जाण्यासाठी पूल सोडला तर रस्तादेखील नाही आहे.

नांद्रेला शासनाची काहीच मदत नाही

सायगाव येथून जवळ असलेल्या नांद्रे गावाला जोरदार पावसाचा व पुराचा तडाखा बसला असल्याने नांद्रे गाव होरपळून निघाले आहे. आज गोरगरीब हातावर मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांना खायलादेखील अन्न नाही, अशा परिस्थितीत आपले नांद्रे गाव पूर्वपदावर आणण्यासाठी नांद्रे येथील उपसरपंच किरण पाटील यांनी स्वत:च्या खर्चाने खिचडी खाऊ घातली व तलाठी गणेश गढरी, मंडळ अधिकारी गणेश सोनवणे, कोतवाल सागर पाटील, उपसरपंच किरण पाटील, पोलीस पाटील नितीन निकम, सदस्य दीपक गांगुर्डे हे परोपरीने मदत करत आहेत. तहसीलदार अमोल मोरे, पुरवठा अधिकारी रणजित पाटील, रेशन दुकानदार संदीप पाटील यांनी तात्काळ मोफत रेशन वाटप केले आहे. किरण पाटील अहोरात्र झटून गावातील ग्रामस्थांच्या मदतीला धावून गेले आहेत.

आज नांद्रे गावांची परिस्थिती इतकी भयानक आहे की, गोरगरिबांना खायला अन्न नाही. गुराढोरांना चारा नाही. गावाला जाण्यायेण्यासाठी रस्ता नाही. फक्त पंचनामे पूर्ण केले आहेत. तरी गावाला तात्काळ मदत देण्यात यावी.

-किरण पाटील, उपसरपंच, नांद्रे