शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

कापसाच्या दमदार भावाचे सुख, शेतकऱ्याचा नशिबी नाहीच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:19 IST

मागणी वाढली मात्र उत्पादनात घट : भाव ९ हजारांपर्यंत जाऊनही अतिवृष्टीमुळे शेतातच सडतोय कापूस लोकमत न्यूज नेटवर्क अजय पाटील ...

मागणी वाढली मात्र उत्पादनात घट : भाव ९ हजारांपर्यंत जाऊनही अतिवृष्टीमुळे शेतातच सडतोय कापूस

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव -आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांचा कापसाला यावर्षी विक्रमी भाव मिळण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी मुहूर्ताच्या कापसाला ९ हजार रुपये क्विंटल इतका भाव जाहीर झाला असताना, दुसरीकडे मात्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा नशिबी हा चांगला भाव मिळण्याची शक्यता कमीच झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे पूर्व हंगामी कापूस शेतातच पडून खराब होत आहे. त्यामुळे कापसाला दमदार भाव मिळूनदेखील शेतकऱ्यांचे यंदाही नुकसानच होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

गेल्या काही वर्षांपासून अमेरिका व चीनमधील ट्रेडवॉरमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी घटली होती. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नव्हता. मात्र, यावर्षी ट्रेड वॉरचा कोणताही परिणाम कापसाच्या मागणीवर राहणार नसून, भारताची निर्यातदेखील यंदा वाढणार आहे. त्यातच गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा कापसाचा पेरादेखील कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढणार असल्याने यावर्षी कापसाला हमीभावापेक्षाही जास्त भाव शेतकऱ्यांना खासगी बाजारात मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र, ऐन वेचणीवर पीक आले असतानाच निसर्गाने केलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा आनंद औट घटकेचा ठरला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

कापसाच्या उत्पादनात २५ टक्के येणार घट

जिल्ह्यात यंदा ४ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात घट झाली होती. त्यातच गेल्या पंधरा दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण उत्पादनात २५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. विशेष करून पूर्व हंगामी लागवड झालेल्या कापसाच्या क्षेत्रात तर ४० टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता आहे.

खासगी बाजारात ७ हजारांपर्यंत मिळणार भाव?

एकीकडे आंतराष्ट्रीय बाजारात यंदा कापसाची मागणी असताना, दुसरीकडे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. मागणी जास्त व उत्पादन कमी असल्याने कापसाच्या भावात गेल्या वर्षाच्या तुलनेत १ हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. शासनाने निश्चित केलेला कापसाचा हमीभाव ६ हजार ५० इतका असला तरी शासकीय खरेदी केंद्रापेक्षाही खासगी बाजारात कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता असून, कापसाचे दर यंदा ७ हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

खान्देशात कापसाची झालेली लागवड - ९ लाख हेक्टर

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान - २५ ते ३० टक्के

उत्पादन होण्याची शक्यता - १३ लाख गाठी

कसा राहिल भाव - ६ हजार ते ७ हजारपर्यंत

शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता कमीच

खासगी बाजारात कापसाला ६ हजार ५०० पेक्षा अधिक भाव मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचा कापूस विक्रीचा कल हा खासगी जिनिंगवरच राहणार आहे. कारण शासकीय खरेदी केंद्रावर मिळणारा हमीभाव हा कमी असून, अनेक नियमांमुळे तो भावदेखील मिळण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे सीसीआयकडून यंदा खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.

---