शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 15:07 IST

कजगाव येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी, ता.भडगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथे तत्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे केली आहे

ठळक मुद्देगावासाठी तत्काळ टँकर सुरू करण्याची मागणीहिवाळ्यातच आटली गावविहीरग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंतीतितूर नदीत पावसाळ्यातही पाणी नाही

कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : कजगाव येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी, ता.भडगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथे तत्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे केली आहेसाधारण अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून येथे पाणी प्रश्न फारच बिकट बनला आहे. यामुळे गावापासून साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरावर उमरखेड शिवारात एक विहीर अधिग्रहित केली होती. जेमतेम पाण्यामुळे येथे साधारण पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असे. मात्र अधिग्रहित विहिरीनेदेखील तळ गाठल्याने पाणी प्रश्न बिकट झाला आह.ेगावातील विहिरी कोरड्या झाल्याया परिसरात गेल्या दोन वर्षांत पावसाळा तुरळक झाल्याने विहिरींत जलपातळ्या वाढल्या नाही. परिणामी गावातील विहिरी चक्क हिवाळ्यातच कोरड्या पडल्या आहेत. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळ नाही, विहिरी आटल्याने ग्रामस्थांना परिसरातील शेत शिवारातून बैलगाडी, सायकल, तर गोरगरिबांना चक्क डोक्यावर हंडे ठेवून पाणी आणावे लागत आहे.तितूर नदीचे पाणी हरणभडगाव तालुका हा संपूर्ण गिरणा लाभक्षेत्रात मोडला जातो. मात्र या तालुक्यातील पाच गावांना याचा कोणताही लाभ नाही. तर या पाच गावासाठी अमृत असलेल्या तितूर नदीचे पाणी पावसाळ्यातच गायब झाले आहे कारण तितूर नदीवर चाळीसगाव तालुका सीमेपर्र्यंत अनेक ठीकाणी सिमेंटचे पक्के बंधारे बनविण्यात आले आहेत. परिणामीे भडगाव तालुक्यातील गावात तितूर नदीचे पाणी आलेच नसल्याने मळगाव, तांदूळवाडी, भोरटेक, उमरखेड, कजगाव, पासर्डी या सहा गावांसह पाचोरा तालुक्यातील पिंप्री व घुसर्डी या आठ गावात तितूरचे पाणी चक्क पावसाळ्यातदेखील पोहोचले नाही. परिणामी आतापासून या गावात पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. यात मळगाव व तांदूळवाडीचा पाणी प्रश्न फारच बिकट झाला आहे इतर ही गावात पाणी समस्या आहे मात्र पर्याय शोधत पाणी प्रश्न काही प्रमाणात सोडविला जात आहे मात्र एप्रिलमध्ये या आठही गावात भीषण पाणीटंचाई निर्माण होईल असेच चित्र दिसत आहे.पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच गुरढोराचा पाणी प्रश्न बिकटमार्चच्या पहिल्याच आठवड्यात तांदूळवाडी येथे पाणी प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. येथे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान शेत शिवारातून पाणी आणून भागविली जात आहे. मात्र गुरढोराचा पाणी प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. कारण शेत शिवारातील अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत तर काहींनी तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत गुरांना पाणी उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.आठ खेड्यातील बहुतांश विहिरी कोरड्यागेल्या पावसाळ्यात वरील आठ गावात तितूर नदीत पाणी पोहचलेच नसल्याने शेत शिवारातील विहिरी,गावातील विहिरी यांच्या जल पातळ्या वाढल्या नसल्याने पाणी समस्या निर्माण होत आहे कारण बºयाच विहिरी या कोरड्या पडल्या आहेत तर काही विहिरी चोवीस तासच्या ब्रेकनंतर अर्धा ते एक तास चालतात. यात गुरढोराचा पाणी प्रश्न सुटत आहे 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव