शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

भडगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 15:07 IST

कजगाव येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी, ता.भडगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथे तत्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे केली आहे

ठळक मुद्देगावासाठी तत्काळ टँकर सुरू करण्याची मागणीहिवाळ्यातच आटली गावविहीरग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंतीतितूर नदीत पावसाळ्यातही पाणी नाही

कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : कजगाव येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी, ता.भडगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथे तत्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे केली आहेसाधारण अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून येथे पाणी प्रश्न फारच बिकट बनला आहे. यामुळे गावापासून साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरावर उमरखेड शिवारात एक विहीर अधिग्रहित केली होती. जेमतेम पाण्यामुळे येथे साधारण पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असे. मात्र अधिग्रहित विहिरीनेदेखील तळ गाठल्याने पाणी प्रश्न बिकट झाला आह.ेगावातील विहिरी कोरड्या झाल्याया परिसरात गेल्या दोन वर्षांत पावसाळा तुरळक झाल्याने विहिरींत जलपातळ्या वाढल्या नाही. परिणामी गावातील विहिरी चक्क हिवाळ्यातच कोरड्या पडल्या आहेत. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळ नाही, विहिरी आटल्याने ग्रामस्थांना परिसरातील शेत शिवारातून बैलगाडी, सायकल, तर गोरगरिबांना चक्क डोक्यावर हंडे ठेवून पाणी आणावे लागत आहे.तितूर नदीचे पाणी हरणभडगाव तालुका हा संपूर्ण गिरणा लाभक्षेत्रात मोडला जातो. मात्र या तालुक्यातील पाच गावांना याचा कोणताही लाभ नाही. तर या पाच गावासाठी अमृत असलेल्या तितूर नदीचे पाणी पावसाळ्यातच गायब झाले आहे कारण तितूर नदीवर चाळीसगाव तालुका सीमेपर्र्यंत अनेक ठीकाणी सिमेंटचे पक्के बंधारे बनविण्यात आले आहेत. परिणामीे भडगाव तालुक्यातील गावात तितूर नदीचे पाणी आलेच नसल्याने मळगाव, तांदूळवाडी, भोरटेक, उमरखेड, कजगाव, पासर्डी या सहा गावांसह पाचोरा तालुक्यातील पिंप्री व घुसर्डी या आठ गावात तितूरचे पाणी चक्क पावसाळ्यातदेखील पोहोचले नाही. परिणामी आतापासून या गावात पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. यात मळगाव व तांदूळवाडीचा पाणी प्रश्न फारच बिकट झाला आहे इतर ही गावात पाणी समस्या आहे मात्र पर्याय शोधत पाणी प्रश्न काही प्रमाणात सोडविला जात आहे मात्र एप्रिलमध्ये या आठही गावात भीषण पाणीटंचाई निर्माण होईल असेच चित्र दिसत आहे.पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच गुरढोराचा पाणी प्रश्न बिकटमार्चच्या पहिल्याच आठवड्यात तांदूळवाडी येथे पाणी प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. येथे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान शेत शिवारातून पाणी आणून भागविली जात आहे. मात्र गुरढोराचा पाणी प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. कारण शेत शिवारातील अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत तर काहींनी तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत गुरांना पाणी उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.आठ खेड्यातील बहुतांश विहिरी कोरड्यागेल्या पावसाळ्यात वरील आठ गावात तितूर नदीत पाणी पोहचलेच नसल्याने शेत शिवारातील विहिरी,गावातील विहिरी यांच्या जल पातळ्या वाढल्या नसल्याने पाणी समस्या निर्माण होत आहे कारण बºयाच विहिरी या कोरड्या पडल्या आहेत तर काही विहिरी चोवीस तासच्या ब्रेकनंतर अर्धा ते एक तास चालतात. यात गुरढोराचा पाणी प्रश्न सुटत आहे 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव