शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

भडगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 15:07 IST

कजगाव येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी, ता.भडगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथे तत्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे केली आहे

ठळक मुद्देगावासाठी तत्काळ टँकर सुरू करण्याची मागणीहिवाळ्यातच आटली गावविहीरग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंतीतितूर नदीत पावसाळ्यातही पाणी नाही

कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : कजगाव येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी, ता.भडगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथे तत्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे केली आहेसाधारण अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून येथे पाणी प्रश्न फारच बिकट बनला आहे. यामुळे गावापासून साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरावर उमरखेड शिवारात एक विहीर अधिग्रहित केली होती. जेमतेम पाण्यामुळे येथे साधारण पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असे. मात्र अधिग्रहित विहिरीनेदेखील तळ गाठल्याने पाणी प्रश्न बिकट झाला आह.ेगावातील विहिरी कोरड्या झाल्याया परिसरात गेल्या दोन वर्षांत पावसाळा तुरळक झाल्याने विहिरींत जलपातळ्या वाढल्या नाही. परिणामी गावातील विहिरी चक्क हिवाळ्यातच कोरड्या पडल्या आहेत. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळ नाही, विहिरी आटल्याने ग्रामस्थांना परिसरातील शेत शिवारातून बैलगाडी, सायकल, तर गोरगरिबांना चक्क डोक्यावर हंडे ठेवून पाणी आणावे लागत आहे.तितूर नदीचे पाणी हरणभडगाव तालुका हा संपूर्ण गिरणा लाभक्षेत्रात मोडला जातो. मात्र या तालुक्यातील पाच गावांना याचा कोणताही लाभ नाही. तर या पाच गावासाठी अमृत असलेल्या तितूर नदीचे पाणी पावसाळ्यातच गायब झाले आहे कारण तितूर नदीवर चाळीसगाव तालुका सीमेपर्र्यंत अनेक ठीकाणी सिमेंटचे पक्के बंधारे बनविण्यात आले आहेत. परिणामीे भडगाव तालुक्यातील गावात तितूर नदीचे पाणी आलेच नसल्याने मळगाव, तांदूळवाडी, भोरटेक, उमरखेड, कजगाव, पासर्डी या सहा गावांसह पाचोरा तालुक्यातील पिंप्री व घुसर्डी या आठ गावात तितूरचे पाणी चक्क पावसाळ्यातदेखील पोहोचले नाही. परिणामी आतापासून या गावात पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. यात मळगाव व तांदूळवाडीचा पाणी प्रश्न फारच बिकट झाला आहे इतर ही गावात पाणी समस्या आहे मात्र पर्याय शोधत पाणी प्रश्न काही प्रमाणात सोडविला जात आहे मात्र एप्रिलमध्ये या आठही गावात भीषण पाणीटंचाई निर्माण होईल असेच चित्र दिसत आहे.पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच गुरढोराचा पाणी प्रश्न बिकटमार्चच्या पहिल्याच आठवड्यात तांदूळवाडी येथे पाणी प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. येथे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान शेत शिवारातून पाणी आणून भागविली जात आहे. मात्र गुरढोराचा पाणी प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. कारण शेत शिवारातील अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत तर काहींनी तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत गुरांना पाणी उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.आठ खेड्यातील बहुतांश विहिरी कोरड्यागेल्या पावसाळ्यात वरील आठ गावात तितूर नदीत पाणी पोहचलेच नसल्याने शेत शिवारातील विहिरी,गावातील विहिरी यांच्या जल पातळ्या वाढल्या नसल्याने पाणी समस्या निर्माण होत आहे कारण बºयाच विहिरी या कोरड्या पडल्या आहेत तर काही विहिरी चोवीस तासच्या ब्रेकनंतर अर्धा ते एक तास चालतात. यात गुरढोराचा पाणी प्रश्न सुटत आहे 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव