शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

जळगावकरांसाठी गुड न्यूज! जळगावहून मुंबई विमान सेवा लवकरच सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 19:44 IST

जून महिन्यात या सेवेला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

भूषण श्रीखंडे 

जळगाव : भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार, उडान ५.० योजने अंतर्गत जळगावविमानतळावरून एप्रिल महिन्यात गोवा, हैद्राबाद तसेच २७ मे पासून पुणे विमानसेवा ‘फ्लाय ९१’या विमान कंपनीकडून सुरू आहे. त्यात आता मुंबई-जळगाव अशी विमान सेवा भारत सरकारच्या ‘अलायन्स’ या विमान सेवा कंपनीकडून लवकरच सुरू होणार आहे. याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाकडून हिरवा कंदील शुक्रवारी मिळाला असून अंतिम मंजूरीची प्रक्रिया सुरू असल्याने जून महिन्यात या सेवेला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

जळगावकरांना लगेच गाठता येणार मुंबईजळगावातील अनेकांना मंत्रालयात, व्यापार तसेच अन्य कामानिमित्त मुंबईला रेल्वे किंवा ट्रॅव्हलने जावे लागत असते. परंतू ८ ते १० तास प्रवास करून काम आटोपून पुन्हा लगेच रेल्वे व ट्रॅव्हलने प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुंबई-जळगाव विमान सेवा सुरू झाल्यावर अर्धा ते एक तासात मुंबई गाठता येणार आहे.

व्यापाऱ्यांसाठी सेवा फायदेशीरजळगावातील व्यापाऱ्यांना बऱ्याचवेळा मुंबईला व्यापार व उद्योग वाढीबाबत जावे लागत असते. परंतू मुंबईच्या प्रवासात अधिक वेळ जात असल्याने व्यापारी वर्गाकडून मुंबई-जळगाव विमान सेवा सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मागणी केली जात होती. या मागणीनुसार अलायन्स विमान कंपनीकडून मुंबई-जळगाव विमान सेवेला मान्यता मिळाली असून जून महिन्यात ही विमान सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना या सेवेचा मोठा फायदा मिळणार आहे.

भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने 'अलायन्स एअर' या विमान कंपनीला जळगाव विमानतळावरून मुंबईची विमानसेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे जळगावकरांसाठी व्यापार व उद्योग वाढीच्या दुष्टीकोनातून आनंदाची बाब आहे. गोवा व पुणे पाठोपाठ मुंबईचींही विमानसेवा सुरू होत असल्यामुळे, जळगावच्या हवाई सेवेला विशेष महत्व प्राप्त होणार आहे. - सुनीत कोठारी, अध्यक्ष, नागरी विमान वाहतुक समिती आणि जनसंपर्क समिती औरंगाबाद पर्यटन विकास प्रतिष्ठान.

जळगाव विमानतळावरून आता मुंबई विमान सेवा देखील सुरू होणार आहे. या विमान सेवेसाठी चांगला स्लॉट मिळायला हवा जेणेकरून मुंबईला जाणारे व्यक्ती काम करून लगेच पुन्हा परत येऊ शकतील. - पुरूषोत्तम टावरी, कॅटचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष

टॅग्स :Jalgaonजळगावairplaneविमान