शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

सोने-चांदीच्या दराचा विक्रम; चांदी ६०,५०० रुपयांवर; सोनेही बनले ५१ हजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 22:44 IST

चांदीमध्ये एकाच दिवसात ६,५०० रुपयांनी वाढ; जागतिक बाजारात जाणवतो तुटवडा

जळगाव : जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात चांदीची खरेदी वाढल्याने व आवकही कमी असल्याने चांदीच्या भावात एकाच दिवसात ६,५०० रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे चांदीचे दर थेट ६०,५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. अशाच प्रकारे सोन्याच्या दरामध्येही एक हजार रुपयांनी वाढ होऊन ते ५१ हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहेत. या दोन्ही दरांनी नवीन उच्चांक नोंदविले.

कोरोनाच्या संकटात अनेक उद्योग, व्यवसाय डबघाईस येत असताना त्यांच्यातील गुंतवणूकही घटत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढल्याने या मौल्यवान धातूंची मागणी वाढतच आहे. त्यात अमेरिकन बँकांसह परदेशातील विविध बँकांनी व्याजदर शून्य केल्यानेदेखील सोने-चांदीत गुंतवणूक वाढून जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या भावात वाढ होत आहे.

गेल्या एक-दोन दिवसात जागतिक पातळीवर चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे झपाट्याने भाववाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सोने-चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याने नवनवे विक्रम गाठले जात आहेत. यात आता तर एकाच दिवसात थेट ६,५०० रुपयांची वाढ ही सर्वात मोठी वाढ मानली जात आहे.

गेल्या आठवड्यात चांदी ५४ हजार रुपये प्रतिकिलोवर होती. मात्र आता अचानक बुधवारी (दि. २२) त्यामध्ये ६,५०० रुपयांची वाढ होऊन ती ६० हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. दोन आठवड्यांमध्ये चांदीमध्ये तब्बल १० हजार रुपयांची वाढ झाली आहे.सुवर्णनगरी जळगावात ७ ते १३ जुलैदरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात आले. त्या वेळी लॉकडाऊनपूर्वी चांदी ५०,५०० रुपयांवर होती. त्यानंतर १४ रोजी सुवर्णपेढ्या सुरू होताच चादीच्या भावात ३,५०० रुपयांनी वाढ होऊन ती ५४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली होती.

सोनेही एक हजाराने वधारले

चांदीसोबतच सोन्याच्याही भावात वाढ झाली असून, सोने एक हजार रुपयांनी वधारून ते ५१ हजार रुपये प्रतितोळा झाले आहे. सोन्यातदेखील दोन आठवड्यांमध्ये १,८०० रुपयांनी वाढ झाली आहे. ७ जुलैच्या लॉकडाऊनपूर्वी सोने ४९,२०० रुपयांवर होते. त्यानंतर १४ रोजी सुवर्णपेढ्या सुरू होताच सोन्याचे भाव ८०० रुपयांनी वाढून ते ५० हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. आता पुन्हा त्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.

जागतिक घडामोडींचा परिणाम होऊन सोने-चांदीत भाववाढ होत आहे. त्यातच जागतिक पातळीवर मोठी खरेदी होऊन बाजारात तुटवडा भासत असल्याने चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. सध्याची स्थिती पाहता भविष्यात भाववाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन

टॅग्स :GoldसोनंMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत