शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
2
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
3
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
4
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
5
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
6
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
7
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
8
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
10
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
11
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
12
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
13
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
14
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
15
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
16
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
17
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
18
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
19
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
20
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट काम करणा-यांचा गौरव, मग काम न करणा-यांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 11:48 IST

पोलीस दलात गुन्ह्यांशी संबंधित उत्कृष्ट कामगिरी तसेच समाजात जावून चांगले काम करणा-यांचा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शुक्रवारी गुन्हे आढावा बैठकीत गौरव केला. या गौरव सोहळ्याने हे कर्मचारी व पोलीस पाटील यांची छाती भरुन आली आहे, भविष्यात चांगले काम करणा-यांची उर्जाच त्यांना या निमित्ताने मिळाली आहे.विजयसिंग पाटील व नरेंद्र वारुळे यांचे कार्य खरोखरच गौरवास्पद आहे. त्यांच्या कार्याची प्रथमच दखल घेण्यात आली.

ठळक मुद्देविश्लेषणगुन्ह्यांचा आलेख वाढतच चाललाघरगुती कामांनाही जुंपले कर्मचा-यांना

सुनील पाटीलजळगाव :पोलीस दलात गुन्ह्यांशी संबंधित उत्कृष्ट कामगिरी तसेच समाजात जावून चांगले काम करणा-यांचा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी शुक्रवारी गुन्हे आढावा बैठकीत गौरव केला. या गौरव सोहळ्याने हे कर्मचारी व पोलीस पाटील यांची छाती भरुन आली आहे, भविष्यात चांगले काम करणा-यांची उर्जाच त्यांना या निमित्ताने मिळाली आहे.विजयसिंग पाटील व नरेंद्र वारुळे यांचे कार्य खरोखरच गौरवास्पद आहे. त्यांच्या कार्याची प्रथमच दखल घेण्यात आली. या कर्मचा-यांना गौरव सोहळा पाहून अन्य कर्मचाºयांनीही आपणही अशा गौरवास पात्र ठरले पाहिजे, त्यासाठी प्रामाणिकपणे काम करणे गरजेचे आहे. पोलीस दलात आजही अनेक अधिकारी व कर्मचारी कुठलाही स्वार्थ न ठेवता कर्तव्य म्हणून आपले चोख कामगिरी बजावत आहेत. तर आजही अनेक कर्मचारी असे आहेत की ते आपले कर्तव्य व जबाबदारी विसरले आहेत. जो कर्मचारी काम करतो..तो कामच करीत असतो...काही जण सरकारी पगार घेऊन अधिका-याच्या घरची कामे करतात..व त्याच्यातच ते धन्यही मानतात. तत्कालिन पोलीस महासंचालक प्रवीण दिक्षित यांनीही या मुद्यावर मर्मस्पर्श पत्र लिहिले आहे. कोणताही पोलीस कर्मचारी अधिका-यांचे घरचे किंवा त्यांच्या बायकांचे कामे करण्यासाठी नाही...अनेक अधिकारी मुलांना शाळेत सोडणे, भाजी आणणे, बायकोला पार्लरला घेऊन जाणे असे कामे कर्मचा-यांना लावतात व कर्मचारीही ती मुकाट्याने करतात..यावर दिक्षित यांनी आक्षेप घेत पत्रात नाराजी व्यक्त केली आहे. ही परिस्थिती मुंबईपासून नागपूरपर्यंत सारखीच आहे. जळगावाताही काही फारशी वेगळी नाही. काही कर्मचा-यांची घरघडी म्हणूनच ओळख तयार झाली आहे. अशा कर्मचा-यांकडून तपासाची काय अपेक्षा करणार...विशेष म्हणजे अशाच कर्मचा-यांच्या सोयीनुसार बदल्या तसेच पदके मिळतात..हे मोठे दुर्देव आहे.काम करणा-यांची छाप पडतेच...तसेच दिखावू काम करणारेही उघडे पडतात...सातत्याने क्राईम वाढत असताना प्रत्येक कर्मचा-यावर जबाबदारी निश्चित करुन त्याचा पंधरा दिवसांनी आढावा घेतल्यास कामचुकार कर्मचारी वठणीवर येतील. तत्कालिन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी हाच प्रयोग राबवून कामचुकारांना कामाला जुंपले होते...आता तोच प्रयोग राबविण्याची वेळ आली आहे. तेव्हाच गुन्हे नियंत्रणात राहतील व घडलेल्या गुन्ह्यांचाही उलगडा होऊ शकतो.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव