शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गिरणा परिसरात रब्बी हंगामाचे यंदा तीन-तेरा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:05 IST

चाळीसगाव तालुक्यात पावसाअभावी खरीप हंगामाने मार खाल्ल्यानंतर रब्बी हंगामाचीही आता आशा धूसर होत चालली आहे.

ठळक मुद्देनद्या- नाले कोरडे, विहीरींनी गाठला तळ, पाण्याचे दूर्भिक्षशेतकºयांवर संकटांची मालिका, पैसेवारी कमी लावण्याची मागणी

सायगाव ता. चाळीसगाव :चाळीसगाव तालुक्यातील सायगांव व मन्याड परिसरांतील आणि मन्याड धरणांवर विसंबून असलेल्या २२ गावांमध्ये या वर्षी रब्बी हंगामाचे तिन तेरा वाजणार हे आता निश्चित झाले असून मन्याड धरणात केवळ मृत जलसाठा शिल्लक असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.दरम्यान, दरवर्षी नवरात्रोत्सवात रब्बी पिकांची पेरणी केली जाते. परंतु यंदा पुरेसा पाऊस आणि प्रकल्पांमध्ये पाणी नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशेचा सूर उमटत असून पहिल्यांदाच शेतकरी वर्ग रब्बी हंगामाला मुकणार आहे. त्यामुळे शेतीच्या बाबतीत भाद्रपदाचे कडक ऊन आणि त्यात पाण्याची कमतरता भासत असल्याने दुष्काळात तेरावा माहिना असाच प्रकार म्हटला जात आहे.आणि शेतकरी झाला हताशयंदा हवामान खात्याने भरलेली हुल आणि इकडे शेतकºयांची उडालेली धांदल त्यात पुढे पावसाने लावलेली हजेरी. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी वाटत असतानांच हवामान खात्याने वर्तविलेले पावसाचे भाकीत पूर्णपणे निष्फळ ठरले. त्यातून आशेवर असलेला शेतकरी संकटात सापडला. पावसाळा संपला तरी परिस्थिती सुधारलीच नाही. परिणामी बळीराजा निराशेच्या गर्तेत सापडला असून कधी नव्हे एवढी भयानक परिस्थिती यंदा या परिसरात पाहायला मिळत आहे दुसरीकडे शेतकºयांनी लावलेली खरीपाची पिके पाण्याअभावी पूर्णपणे करपून गेल्याने शेतकरी अत्यंत हताश झाला आहे.कर्ज फेडण्याची चिंतासायगांव व परिसरांतील शेतकºयांनी कुणी सावकारी कर्ज, कुणी बँकेचे कर्ज घेवून आपल्या शेतीचे गणित ठरविले होते. पण यंदा पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने शेतकरी हताश झाला असून त्यांच्यापुढे एकच प्रश्न आ वासून उभा आहे. तो म्हणजे डोक्यावरील कर्ज फेडायचे कसे? या चिंतेचा घोर त्याला लागला असून सरकारी पातळीवर मात्र या पार्श्वभूमीवर काहीही हालचाल दिसत नसल्याने त्याच्या नैराश्यात भर पडली आहे. दुसरीकडे गुरा ढोरांना जगविण्याचा प्रश्नही त्याच्यापुढे उभा ठाकला आहे. त्यांना वेळेवर चारा पाणी मिळाले नाही तर..त्यामुळे पशुधन ठेवायचे की विकायचे हाही पेच बळीराजापुढे उभा आहे. कारण या वर्षी चाºयाची टंचाई देखील मोठ्या प्रमाणावर भासणार असल्याची स्थिती जवळ जवळ येऊन ठेपली आहे.गिरणा व मन्याड परिसरात पैसेवारी कमी लावण्याची मागणीसायगांव व गिरणा, मन्याड परिसरात या वर्षी पाऊसच झाला नसल्याने जे येणारे उत्पन्न होते ते देखील मोठया प्रमाणावर घटले असून डोक्यावरील कर्जाचा भार वाढणार असल्याने येणारे दिवस काय घेऊन येतात, या चिंतेने शेतकरी पुर्णता खचला आहे.यावर्षीचे तीन आणि पुढील वर्षाचे उन्हाळ्यासह सहा महिने कसे काढता येतील हा मोठा प्रश्न त्याला सतावत आहे. त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करून आणि लोकप्रतिनिधींनी यात जातीने लक्ष घालून पैसेवारी कमी लावण्यात यावी अशी मागणी परिसरांतून होत आहे . 

टॅग्स :droughtदुष्काळ