शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

गिरणा परिसरात रब्बी हंगामाचे यंदा तीन-तेरा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:05 IST

चाळीसगाव तालुक्यात पावसाअभावी खरीप हंगामाने मार खाल्ल्यानंतर रब्बी हंगामाचीही आता आशा धूसर होत चालली आहे.

ठळक मुद्देनद्या- नाले कोरडे, विहीरींनी गाठला तळ, पाण्याचे दूर्भिक्षशेतकºयांवर संकटांची मालिका, पैसेवारी कमी लावण्याची मागणी

सायगाव ता. चाळीसगाव :चाळीसगाव तालुक्यातील सायगांव व मन्याड परिसरांतील आणि मन्याड धरणांवर विसंबून असलेल्या २२ गावांमध्ये या वर्षी रब्बी हंगामाचे तिन तेरा वाजणार हे आता निश्चित झाले असून मन्याड धरणात केवळ मृत जलसाठा शिल्लक असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.दरम्यान, दरवर्षी नवरात्रोत्सवात रब्बी पिकांची पेरणी केली जाते. परंतु यंदा पुरेसा पाऊस आणि प्रकल्पांमध्ये पाणी नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशेचा सूर उमटत असून पहिल्यांदाच शेतकरी वर्ग रब्बी हंगामाला मुकणार आहे. त्यामुळे शेतीच्या बाबतीत भाद्रपदाचे कडक ऊन आणि त्यात पाण्याची कमतरता भासत असल्याने दुष्काळात तेरावा माहिना असाच प्रकार म्हटला जात आहे.आणि शेतकरी झाला हताशयंदा हवामान खात्याने भरलेली हुल आणि इकडे शेतकºयांची उडालेली धांदल त्यात पुढे पावसाने लावलेली हजेरी. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी वाटत असतानांच हवामान खात्याने वर्तविलेले पावसाचे भाकीत पूर्णपणे निष्फळ ठरले. त्यातून आशेवर असलेला शेतकरी संकटात सापडला. पावसाळा संपला तरी परिस्थिती सुधारलीच नाही. परिणामी बळीराजा निराशेच्या गर्तेत सापडला असून कधी नव्हे एवढी भयानक परिस्थिती यंदा या परिसरात पाहायला मिळत आहे दुसरीकडे शेतकºयांनी लावलेली खरीपाची पिके पाण्याअभावी पूर्णपणे करपून गेल्याने शेतकरी अत्यंत हताश झाला आहे.कर्ज फेडण्याची चिंतासायगांव व परिसरांतील शेतकºयांनी कुणी सावकारी कर्ज, कुणी बँकेचे कर्ज घेवून आपल्या शेतीचे गणित ठरविले होते. पण यंदा पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने शेतकरी हताश झाला असून त्यांच्यापुढे एकच प्रश्न आ वासून उभा आहे. तो म्हणजे डोक्यावरील कर्ज फेडायचे कसे? या चिंतेचा घोर त्याला लागला असून सरकारी पातळीवर मात्र या पार्श्वभूमीवर काहीही हालचाल दिसत नसल्याने त्याच्या नैराश्यात भर पडली आहे. दुसरीकडे गुरा ढोरांना जगविण्याचा प्रश्नही त्याच्यापुढे उभा ठाकला आहे. त्यांना वेळेवर चारा पाणी मिळाले नाही तर..त्यामुळे पशुधन ठेवायचे की विकायचे हाही पेच बळीराजापुढे उभा आहे. कारण या वर्षी चाºयाची टंचाई देखील मोठ्या प्रमाणावर भासणार असल्याची स्थिती जवळ जवळ येऊन ठेपली आहे.गिरणा व मन्याड परिसरात पैसेवारी कमी लावण्याची मागणीसायगांव व गिरणा, मन्याड परिसरात या वर्षी पाऊसच झाला नसल्याने जे येणारे उत्पन्न होते ते देखील मोठया प्रमाणावर घटले असून डोक्यावरील कर्जाचा भार वाढणार असल्याने येणारे दिवस काय घेऊन येतात, या चिंतेने शेतकरी पुर्णता खचला आहे.यावर्षीचे तीन आणि पुढील वर्षाचे उन्हाळ्यासह सहा महिने कसे काढता येतील हा मोठा प्रश्न त्याला सतावत आहे. त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करून आणि लोकप्रतिनिधींनी यात जातीने लक्ष घालून पैसेवारी कमी लावण्यात यावी अशी मागणी परिसरांतून होत आहे . 

टॅग्स :droughtदुष्काळ