शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Girish Mahajan : 'गेंड्याच्या कातड्याचं म्हणावं तर गेंड्यालाही लाज वाटेल इतकं निर्लज्ज सरकार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 20:45 IST

गिरीश महाजन यांना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आणि एसटी बंद असल्याने होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

जळगाव - जैश-ए-मोहम्मद या जहाल अतिरेकी संघटनेकडून नागपुरात रेकी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मदसारख्या जहाल संघटनेकडून नागपुरात रेकी झाली असेल, तर हा संघ मुख्यालयासह नागपूरसाठी मोठा धोका मानला जात आहे. दरम्यान, या वृत्तानंतर भाजपा नेते आमदार गिरीश महाजन यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या जातीयवादी संघटना चवताळल्या असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, राज्य सरकारच्या कामकाजावरही त्यांनी बोचरी टीका केली.  

गिरीश महाजन यांना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आणि एसटी बंद असल्याने होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना हे सरकार इतिहासातील सर्वात निष्क्रीय आणि निर्लज्ज सरकार असल्याची बोचरी टीका महाजन यांनी केली. 

अतिशय निष्क्रीय सरकार, आजपर्यंतच्या इतिहासातील इतक निष्क्रीय सरकार महाराष्ट्राने पाहिलं नाही. संवेदना नसलेलं, संवेदनाहीन, गेंड्याच्या कातड्याचं म्हणावं तर गेंड्यालाही लाज वाटले, इतकं निर्लज्ज सरकार आहे. कोणाशीही कोणाला घेणं देणं नाही. कुठलाही मंत्री कुठेही आंदोलनकर्त्याला जाऊन भेटत नाही. राज्यातील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील रक्तवाहिनी असलेली एसटी ही बंद पडलेली आहे, पण कुणालाही घेणं देणं नाही. कोणीही त्यांना जाऊन भेटत नाही. सगळ्यांची आपली-आपली अरेरावी चाललीय. दादागिरी सरकारची चाललीय. म्हणूनच, जनतेचे हाल सुरू असून, एसटीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, वीजेचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, नोकरभरतीचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न वेशिला टांगले आहेत, असे म्हणत महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केली. 

सरकारची दुटप्पी भूमिका

आमदार गिरीश महाजन यांनी सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. एकासाठी एक न्याय आणि दुसऱ्यासाठी दुसरा का? असा सवाल महाजन यांनी विचारला. सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांबद्दल बोलल्यास लगेच कारवाई होते, पण विरोधी पक्षनेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांवर काहीच कारवाई होत नाही. सोशल मीडियातून सत्ताधार्‍यांबाबत काही जरी बोलले तरी त्यांना अटक होते. तर विरोधकांबाबत अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य करुनही काहीच कारवाई होत नसल्याची बाब ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका महाजन यांनी केली.  

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनUddhav Thackerayउद्धव ठाकरेGovernmentसरकारST Strikeएसटी संप