शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

Girish Mahajan : 'गेंड्याच्या कातड्याचं म्हणावं तर गेंड्यालाही लाज वाटेल इतकं निर्लज्ज सरकार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 20:45 IST

गिरीश महाजन यांना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आणि एसटी बंद असल्याने होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

जळगाव - जैश-ए-मोहम्मद या जहाल अतिरेकी संघटनेकडून नागपुरात रेकी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मदसारख्या जहाल संघटनेकडून नागपुरात रेकी झाली असेल, तर हा संघ मुख्यालयासह नागपूरसाठी मोठा धोका मानला जात आहे. दरम्यान, या वृत्तानंतर भाजपा नेते आमदार गिरीश महाजन यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या जातीयवादी संघटना चवताळल्या असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, राज्य सरकारच्या कामकाजावरही त्यांनी बोचरी टीका केली.  

गिरीश महाजन यांना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आणि एसटी बंद असल्याने होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना हे सरकार इतिहासातील सर्वात निष्क्रीय आणि निर्लज्ज सरकार असल्याची बोचरी टीका महाजन यांनी केली. 

अतिशय निष्क्रीय सरकार, आजपर्यंतच्या इतिहासातील इतक निष्क्रीय सरकार महाराष्ट्राने पाहिलं नाही. संवेदना नसलेलं, संवेदनाहीन, गेंड्याच्या कातड्याचं म्हणावं तर गेंड्यालाही लाज वाटले, इतकं निर्लज्ज सरकार आहे. कोणाशीही कोणाला घेणं देणं नाही. कुठलाही मंत्री कुठेही आंदोलनकर्त्याला जाऊन भेटत नाही. राज्यातील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील रक्तवाहिनी असलेली एसटी ही बंद पडलेली आहे, पण कुणालाही घेणं देणं नाही. कोणीही त्यांना जाऊन भेटत नाही. सगळ्यांची आपली-आपली अरेरावी चाललीय. दादागिरी सरकारची चाललीय. म्हणूनच, जनतेचे हाल सुरू असून, एसटीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, वीजेचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, नोकरभरतीचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न वेशिला टांगले आहेत, असे म्हणत महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केली. 

सरकारची दुटप्पी भूमिका

आमदार गिरीश महाजन यांनी सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. एकासाठी एक न्याय आणि दुसऱ्यासाठी दुसरा का? असा सवाल महाजन यांनी विचारला. सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांबद्दल बोलल्यास लगेच कारवाई होते, पण विरोधी पक्षनेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांवर काहीच कारवाई होत नाही. सोशल मीडियातून सत्ताधार्‍यांबाबत काही जरी बोलले तरी त्यांना अटक होते. तर विरोधकांबाबत अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य करुनही काहीच कारवाई होत नसल्याची बाब ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका महाजन यांनी केली.  

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनUddhav Thackerayउद्धव ठाकरेGovernmentसरकारST Strikeएसटी संप