शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये हाहाकार! २,००० फ्लॅट्सचे गगनचुंबी टॉवर एकाचवेळी पेटले, १३ जणांचा मृत्यू...
2
"प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्याची धमकी, न्यूड फोटोने ब्लॅकमेलिंग, इतर पुरुषांसोबत...!"; सेलिना जेटलीचे पतीवर 7 गंभीर आरोप
3
राम मंदिर ध्वजारोहणावर बोलणं पाकिस्तानवा महागात पडलं, भारतानं आरसा दाखवत गप-गार केलं!
4
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
5
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
6
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
7
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
8
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
9
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
12
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
13
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
14
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
15
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
17
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
18
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
19
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
20
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
Daily Top 2Weekly Top 5

Girish Mahajan : 'गेंड्याच्या कातड्याचं म्हणावं तर गेंड्यालाही लाज वाटेल इतकं निर्लज्ज सरकार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 20:45 IST

गिरीश महाजन यांना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आणि एसटी बंद असल्याने होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

जळगाव - जैश-ए-मोहम्मद या जहाल अतिरेकी संघटनेकडून नागपुरात रेकी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. जैश-ए-मोहम्मदसारख्या जहाल संघटनेकडून नागपुरात रेकी झाली असेल, तर हा संघ मुख्यालयासह नागपूरसाठी मोठा धोका मानला जात आहे. दरम्यान, या वृत्तानंतर भाजपा नेते आमदार गिरीश महाजन यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून या जातीयवादी संघटना चवताळल्या असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, राज्य सरकारच्या कामकाजावरही त्यांनी बोचरी टीका केली.  

गिरीश महाजन यांना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आणि एसटी बंद असल्याने होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना हे सरकार इतिहासातील सर्वात निष्क्रीय आणि निर्लज्ज सरकार असल्याची बोचरी टीका महाजन यांनी केली. 

अतिशय निष्क्रीय सरकार, आजपर्यंतच्या इतिहासातील इतक निष्क्रीय सरकार महाराष्ट्राने पाहिलं नाही. संवेदना नसलेलं, संवेदनाहीन, गेंड्याच्या कातड्याचं म्हणावं तर गेंड्यालाही लाज वाटले, इतकं निर्लज्ज सरकार आहे. कोणाशीही कोणाला घेणं देणं नाही. कुठलाही मंत्री कुठेही आंदोलनकर्त्याला जाऊन भेटत नाही. राज्यातील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील रक्तवाहिनी असलेली एसटी ही बंद पडलेली आहे, पण कुणालाही घेणं देणं नाही. कोणीही त्यांना जाऊन भेटत नाही. सगळ्यांची आपली-आपली अरेरावी चाललीय. दादागिरी सरकारची चाललीय. म्हणूनच, जनतेचे हाल सुरू असून, एसटीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, वीजेचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, नोकरभरतीचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न वेशिला टांगले आहेत, असे म्हणत महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केली. 

सरकारची दुटप्पी भूमिका

आमदार गिरीश महाजन यांनी सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला आहे. एकासाठी एक न्याय आणि दुसऱ्यासाठी दुसरा का? असा सवाल महाजन यांनी विचारला. सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांबद्दल बोलल्यास लगेच कारवाई होते, पण विरोधी पक्षनेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांवर काहीच कारवाई होत नाही. सोशल मीडियातून सत्ताधार्‍यांबाबत काही जरी बोलले तरी त्यांना अटक होते. तर विरोधकांबाबत अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य करुनही काहीच कारवाई होत नसल्याची बाब ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका महाजन यांनी केली.  

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनUddhav Thackerayउद्धव ठाकरेGovernmentसरकारST Strikeएसटी संप