शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

गिरीश महाजन गोवा, पश्चिम बंगालमधील प्रचारात; इकडे शिवसेनेनं केली भाजपावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 10:28 IST

भाजपला अडीच वर्षांत शहराचा चेहरा-मोहरा तर काही बदलता आला नाही, मात्र भाजपचाच चेहरा-मोहरा बदलून गेला आहे. भाजपला पुन्हा मनपातील बहुमत गमवावे लागले आहे.

>> अजय पाटील

जळगाव : चार वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ‘आमच्या हाती सत्ता द्या, वर्षभरात शहराचा चेहरा-मोहरा बदलवून दाखवू’ अशी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या हाकेला जळगावकरांनी साथ देत, महापालिकेत भाजपच्या तब्बल ५७ जागा जिंकवून, स्पष्ट बहुमत दिले. मात्र, भाजपला अडीच वर्षांत शहराचा चेहरा-मोहरा तर काही बदलता आला नाही, मात्र भाजपचाच चेहरा-मोहरा बदलून गेला आहे. भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले माजी मंत्री गिरीश इतर राज्यांमधील प्रचारात व्यस्त असताना, शिवसेनेने दुसरीकडे भाजपवर मात केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव शहरातील भाजपच्या संघटनकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचाच आरोप आता भाजपमधील नगरसेवक करू लागले आहेत. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाजपला सातत्याने गळती लागली असून, महापालिकेतील सत्ता गमाविल्यानंतर आता ऑक्टोबर २०२१ मध्ये काही नगरसेवकांची घरवापसी करून, मनपात बहुमत मिळवले होते. मात्र, आता भाजपला पुन्हा मनपातील बहुमत गमवावे लागले आहे.

महाजनांचे दुर्लक्ष, भोळे जिल्ह्यात व्यस्त

१. महापालिकेतील भाजपवर माजी मंत्री गिरीश महाजन यांचा एकहाती दबदबा होता. मात्र, २०१९ मध्ये राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर गिरीश महाजनांचे जळगाव महापालिकेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. त्यात राज्य शासनाकडील १०० कोटींच्या निधीवर शासनाने स्थगिती आणल्यानंतर राज्य शासनानेही महापालिकेत भाजपची कोंडी केली.

२. गिरीश महाजनांचे दुर्लक्ष होत असतानाच, शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्षपद आल्यामुळे सुरेश भोळे हे देखील जिल्ह्यात व्यस्त झाल्यामुळे शहराकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांवर जो बड्या नेत्याचा अंकुश असायला पाहिजे तो त्यांच्यावर राहिला नाही. त्यात नगरसेवकांच्या प्रभागातील कामेदेखील होत नसल्याने, नगरसेवकांची नाराजी वाढत जात आहे.

५८ कोटींचा निधी आणि नगरसेवकांच्या कोलांटउड्या

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२३ मध्ये होणार आहे. तसेच गेल्या चार वर्षात अनेक प्रभागांमधील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. एकीकडे शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामांसाठी भरघोस निधी मिळत असताना, दुसरीकडे भाजप नगरसेवकांच्या प्रभागात मात्र समस्या कायम आहेत. त्यात आता ५८ कोटींच्या निधीतून शहरातील विकासकामांचे प्रस्ताव मागविले जात असताना, त्यामध्ये काही कामे आपल्या प्रभागात व्हावी व निधी मिळावा यासाठी आता नगरसेवकांची धडपड सुरु आहे. त्यासाठी नगरसेवकांच्या एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षात कोलांटउड्या सुरु आहेत.

गेल्या साडे तीन वर्षातील मनपातील पक्षीय बलाबल

ऑगस्ट २०१८

भाजप - ५७

शिवसेना -१५

एमआयएम - ३

मार्च २०२१

भाजप - ३०

भाजप बंडखोर - २७

शिवसेना - १५

एमआयएम - ३

मे २०२१

भाजप - २७

भाजप बंडखोर - ३०

शिवसेना - १५

एमआयएम -३

ऑक्टोबर २०२१

भाजप - ४०

बंडखोर - १७

शिवसेना - १५

एमआयएम - ३

फेब्रुवारी -२०२२

भाजप - ३०

शिवसेना - १५

बंडखोर - २७

एमआयएम - ३

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपा