शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

गणपती बाप्पाचा प्रसाद महागला; मिठाईच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांमध्ये मिठाईच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. गणरायाच्या आगमनासोबत मिठाईचे दरदेखील वधारले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांमध्ये मिठाईच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. गणरायाच्या आगमनासोबत मिठाईचे दरदेखील वधारले आहे. सध्या बाजारात ज्या केशरी पेढ्याचे मोदक बनतात, त्या केशरी पेढच्याच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांनी वाढ झाली आहे तर इतर मिठाईच्या दरातदेखील साधारणतः दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहक मिठाईच्या चवीकडे न बघता खिशाकडे बघूनच खरेदी करत आहेत.

गणेशोत्सवात मोदकांना जेवढी मागणी असते, तेवढीच मागणी जळगावकर विविध आकाराच्या गोड मिठाईंची करतात. यंदा दरवाढीमुळे मिठाई खरेदी जपून केली जात आहे.

मिठाईचे दर प्रतिकिलो

काजू कतली

सध्याचे दर १२०० ते १४०० रुपये प्रतिकिलो

आधीचे दर १००० रुपये प्रतिकिलो

केशरी पेढा

सध्याचे दर ४४० रुपये प्रतिकिलो

आधीचे दर ४२० रुपेय प्रतिकिलो

कलाकंद

सध्याचे दर ४८० रुपये प्रतिकिलो

आधीचे दर ४४०

लाडू

सध्याचे दर - ४८० रुपये

आधीचे दर ४४० रुपये

का वाढले दर?

गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढले आहे. आधी १३०० रुपयांना मिळणारे व्यावसायिक गॅस सिलिंडर आता १६२० रुपयांना मिळत आहे. तसेच इतर कच्च्या मालाच्या दरातदेखील वाढ झाली आहे. दुधाच्या दरात काही महिन्यांपासून वाढ झाली आहे. त्यासोबतच ड्रायफ्रूट मिठाईसाठी लागणाऱ्या सुकामेव्याच्या दरातही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मिठाईचे दर वाढले हे स्वाभाविक आहे. - भाविक मदानी, मिठाई विक्रेते

भेसळीवर लक्ष ठेवा ?

सणासुदीच्या काळात मिठाई घेताना नागरिकांनी भेसळीकडे लक्ष द्यावे. तसेच विविध पदार्थांची गुणवत्ता तपासून मगच घ्यावे. चांदीच्या वर्खामध्ये सर्टिफाइड असावा, तसेच भडक रंगावरूनदेखील ओळखता येते. सणांच्या काळात भेसळ विरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहील, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे निरीक्षक विवेक पाटील यांनी दिली.

ग्राहक म्हणतात...

सध्या बाजारात सर्वच वस्तूंचे दर वाढले आहे. यावेळी मिठाई खूपच कमी घेतली आहे. काही वेगळे पदार्थ घरीच करून घेऊ. वाढलेल्या दरांमुळे मिठाई खरेदी करण्याची इच्छा होत नाही. - देवांश राजपूत

सणांच्या काळात भाववाढ ही जाणीवपूर्वक केली जाते. त्यामुळे ग्राहक कोंडीत सापडतो. आधीच महागाईचा भडका उडाला आहे. खाण्याच्या वस्तूंचे दर वाढल्याने नागरिकांनी काय करावे. - किशोर कोळी