शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
4
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
5
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
6
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
7
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
8
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
10
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
11
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
12
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
14
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
15
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
16
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
17
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
18
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
19
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
20
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार

"जळगावात पुढील वर्षी दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यावर आतापासूनच गणेश मंडळांनी विचार सुरू करावा"

By अमित महाबळ | Published: September 30, 2023 9:07 PM

यावर्षी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीत ७२ मंडळांचा सहभाग होता. वेगवेगळे देखावे, सादरीकरण पाहण्यासाठी ७५ ते ८० हजार भाविक येऊन गेले.

जळगाव : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी यावर्षी ७५ ते ८० हजार भाविक येऊन गेल्याचा अंदाज आहे. समारोपाला २० तास लागले. सर्वांच्या सहकार्याने शिस्तबद्धरीत्या मिरवणूक पार पडली असली, तरी शहराच्या एकाच भागात होणारी भाविकांची अमाप गर्दी, गणेश मंडळांची वाढती संख्या, मिरवणुकीला लागणारा वेळ आणि प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेता पुढील वर्षी दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यावर आतापासूनच गणेश मंडळांनी विचार सुरू करावा, असे मत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले आहे.

नेहरू चौक ते मेहरूण तलावपर्यंतचा गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग ४.८० किमी अंतराचा आहे. या मार्गावर नेहरू चौक ते जुने गावातील महर्षी दधिची चौकापर्यंत मंडळांना सादरीकरणासाठी संधी मिळते. यावर्षी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीत ७२ मंडळांचा सहभाग होता. वेगवेगळे देखावे, सादरीकरण पाहण्यासाठी ७५ ते ८० हजार भाविक येऊन गेले. मिरवणूक संपायला २० तास लागले. शेवटचे विसर्जन शुक्रवारी सकाळी पावणे सहा वाजता झाले. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य, विविध संस्था, संघटना व प्रशासन या सर्वांच्या सहकार्यामुळे सर्व सुरळीत पार पडले. त्यासाठी एक महिना तयारी सुरू होती. 

परंतु, विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळांची वाढती संख्या आणि कोर्टाच्या आदेशानुसार, ठराविक वेळेत विसर्जन मिरवणूक संपविण्याचे बंधन लक्षात घेता, सर्वच मंडळांचे समाधान होणे हे आव्हानात्मक बनत चालले आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून उपनगरातील गणेश मंडळांची आणखी एक स्वतंत्र मिरवणूक निघाल्यास मंडळांची संख्या विभागून मिरवणूक संपण्यास लागणारा वेळ कमी होईल. उत्तमात उत्तम नियोजन व सादरीकरणातील स्पर्धा वाढेल, सध्या एकाच भागात होणारी भाविकांची गर्दी दोन ठिकाणी विभागली जाईल. यामुळे प्रशासनावरील ताण कमी होईल, यंत्रणांना नियोजन करणे अधिक सोपे होईल, याचा विचार गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच सुरू करावा. याविषयी पुढील गणेशोत्सवापूर्वी निर्णय घ्यावा, असे मत सचिन नारळे यांनी व्यक्त केले आहे.उंच मूर्ती नकोत, अडचणी येतात... -गणेश मंडळांनी पुढील वर्षी उंच गणेशमूर्ती घेणे टाळावे. यावर्षी सर्वाधिक उंचीची मूर्ती २४ फुटांची होती. मेहरुण तलावाची खोली लक्षात घेता १५ फुटांपर्यंतचीच मूर्ती उभी सरळ खाली सोडून विसर्जन करता येणे शक्य होते. त्यापेक्षा उंच मूर्ती आडव्या कराव्या लागतात. यामध्ये नकळतपणे अवमान होण्याची शक्यता आहे, याकडेही नारळे यांनी लक्ष वेधले आहे.

५० टक्के महिलांना संधी द्या... -पुढच्या वर्षी गणेशोत्सव साजरा करताना गणेश मंडळाच्या कार्यकारिणीत ५० टक्के महिलांना संधी देण्यावर मंडळांनी विचार करावा. आता महिला व मुलींचा लक्षणीय सहभाग असलेली केवळ एक ते दोन मंडळे दिसून आली आहेत. ही संख्या वाढायला हवी. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनJalgaonजळगाव