शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आयएमएच्या डॉक्टर्सची पूर्ण वेळ सेवा सुरु - आयएमए अध्यक्ष डॉ़ दीपक पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 12:40 PM

चार डॉक्टर कार्यरत

आनंद सुरवाडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यानंतर मनुष्यबळाचा मुद्दा समोर आला. मात्र, त्यासाठी आयएमएने स्वत: पुढाकार घेऊन २५० डॉक्टरांची शासकीय पातळीवर सेवा देण्यासाठी नियुक्ती केली आहे़ एवढेच नव्हे तर अधिग्रहीत रुग्णालयातही तज्ज्ञ डॉक्टर पूर्ण वेळ सेवा देत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएचे अध्यक्ष डॉ़ दीपक पाटील यांनी दिली़ जळगावच्या कोविड रुग्णालयात आयएमएच्या डॉक्टरांनी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. याबाबतह्णलोकमतह्णला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध बाबी उलगडून सांगितल्या.प्रश्न : कोविड रुग्णालयात आयएमएचे नेमेक किती डॉक्टर्स व किती वेळ सेवा देत आहे?डॉ़ पाटील : कोविड रुग्णालयात मनुष्यबळाची खरच कमतरता आहे़ हा मुद्दा ओळखून जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आयएमएच्या २५० डॉक्टरांची कोविड रुग्णालयात सेवा लावण्यात आली आहे़ यात सकाळी दोन डॉक्टर्स तीन तास व सायंकाळी दोन डॉक्टर्स चार तास असे चार डॉक्टर दिवसातून सहा तास या रुग्णालयात सेवा देत आहे़प्रश्न : डॉक्टर पूर्ण वेळ सेवा देत नसल्याचा आरोप आहे़डॉ़ पाटील : तसे नाही, जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार तीन तास सेवा देणे पुरेसे आहे़ त्यादृष्टीने ही या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे़ शिवाय अधिग्रहीत रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची पूर्ण वेळा सेवा सुरू करण्यात आली आहे़ त्यामुळे या आरोपात काही तथ्य नाही़प्रश्न : अमळनेर पॅटर्न जळगावात का राबविला जात नाही?डॉ़ पाटील : अमळनेर हे त्यामानाने छोटे शहर आहे़ त्या ठिकाणी डॉ़ अरविंद शिंदे यांनी कोविडसाठी रुग्णालय खुले करून दिले होते़ जळगावात अधिग्रहीत रुग्णालयात शुक्रवार ५ जूनपासून खासगी डॉक्टर्स पूर्ण वेळ सेवा देत आहेत. त्यामुळे अमळनेर पॅटर्न असा वेगळा राबविण्याची गरज नाही़डेथ आॅडिट कमिटीचे उद्दीष्ट काय?काही बाबींची अपूर्णत: असणे, मनुष्यबळाचा अभाव यामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम झाल्याचे चित्र आहेच़ या बाधितांच्या मृत्यूमध्ये नेमके चुकले कुठे काहींचे प्राण वाचविता आले असते का? कुठे काही हलगर्जीपणा झालेला आहे का? याची माहिती घेतली जाणार आहे.जळगावला मेडिकलची पंढरी म्हटले जाते तरी रुग्ण संख्या का वाढली ?नागरिक मास्कचा वापर नीट करीत नाहीत शिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. बाजार समिती, भाजीबाजार आदी ठिकाणी गर्दीवर नियंत्रण नाही, त्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे़ शिवाय लोक दवाखान्यात यायला घाबरत आहेत. समोर यायला घाबरत असल्याने आजार लपविला जात आहे. यातूनही संसर्गाचा धोका अधिक आहे़ त्यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे़बाधितांच्या मृत्यूचा अभ्यास केल्यास अनेक लोक थेट मृतावस्थेतच रुग्णालयात आले़ अनेकांचा मृत्यू ४ ते ६ तासाच्या आत झाला़ ज्यांना अन्य व्याधी आहेत, त्यांचे प्रमाण अधिक आहे़ - डॉ़ दीपक पाटील, अध्यक्ष, आयएमए जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव