शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

आठवडाभरात येणार थंडीची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:36 IST

जळगाव : उत्तर भारतातील जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरु झाल्यामुळे राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे ...

जळगाव : उत्तर भारतातील जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरु झाल्यामुळे राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे चार दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. सोमवारी किमान तापमान १५ अंशावर आले होते. आगामी काही दिवसात थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.यंदा जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना चांगले पाणी आहे. त्यात आता उत्तर भारतात देखील बर्फवृष्टी सुरु झाल्यामुळे थंडीची चाहुल लागली आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यापासूनच गुलाबी थंडी अनुभवयास मिळते. यंदा अवकाळी पावसामुळे थंडी लांबली होती. मात्र, शुक्रवारपासून थंडीने जोर धरला असून, रात्री ७ वाजेनंतर थंड वाºयांमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. हवामान विभागाकडून आधीच यंदा थंडीचा जोर चांगला राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.महाबळेश्वर, गोंदीया व जळगाव राज्यात थंड राज्यात सोमवारी सर्वात कमी पाºयाची नोंद गोंदीया येथे झाली असून, सोमवारी गोंदीयाचे किमान तापमान १५.३ अंश इतके होते. त्याखालोखाल महाबळेश्वर व जळगावचा किमान तापमान १५ अंश इतके खाली घसरले असल्याची नोंद भारतीय हवामान खात्याचा संकेतस्थळावर होती. तापमानात घट होताच धुक्याचेही प्रमाण वाढले असून, सकाळी ७ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळत आहे.थंडीचा तडाखा वाढणारआठवड्याभरात उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांचे प्रमाण कायम राहणार आहे. त्यामुळे शहराच्या पारा आणखीन घसरण्याचा अंदाज आहे. जळगावचे किमान तापमान १५ अंशापेक्षा खाली घसरण्याचा अंदाज आहे. तसेच वाºयांचा वेग देखील १३ किमी प्रतितासपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याने त्यामुळे थंडीचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. थंडीची चाहूल लागल्याने शहरात स्वेटर विक्रीसाठी तिबेटी बांधव देखील झाले आहेत.हिवाळ्यात नागरिक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यावर अधिक भर देतात. तसेच हिवाळा आरोग्यासाठी हितवर्धक असतो. तापामानात घट होत असल्याने सकाळी व्यायाम करणाºयांचा संख्येत देखील वाढ झालेली दिसून येत आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनJalgaonजळगाव