शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

आठवडाभरात येणार थंडीची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:36 IST

जळगाव : उत्तर भारतातील जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरु झाल्यामुळे राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे ...

जळगाव : उत्तर भारतातील जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरु झाल्यामुळे राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे चार दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. सोमवारी किमान तापमान १५ अंशावर आले होते. आगामी काही दिवसात थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.यंदा जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना चांगले पाणी आहे. त्यात आता उत्तर भारतात देखील बर्फवृष्टी सुरु झाल्यामुळे थंडीची चाहुल लागली आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यापासूनच गुलाबी थंडी अनुभवयास मिळते. यंदा अवकाळी पावसामुळे थंडी लांबली होती. मात्र, शुक्रवारपासून थंडीने जोर धरला असून, रात्री ७ वाजेनंतर थंड वाºयांमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. हवामान विभागाकडून आधीच यंदा थंडीचा जोर चांगला राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.महाबळेश्वर, गोंदीया व जळगाव राज्यात थंड राज्यात सोमवारी सर्वात कमी पाºयाची नोंद गोंदीया येथे झाली असून, सोमवारी गोंदीयाचे किमान तापमान १५.३ अंश इतके होते. त्याखालोखाल महाबळेश्वर व जळगावचा किमान तापमान १५ अंश इतके खाली घसरले असल्याची नोंद भारतीय हवामान खात्याचा संकेतस्थळावर होती. तापमानात घट होताच धुक्याचेही प्रमाण वाढले असून, सकाळी ७ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळत आहे.थंडीचा तडाखा वाढणारआठवड्याभरात उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांचे प्रमाण कायम राहणार आहे. त्यामुळे शहराच्या पारा आणखीन घसरण्याचा अंदाज आहे. जळगावचे किमान तापमान १५ अंशापेक्षा खाली घसरण्याचा अंदाज आहे. तसेच वाºयांचा वेग देखील १३ किमी प्रतितासपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याने त्यामुळे थंडीचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. थंडीची चाहूल लागल्याने शहरात स्वेटर विक्रीसाठी तिबेटी बांधव देखील झाले आहेत.हिवाळ्यात नागरिक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यावर अधिक भर देतात. तसेच हिवाळा आरोग्यासाठी हितवर्धक असतो. तापामानात घट होत असल्याने सकाळी व्यायाम करणाºयांचा संख्येत देखील वाढ झालेली दिसून येत आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनJalgaonजळगाव