शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आठवडाभरात येणार थंडीची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:36 IST

जळगाव : उत्तर भारतातील जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरु झाल्यामुळे राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे ...

जळगाव : उत्तर भारतातील जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरु झाल्यामुळे राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे चार दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. सोमवारी किमान तापमान १५ अंशावर आले होते. आगामी काही दिवसात थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.यंदा जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना चांगले पाणी आहे. त्यात आता उत्तर भारतात देखील बर्फवृष्टी सुरु झाल्यामुळे थंडीची चाहुल लागली आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यापासूनच गुलाबी थंडी अनुभवयास मिळते. यंदा अवकाळी पावसामुळे थंडी लांबली होती. मात्र, शुक्रवारपासून थंडीने जोर धरला असून, रात्री ७ वाजेनंतर थंड वाºयांमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. हवामान विभागाकडून आधीच यंदा थंडीचा जोर चांगला राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.महाबळेश्वर, गोंदीया व जळगाव राज्यात थंड राज्यात सोमवारी सर्वात कमी पाºयाची नोंद गोंदीया येथे झाली असून, सोमवारी गोंदीयाचे किमान तापमान १५.३ अंश इतके होते. त्याखालोखाल महाबळेश्वर व जळगावचा किमान तापमान १५ अंश इतके खाली घसरले असल्याची नोंद भारतीय हवामान खात्याचा संकेतस्थळावर होती. तापमानात घट होताच धुक्याचेही प्रमाण वाढले असून, सकाळी ७ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळत आहे.थंडीचा तडाखा वाढणारआठवड्याभरात उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांचे प्रमाण कायम राहणार आहे. त्यामुळे शहराच्या पारा आणखीन घसरण्याचा अंदाज आहे. जळगावचे किमान तापमान १५ अंशापेक्षा खाली घसरण्याचा अंदाज आहे. तसेच वाºयांचा वेग देखील १३ किमी प्रतितासपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याने त्यामुळे थंडीचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. थंडीची चाहूल लागल्याने शहरात स्वेटर विक्रीसाठी तिबेटी बांधव देखील झाले आहेत.हिवाळ्यात नागरिक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यावर अधिक भर देतात. तसेच हिवाळा आरोग्यासाठी हितवर्धक असतो. तापामानात घट होत असल्याने सकाळी व्यायाम करणाºयांचा संख्येत देखील वाढ झालेली दिसून येत आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनJalgaonजळगाव