शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वकिली क्षेत्रात अत्रे यांची चौथी पिढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:37 PM

- चंद्रशेखर जोशी. पैसा जमविणे हे ध्येय न ठेवता लौकीक मिळविणे, आलेल्या व्यक्तीस न्याय कसा मिळेल हेच ध्येय डोळ्यासमोर ...

- चंद्रशेखर जोशी.पैसा जमविणे हे ध्येय न ठेवता लौकीक मिळविणे, आलेल्या व्यक्तीस न्याय कसा मिळेल हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वकीली क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये अत्रे कुटुंबियांची एक आगळी वेगळी ओळख आहे. एक दोन नव्हे तर तब्बल चार पिढ्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. वामनराव रंगराव अत्रे या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने १९२३ मध्ये आपल्या वकीली व्यवसायास प्रारंभ केला. त्या काळात ‘काकासाहेब अत्रे’ हे नाव आदराने घेतले जात असे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या हिंदू महासभेचे काम काकासाहेब अत्रे यांनी वाढविले. सामाजिक कार्य करत असताना न्याय दानाच्या प्रक्रियेतही ते सक्रिय होते.जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या कायदे क्षेत्रात भर टाकण्याचे काम दुसºया पिढीतील स्व. अ‍ॅड. अच्युतराव वामनराव अत्रे यांनी केले. १९६२ मध्ये त्यांनी आपल्या वकिलीस सुरूवात केली. या क्षेत्रात त्यांच्या नावाचा मोठा दबदबा होता. केवळ कोर्ट आणि वकिली यावरच न थांबता विधी महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तेथे ज्ञान दानाचे काम अ‍ॅड.अच्युतराव अत्रे यांनी केले.महाविद्यालयात शिकवत असताना घरी देखील अनेक विद्यार्थी मार्गदर्शनासाठी येत. भारतीय दंड विधानातील बारकावे या विद्यार्थ्यांना ते समजावून सांगत. या विद्यार्थ्यांना ते मोफत मार्गदर्शन करीत. एका पिढीस कायद्याचे बारकावे व्यवस्थित समजावे यासाठी त्यांची सतत धडपड असायची. न्यायालयातही त्यांचा मोठा दबदबा असायचा. जे काय मांडणार ते सत्य, स्पष्ट, पारदर्शी व परखड या लौकीकामुळे सर्वच त्यांना मान देत असत. यासह रामजन्मभूमी चळवळ, विश्व हिंदू परिषदेतही ते सक्रीय होते. शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेत ते अनेक वर्षे कार्याध्यक्ष होते. तिसºया पिढीतील अ‍ॅड. सुशील अच्युतराव अत्रे यांनी १९८८ पासून वकीलीस प्रारंभ केला. संस्काराच्या पाऊल वाटेने जात असताना सुशील अत्रे यांनीही न्याय दानाच्या प्रक्रियेत आपली वेगळी ओळख निर्माण केली.अ‍ॅड. अच्युतराव अत्रे यांच्या निधनानंतर अ‍ॅड.सुशील यांनी शिक्षण क्षेत्रातील कार्याची ज्योत तेवत ठेवली. ते शि.प्र. मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळा त्यांनी सुरू केली. गोरगरीबांच्या मुलांनाही इंग्रजीचे चांगले ज्ञान मिळावे म्हणून ही शाळा प्रयत्नशिल आहे. व. वा. जिल्हा वाचनालय, ब्राह्मण संघ या संस्थांमध्ये काम करत असताना आपल्या कामाची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण करून दिली. जणू अ‍ॅड. अच्युतराव अत्रे यांच्या कार्याच्या लौकीकात सुशील अत्रे यांनी भर टाकल्याचे लक्षात येते. यासह त्यांचे बंधू अ‍ॅड. पंकज अत्रे यांनी २००० मध्ये वकीलीस सुरूवात केली. बहिण अ‍ॅड. निलिमा अत्रे या विवाहानंतर औरंगाबाद येथे गेल्या. तेथे जिल्हा न्यायालय तसेच उच्च न्यायालयाच्या खंडपीठात त्यांनी वकीली केली. त्यानंतर आता त्या जालना येथे ग्राहक मंचाच्या अध्यक्षा आहेत. तर आता चौथ्या पिढीतील अ‍ॅड. निशांत सुशील अत्रे यांनी २०१४ पासून आपल्या वकीली व्यवसायास प्रारंभ केला आहे. वडिलांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत विविध खटल्यांच्या कामकाजात ते सहभागी होत आहेत.

टॅग्स :Jalgaonजळगाव