शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
3
कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात
4
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
5
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
6
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
7
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
8
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
9
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
10
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
11
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
12
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
13
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
14
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
15
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
16
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
17
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
18
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
20
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी

पूर ओसरला पण समस्यांचा ससेमिरा सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST

संजय सोनार चाळीसगाव : अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे तितूर-डोंगरी नदीला आलेल्या महापुरामुळे चाळीसगाव शहरासह नदीकाठच्या अनेक गावांना मोठा फटका ...

संजय सोनार

चाळीसगाव : अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे तितूर-डोंगरी नदीला आलेल्या महापुरामुळे चाळीसगाव शहरासह नदीकाठच्या अनेक गावांना मोठा फटका बसला. आता पूर ओसरला असला तरी या लोकांपुढील अनेक समस्या आजही कायम आहेत. आजही अनेकांचा संसार उघड्यावरच पडून आहेत. अशा अवस्थेत प्रशासनाने मदत करावी याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. मात्र, प्रत्यक्षात ‘सरकारी काम आणि बारा महिने थांब’ अशी अवस्था निर्माण झाली आहे.या घटनेला तेरा दिवस उलटूनही अद्याप एक रुपयांची ही मदत या पूरग्रस्तांना झालेली नाही.

३१ ऑगस्टला रात्री तितूर-डोंगरी नदीला आलेल्या महापुरात नदीकाठावरील अनेक रहिवाशांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले. काहींचे घरे कोसळली तर काहींची घराची पडझड झाली. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी शेतामध्ये पिके पाण्याखाली आली. याबरोबरच शेकडो जनावरे पाण्यात वाहून गेली आहेत तर अनेक जनावरे जागेवरच मृत्युमुखी पडले आहेत. डोळ्यांदेखत पुरामुळे होत्याचे नव्हते झाले. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींच्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे.

या अतिवृष्टीने आलेल्या महापुरामुळे चाळीसगाव तालुक्यात कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे झालेत. दुसऱ्या टप्प्यातील अजूनही अनेक पंचनामे अजून बाकी आहेत. त्याला गती देणे आवश्यक आहे.

आज मिळतील, उद्या मिळतील अशी आस धरून बसलेल्या नुकसानग्रस्त कुटुंबासाठी शासनाकडून इतर ठिकाणांप्रमाणे तातडीची मदत अथवा सानुग्रह अनुदान वाटप व्हायला पाहिजे होती परंतु ती झाली नाही.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या पाहणी दौऱ्यात काही मदत देतील अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. मात्र, आश्वासनापलीकडेच काहीच मिळाले नाही.

नुकसान झालेल्यांमध्ये बहुतांश लोक हे सर्वसामान्य, हातमजुरीवर काम करणारे आहेत. पुरात वाहून गेलेल्या वस्तू आणि दुकानात नव्याने माल घेण्यासाठी या लोकांकडे पैसे नसल्याने अशा कुटुंबाचे हाल पाहण्यासाठी कोणीच वाली नसल्याची खंत नुकसानग्रस्त कुटुंब व्यक्त करीत आहे.

पूर ओसरला असला तरी या लोकांपुढे अनेक समस्या कायम आहेत. आजही अनेकांचा संसार उघड्यावरच थाटून आहेत अशी दयनीय परिस्थिती त्यांच्यावर ओढावली आहे.

आजपर्यंत या कुटुंबांना अनेक सामाजिक संस्थांनी हात पुढे करून समाजसेवेचे अनोखे दर्शन घडविले आहे. अनेकांनी जेवणाची, निवाऱ्याची आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत केली आहे. मात्र, या कुटुंबांना शासनाची मदत मिळणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोट

अतिवृष्टी व पुरामुळे चाळीसगाव तालुक्याचे सुमारे शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.या सर्वांना इतर ठिकाणी झालेल्या पूरग्रस्तांप्रमाणे किंवा त्यापेक्षा अधिक नुकसानभरपाई मिळावी. वेळेच्या आत शेतकरी, दुकानदार व सर्वसामान्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल.

- आमदार मंगेश चव्हाण.

कोट

चाळीसगाव तालुक्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या नुकसानीतील घराची व पशुधनाची पंचनामे झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील नुकसानीचे पंचनामे सुरू असून दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील. त्याचा अहवाल आल्यावर शासनाकडे पाठविला जाईल.

-अमोल मोरे,तहसीलदार, चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यात ३१ रोजी झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाली असून मात्र अहवाल येणे बाकी आहे. दुसऱ्या टप्प्यातील नुकसानीचे पंचनामे प्रगतिपथावर आहे.त्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

-सी.डी.साठे कृषी अधिकारी, चाळीसगाव