शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

महापुराने ६०० दुकानदारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:18 IST

चाळीसगाव : मंगळवारी आलेला पूर ओसरल्यानंतर गत दोन दिवसांपासून शिवाजी घाटावरील दुकानदार आणि घरांचे नुकसान झालेले आहे. नागरिक ...

चाळीसगाव : मंगळवारी आलेला पूर ओसरल्यानंतर गत दोन दिवसांपासून शिवाजी घाटावरील दुकानदार आणि घरांचे नुकसान झालेले आहे. नागरिक सावरण्याचा प्रयत्न करीत असून, गुरुवारी काही दुकानदारांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. पुराच्या तडाख्यातून सावरलेले चाळीसगाव हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

दरम्यान, गुरुवारी पुराच्या पाण्यात भिजलेल्या वस्तू घेण्यासाठी महिलांची मोठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. चाळीसगाव शहरात तितूर नदीपात्रालगत असणाऱ्या दुकानांमध्ये पुराचे पाणी १५ ते २० फुटांपर्यंत शिरले होते. हा संपूर्ण परिसर जलमय झाला होता. डोंगरी व तितूर नदीचा संगम या दुकानांपासून अवघ्या हजार पावलांवर होत असल्याने याच परिसरात पुराच्या प्रवाहाने मोठी धडक दिली होती. यामुळेच पुराचे पाणी तहसील कार्यालयाच्या वीर सावरकर चौकात, तर घाट रोडवरील डॉ. पूर्णपात्रे रुग्णालयापर्यंत पोहोचले होते.

६०० दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे. स्टील भांडी, किराणा सामान, रेडिमेड कपडे, साडी, मसाले, खाद्यपदार्थ, चपला - बुट, फळांची दुकाने, फर्निचर, आदी दुकानांचा यात समावेश आहे. बुधवारी आणि गुरुवारी देखील दुकानदारांनी पुराच्या पाण्यात वाहून आलेली घाण, गाळ यांची स्वच्छता केली. अजूनही शिवाजी घाट परिसरात गाळ साचलेला आहे.

.............

चौकट

भिजलेल्या वस्तू, कपडे, भांडी घेण्यासाठी गर्दी

पुराच्या पाण्यात भिजलेल्या वस्तू मिळेल त्या किमतीत विकण्याशिवाय या दुकानदारांकडे दुसरा पर्याय नसल्याने तयार कपडे, किराणा सामान, भांडी, साड्या घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यात महिला वर्गाची संख्या सर्वाधिक होती.

............. चौकट

दुकाने सावरण्यासाठी आठ ते दहा दिवस लागणार

शिवाजी घाटावरील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून, दुकानदारांना पुराच्या तडाख्यातून सावरण्यासाठी अजून आठ ते दहा दिवसांचा कालावधी आहे.

1...डोळ्यात अश्रू असताना पूरग्रस्त नागरिक, दुकानदार या तडाख्यातून आता स्वतःला सावरत आहे.

2...पंचनामे झाल्याने तातडीने शासनाने मदतीचा हात पुढे करावा. पंचनाम्यांचा नुसता फार्स नको, अशा प्रतिक्रिया दुकानदार व नागरिकांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केल्या.

3...किराणा सामान, मसाले व खाद्यपदार्थ पुराच्या पाण्यात भिजल्याने परिसरात दुर्गंधीही पसरली आहे.