शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे पडले पाच लाखांना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 10:50 IST

नवीन कायद्यानुसार, दुचाकीवर तीन सीट व विना हेल्मेट या दोन्ही प्रकारात तर एक हजार रुपये दंडासह चालकाचे लायसन्स तीन महिन्यासाठी रद्द केले जाणार आहे.

जळगाव : सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार गाडी चालविताना मोबाईल वर बोलल्यास पहिल्यावेळी पाचशे रुपये तर दुसऱ्या वेळी १० हजार रुपयाचा दंड आकारला जात आहे. जिल्ह्यात नवीन कायदा लागू झाल्यानंतर जानेवारी ते फेब्रवारी या दोन महिन्यात ८ हजार ८८५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ९० लाख ५७ हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मोबाईलवर बोलत असताना वाहन चालविणाऱ्या ४११ जणांकडून ४ लाख ६८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

नवीन कायद्यानुसार, दुचाकीवर तीन सीट व विना हेल्मेट या दोन्ही प्रकारात तर एक हजार रुपये दंडासह चालकाचे लायसन्स तीन महिन्यासाठी रद्द केले जाणार आहे. केंद्र सरकारने ओव्हरस्पीड, सीटबेल्ट, हेल्मेट, वाहतूक नियमांची पायामल्ली, दुचाकीवरून अतिरिक्त प्रवासी वाहतुकीसह अनेक वाहतूक नियमांमध्ये सुधारणा करून त्यामध्ये दंड वाढवण्यात आला. त्यामध्ये पाच ते दहापट रकमेची वाढ केली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये परवाना रद्द करण्यात येणार असल्याची तरतूद केली आहे

मोबाईलच्या किमतीएवढा दंडना लायसन्स वाहन चालविले तर आता चालकाला थेट पाच हजाराचा तर लायसन्स अपात्र केलेले असेल तर थेट दहा हजाराचा दंड आकारला जाणार आहे. अल्पवयीन मुलाने वाहन चालविले असेल तसेच लायसन्सची मुदत संपलेली असेल तर प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड आकारला जातो. अग्निशमन बंबाला जागा करुन दिली नाही तर दहा हजाराचा दंड भरावा लागतो. या दंडाच्या रकमेत नवीन मोबाईल मिळू शकतो, त्यामुळे नियमांचे पालन करणेच योग्य आहे.

कोणत्या प्रकारात किती दंड वसुली?भरधाव वेगाने वाहन चालविणे : १२,१३०००सीट बेल्टचा वापर न करणे : २००४००दुचाकीवर तीन सीट : १५,४३०००लायसन्स जवळ न बाळगणे : १३४४५००

पोलीस नाहीत म्हणून मोबाईलवर बोलला आणि कॅमेराने टीपलाबरेच वाहनधारक वाहन चालविताना बिनधास्तपणे मोबाईलवर बोलतात. काही ठिकाणी पोलीस नाहीत असे वाटते तर काही ठिकाणी वाहतूक पोलीस दिसले की मोबाईल काढून खिशात ठेवतात, नंतर पुढे गेले की लगेच मोबाईलवर बोलणं सुरु होते. यामुळे कारवाईतून आपली सुटका झाली असा समज वाहनधारकांचा असतो, मात्र तसे नाही तुम्हाला आता न अडविताही मोबाईल कॅमेऱ्यातून पोलीस कैद करु शकतात व तसे प्रकार आता होऊ लागले आहेत.

हेल्मेटचा नियम नावालाचहेल्मेट न वापरणाऱ्या १ हजार ३३९ वाहनधारकांवर जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ६ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वेगवेगळ्या कलमाखाली ८ हजार ८८५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ९० लाख ५७ हजार २०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

आता मोटार वाहन कायदा ११२/१८३ मध्ये सुधारणा करुन दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे. त्यातून स्वत:ला शिस्त लागते, शिवाय अपघाताचा धोका टळतो.वेगाने वाहन चालविल्यास दोन हजाराचा तर मोबाईलवर बोलताना वाहन चालविल्यास एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो.-लिलाधर कानडे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा 

टॅग्स :JalgaonजळगावcarकारMobileमोबाइल