शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

भुसावळ विभागातील पाचही तलाव कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 16:19 IST

असमाधानकारक पावसामुळे भुसावळ विभागातील पाचही तलाव कोरडे राहिल्याने रब्बी हंगामाही संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देरब्बीची पेरणीही संकटातवेल्हाळे तलावाचे लाभक्षेत्र ३६४ हेक्टर असून, आज रोजी २१ टक्के जलसाठा आहे.मोंढाळा तलावाचे लाभ क्षेत्र २६४ हेक्टर, पाणी साठा शून्य टक्के आहे.खंडाळा लाभ क्षेत्र २३२ हेक्टर पाणीसाठा शून्य टक्के, साळशिंगी लाभ क्षेत्र २६१ हेक्टर पाणीसाठा शून्य टक्के, जुनाना लाभ क्षेत्र ३१९ हेक्टर पाणीसाठा शून्य अशी तलावांची स्थिती आहे.

 

 

वरणगाव, ता.भुसावळ : असमाधानकारक पावसामुळे भुसावळ विभागातील पाचही तलाव कोरडे राहिल्याने रब्बी हंगामाही संकटात सापडला आहे.मोसमात अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांचे खरिपाच्या पिकांचे नुकसान तर झालेच, परंतु रब्बीच्या हंगामाकरिता सिंचयानाकरिता पाणी उपलब्ध नसल्याने एक हजार ४४० हेक्टरवरील रब्बीची पेरणी धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.भुसावळ विभागातील लघुसिंचन विभागाच्या अखत्यारीतील भुसावळ तालुक्यातील खंडाळा, मोंढाळा, वेल्हाळा तर बोदवड तालुक्यातील साळशिंगी व जुनोना तलावात यावर्षी पावसाळ्याचे प्रमाण अल्प राहिले. परिणामी तलावात पावसाअभावी पाणीसाठा झाला नाही. या तलावांच्या लाभ क्षेत्रातील तब्बल दीड हजार हेक्टरवर सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकºयांना रब्बीचा हंगाम घेणे अशक्य झाले आहे.भुसावळ विभागातील एकमेव वेल्हाळे तलावाल अल्पसा पाणीसाठा आहे. तो सिंचनाकरिता तोकडा पडणार असल्याने त्या लाभ क्षेत्रातील शेतकºयांना कृषी सिंचनाकरिता पाणी मिळणे अशक्य आहे. यामुळे शेतजमीन पेरणीअभावी पडून आहे. वेल्हाळे तलावाची उभारणीपासून मागील वर्षापर्यंत तलाव ऐन उन्हाळ्यातही ओसंडत होता. पाऊस अल्पसा झाला तरी दीपनगर औष्णिक केंद्राकडून वेल्हाळे येथील राखेच्या बंडात राखमिश्रीत पाणी सोडण्यात येत होते. तेच पाणी हळूहळू वाहत त्या पाण्याचा साठा तलावात होत होता. त्यामुळे हा तलाव नेहमी तुडूंब भरलेला रहायचा. परंतु प्रदूषण होत असल्याच्या कारणावरून अखेर औष्णिक वीज केंद्राकडून राखमिश्रीत पाण्याचे रिसायकलिंग करण्यात आल्याने तलावात पाणी येणे थांबले आहे. तलावात आज रोजी अल्पसा साठा उपलब्ध आहे. शेतकºयांना औष्णिक प्रकल्पामुळे वरदान ठरलेला तलाव प्रदूषणाच्या तक्रारीमुळे शेतकºयांच्या मूळावर आल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.याच तलावातून अवैधरित्या वीजपंप लावून चोरी केली जात आहे. पाण्याची चोरी रोखण्याकरिता समितीही बनविण्यात आली. परंतु कारवाई होत नसल्याने बिनधास्तपणे पाण्याची चोरी सुरूच आहे.अशी आहे भुसावळ विभागाच्या लघुसिंचन तलावांची स्थितीवेल्हाळे तलावाचे लाभक्षेत्र ३६४ हेक्टर आज रोजी २१ टक्के, मोंढाळा तलावाचे लाभ क्षेत्र २६४ हेक्टर, पाणी साठा शून्य टक्के, खंडाळा लाभ क्षेत्र २३२ हेक्टर पाणीसाठा शून्य टक्के, साळशिंगी लाभ क्षेत्र २६१ हेक्टर पाणीसाठा शून्य टक्के, जुनाना लाभ क्षेत्र ३१९ हेक्टर पाणीसाठा शून्य अशी तलावाची पावसाअभावी स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. 

 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ