शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

भुसावळ विभागातील पाचही तलाव कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 16:19 IST

असमाधानकारक पावसामुळे भुसावळ विभागातील पाचही तलाव कोरडे राहिल्याने रब्बी हंगामाही संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देरब्बीची पेरणीही संकटातवेल्हाळे तलावाचे लाभक्षेत्र ३६४ हेक्टर असून, आज रोजी २१ टक्के जलसाठा आहे.मोंढाळा तलावाचे लाभ क्षेत्र २६४ हेक्टर, पाणी साठा शून्य टक्के आहे.खंडाळा लाभ क्षेत्र २३२ हेक्टर पाणीसाठा शून्य टक्के, साळशिंगी लाभ क्षेत्र २६१ हेक्टर पाणीसाठा शून्य टक्के, जुनाना लाभ क्षेत्र ३१९ हेक्टर पाणीसाठा शून्य अशी तलावांची स्थिती आहे.

 

 

वरणगाव, ता.भुसावळ : असमाधानकारक पावसामुळे भुसावळ विभागातील पाचही तलाव कोरडे राहिल्याने रब्बी हंगामाही संकटात सापडला आहे.मोसमात अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांचे खरिपाच्या पिकांचे नुकसान तर झालेच, परंतु रब्बीच्या हंगामाकरिता सिंचयानाकरिता पाणी उपलब्ध नसल्याने एक हजार ४४० हेक्टरवरील रब्बीची पेरणी धोक्यात आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.भुसावळ विभागातील लघुसिंचन विभागाच्या अखत्यारीतील भुसावळ तालुक्यातील खंडाळा, मोंढाळा, वेल्हाळा तर बोदवड तालुक्यातील साळशिंगी व जुनोना तलावात यावर्षी पावसाळ्याचे प्रमाण अल्प राहिले. परिणामी तलावात पावसाअभावी पाणीसाठा झाला नाही. या तलावांच्या लाभ क्षेत्रातील तब्बल दीड हजार हेक्टरवर सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकºयांना रब्बीचा हंगाम घेणे अशक्य झाले आहे.भुसावळ विभागातील एकमेव वेल्हाळे तलावाल अल्पसा पाणीसाठा आहे. तो सिंचनाकरिता तोकडा पडणार असल्याने त्या लाभ क्षेत्रातील शेतकºयांना कृषी सिंचनाकरिता पाणी मिळणे अशक्य आहे. यामुळे शेतजमीन पेरणीअभावी पडून आहे. वेल्हाळे तलावाची उभारणीपासून मागील वर्षापर्यंत तलाव ऐन उन्हाळ्यातही ओसंडत होता. पाऊस अल्पसा झाला तरी दीपनगर औष्णिक केंद्राकडून वेल्हाळे येथील राखेच्या बंडात राखमिश्रीत पाणी सोडण्यात येत होते. तेच पाणी हळूहळू वाहत त्या पाण्याचा साठा तलावात होत होता. त्यामुळे हा तलाव नेहमी तुडूंब भरलेला रहायचा. परंतु प्रदूषण होत असल्याच्या कारणावरून अखेर औष्णिक वीज केंद्राकडून राखमिश्रीत पाण्याचे रिसायकलिंग करण्यात आल्याने तलावात पाणी येणे थांबले आहे. तलावात आज रोजी अल्पसा साठा उपलब्ध आहे. शेतकºयांना औष्णिक प्रकल्पामुळे वरदान ठरलेला तलाव प्रदूषणाच्या तक्रारीमुळे शेतकºयांच्या मूळावर आल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहे.याच तलावातून अवैधरित्या वीजपंप लावून चोरी केली जात आहे. पाण्याची चोरी रोखण्याकरिता समितीही बनविण्यात आली. परंतु कारवाई होत नसल्याने बिनधास्तपणे पाण्याची चोरी सुरूच आहे.अशी आहे भुसावळ विभागाच्या लघुसिंचन तलावांची स्थितीवेल्हाळे तलावाचे लाभक्षेत्र ३६४ हेक्टर आज रोजी २१ टक्के, मोंढाळा तलावाचे लाभ क्षेत्र २६४ हेक्टर, पाणी साठा शून्य टक्के, खंडाळा लाभ क्षेत्र २३२ हेक्टर पाणीसाठा शून्य टक्के, साळशिंगी लाभ क्षेत्र २६१ हेक्टर पाणीसाठा शून्य टक्के, जुनाना लाभ क्षेत्र ३१९ हेक्टर पाणीसाठा शून्य अशी तलावाची पावसाअभावी स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. 

 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ