शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींच्या निधी उभारण्यावर प्रथमच झाले संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर अनेक चरित्रे लिहिली गेली. त्यात एका गोष्टीचा कायमच उल्लेख ओझरता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर अनेक चरित्रे लिहिली गेली. त्यात एका गोष्टीचा कायमच उल्लेख ओझरता करण्यात आला आहे. ती म्हणजे गांधीजी यांनी देशासाठी कसा निधी उभारला. त्यावरच आम्ही काम करण्याचा विचार केला. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांच्या प्रेरणेने आणि पाठिंब्याने आम्ही त्यावर काम सुरू केले आणि त्यातच पीएचडी केल्याचे डॉ. अश्विन झाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यांच्या पत्नी निर्मला झाला यांनीही गांधीजी आणि महाराष्ट्र या विषयावर पीएचडी केली आहे. लोकमतने त्यांच्याशी प्रश्नोत्तर स्वरूपात संवाद साधला.

प्रश्न - गांधीजी यांनी निधी कसा उभारला यावरच संशोधन करण्याचा विचार कसा मनात आला.

अश्विन झाला - आम्ही २०१० मध्ये जळगावला आलो. त्यावेळी मी गांधींचे चरित्र वाचायचो आणि भवरलाल जैन ते एकत असत. त्यावेळी चर्चा देखील होत असे. त्यावेळी आम्ही त्यांच्यासमोर गांधी यांच्यावर संशोधनासाठी नवनवे विषय मांडले. त्यातूनच जैन यांनी आम्हाला हा विषय सुचवला आणि त्यावर पीएचडी करण्यासही सांगितले. त्यानुसार आम्ही दोघांनी अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. आम्ही आमचे संशोधन सप्टेंबर २०१९ मध्ये विद्यापीठात दिले. तर त्याची मुलाखत नोव्हेंबर २०२० मध्ये झाली.

प्रश्न - वेरावळ, गुजरात येथून जळगावला येण्याचा निर्णय कसा घेतला.

अश्विन झाला - मी भावनगरच्या एमएसडब्लु महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी पत्नी शिक्षण घेत होती. ती संशोधनासाठी जळगावला आली. त्यावेळी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष भवरलाल जैन यांनी आम्हाला येथे गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये काम आणि संशोधन करण्यास सांगितले. त्यांचा हा प्रस्ताव आम्ही स्विकारला आणि येथे काम सुरू केले. सध्या मी येथे रिचर्च असोसिएट्स आणि संपादक म्हणून काम करत आहे. तर पत्नी रिसर्च फेलो म्हणून कार्यरत आहे.

प्रश्न - गांधींवरील या अनोख्या संशोधनातून काय समोर आले.

अश्विन झाला - या संशोधनात गांधी यांनी कशा पद्धतीने निधी संकलित केला. कोणत्या कामासाठी केला. त्यातून त्यांनी काय साध्य केले यावर संशोधन केले आहे. निधी संकलित करताना तो सामान्य माणसांमधून करत असता. बऱ्याचदा ते आपल्याला मिळालेल्या काही वस्तुंचा लिलाव करीत होते. मानपत्रासोबत आलेल्या लाकडी बॉक्स किंवा ज्या वस्तुंची त्यांना गरजच नाही अशा वस्तुंचा संग्रह करण्यापेक्षा त्याचा लिलाव करून ते निधी संकलित करीत.

प्रश्न - गांधींनी पहिल्यांदा सार्वजनिक रुपाने निधी कधी संकलित केला.

अश्विन झाला - लंडनमध्ये शिक्षण झाल्यानंतर गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले. त्यावेळी १८९७ मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला. त्यांनी नताल इंडियन काँग्रेसची स्थापना केली आणि १४०० पाऊंडाचा निधी उभारला आणि कलकत्ता येथे भारताच्या व्हाईसरॉयकडे पाठवला होता. त्यांनी आयुष्यभरात जवळपास ३०० वेळा निधी संकलित केला. त्यातील १०० वेळा निधी संकलित केल्याची यादी तयार केली आहे. त्यांनी १ कोटी १५ हजार रुपयांचा निधी टिळक स्वराज्य फंडातून उभा केला होता.

--------------------------

अश्विन झाला यांनी ‘गांधी यांनी एकत्र केलेल्या निधीची पद्धत आणि शैली माध्यम, हिशोब कसा ठेवला आणि कसा प्रयोग केला यावर पीएचडी केली आहे. तर त्यांच्या पत्नी निर्मला यांनी गांधीजी आणि महाराष्ट्र यावर पीएचडी केली आहे. त्यांनी गुजरात विद्यापीठातून प्रबंध सादर केले. त्यांना डॉ. सुर्दशन अय्यंगर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या प्रबंधांचे पुस्तक स्वरुपात प्रकाशन देखील होणार आहे. त्याचे मराठीसह चार भाषांमध्ये

भाषांतर केले जाणार आहे.