शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
6
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
7
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
8
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
9
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
10
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
11
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
12
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
13
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
14
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
15
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
16
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
17
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
18
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
19
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
20
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

महात्मा गांधींच्या निधी उभारण्यावर प्रथमच झाले संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर अनेक चरित्रे लिहिली गेली. त्यात एका गोष्टीचा कायमच उल्लेख ओझरता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर अनेक चरित्रे लिहिली गेली. त्यात एका गोष्टीचा कायमच उल्लेख ओझरता करण्यात आला आहे. ती म्हणजे गांधीजी यांनी देशासाठी कसा निधी उभारला. त्यावरच आम्ही काम करण्याचा विचार केला. जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष स्व. भवरलाल जैन यांच्या प्रेरणेने आणि पाठिंब्याने आम्ही त्यावर काम सुरू केले आणि त्यातच पीएचडी केल्याचे डॉ. अश्विन झाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यांच्या पत्नी निर्मला झाला यांनीही गांधीजी आणि महाराष्ट्र या विषयावर पीएचडी केली आहे. लोकमतने त्यांच्याशी प्रश्नोत्तर स्वरूपात संवाद साधला.

प्रश्न - गांधीजी यांनी निधी कसा उभारला यावरच संशोधन करण्याचा विचार कसा मनात आला.

अश्विन झाला - आम्ही २०१० मध्ये जळगावला आलो. त्यावेळी मी गांधींचे चरित्र वाचायचो आणि भवरलाल जैन ते एकत असत. त्यावेळी चर्चा देखील होत असे. त्यावेळी आम्ही त्यांच्यासमोर गांधी यांच्यावर संशोधनासाठी नवनवे विषय मांडले. त्यातूनच जैन यांनी आम्हाला हा विषय सुचवला आणि त्यावर पीएचडी करण्यासही सांगितले. त्यानुसार आम्ही दोघांनी अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. आम्ही आमचे संशोधन सप्टेंबर २०१९ मध्ये विद्यापीठात दिले. तर त्याची मुलाखत नोव्हेंबर २०२० मध्ये झाली.

प्रश्न - वेरावळ, गुजरात येथून जळगावला येण्याचा निर्णय कसा घेतला.

अश्विन झाला - मी भावनगरच्या एमएसडब्लु महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होतो. त्यावेळी पत्नी शिक्षण घेत होती. ती संशोधनासाठी जळगावला आली. त्यावेळी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष भवरलाल जैन यांनी आम्हाला येथे गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये काम आणि संशोधन करण्यास सांगितले. त्यांचा हा प्रस्ताव आम्ही स्विकारला आणि येथे काम सुरू केले. सध्या मी येथे रिचर्च असोसिएट्स आणि संपादक म्हणून काम करत आहे. तर पत्नी रिसर्च फेलो म्हणून कार्यरत आहे.

प्रश्न - गांधींवरील या अनोख्या संशोधनातून काय समोर आले.

अश्विन झाला - या संशोधनात गांधी यांनी कशा पद्धतीने निधी संकलित केला. कोणत्या कामासाठी केला. त्यातून त्यांनी काय साध्य केले यावर संशोधन केले आहे. निधी संकलित करताना तो सामान्य माणसांमधून करत असता. बऱ्याचदा ते आपल्याला मिळालेल्या काही वस्तुंचा लिलाव करीत होते. मानपत्रासोबत आलेल्या लाकडी बॉक्स किंवा ज्या वस्तुंची त्यांना गरजच नाही अशा वस्तुंचा संग्रह करण्यापेक्षा त्याचा लिलाव करून ते निधी संकलित करीत.

प्रश्न - गांधींनी पहिल्यांदा सार्वजनिक रुपाने निधी कधी संकलित केला.

अश्विन झाला - लंडनमध्ये शिक्षण झाल्यानंतर गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले. त्यावेळी १८९७ मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला. त्यांनी नताल इंडियन काँग्रेसची स्थापना केली आणि १४०० पाऊंडाचा निधी उभारला आणि कलकत्ता येथे भारताच्या व्हाईसरॉयकडे पाठवला होता. त्यांनी आयुष्यभरात जवळपास ३०० वेळा निधी संकलित केला. त्यातील १०० वेळा निधी संकलित केल्याची यादी तयार केली आहे. त्यांनी १ कोटी १५ हजार रुपयांचा निधी टिळक स्वराज्य फंडातून उभा केला होता.

--------------------------

अश्विन झाला यांनी ‘गांधी यांनी एकत्र केलेल्या निधीची पद्धत आणि शैली माध्यम, हिशोब कसा ठेवला आणि कसा प्रयोग केला यावर पीएचडी केली आहे. तर त्यांच्या पत्नी निर्मला यांनी गांधीजी आणि महाराष्ट्र यावर पीएचडी केली आहे. त्यांनी गुजरात विद्यापीठातून प्रबंध सादर केले. त्यांना डॉ. सुर्दशन अय्यंगर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या प्रबंधांचे पुस्तक स्वरुपात प्रकाशन देखील होणार आहे. त्याचे मराठीसह चार भाषांमध्ये

भाषांतर केले जाणार आहे.