शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

सतत दोन दिवस लागलेल्या आगीने ‘अंबरीश’ होरपळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 7:21 PM

अंबरीश महाराज टेकडीला कुणीतरी समाज कंटकांनी ३ व ४ रोजी दोन्ही दिवस आग लावली. त्यामुळे येथील झाडे होरपळलीच, शिवाय काही वन्यजीवही या आगीत होरपळल्याचे समजते.

ठळक मुद्देनवव्यांदा लागली आग.समाजकंटकाने लावल्याचा संशय,अनेक वृक्ष जळाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : हिरवळ आणि निसर्ग सौंदर्याने बहरत असलेल्या अंबरीश महाराज टेकडीला कुणीतरी समाज कंटकांनी ३ व ४ रोजी दोन्ही दिवस आग लागल्याने अतिशय संतप्त भावना निसर्गप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.

हिरवळीने भरलेल्या श्री अंबरीश महाराज टेकडीवर ३ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत चार वर्षांपूर्वी अमळनेर येथील डॉक्टरांच्या आयएमए संघटनेच्या सहयोगाने लावलेली वड, पिंपळ, निंब आदी १५ ते २० फूट वाढलेली ३० झाडे या आगीत होरपळली.

नुकतीच या वृक्षांची पानझड होऊन पालवी फुटली होती. याठिकाणी वन्यजीव देखील असल्याने काही ससे व त्यांची पिल्लेदेखील भस्म झाली. याशिवाय वृक्षाला असलेली अनेक घरटी यात जळाल्याने पक्षांची पिल्लेही मरुन पडली. याठिकाणी १५ ते २० फूट पेटलेल्या गवतातही वणवा पेटल्याने सरपटणारे प्राणी यात जळून खाक झाले आहेत.

आगीमुळे टेकडीच्या निसर्गसौंदर्यालादेखील बाधा पोहोचली आहे. आगीची वार्ता शहरात पसरल्यानंतर निसर्गप्रेमींसह टेकडी ग्रुप सदस्यांनी लागलीच टेकडीवर धाव घेतली, तोपर्यंत नगर परिषदेचा अग्निशमन बंबदेखील पोहोचला. नितीन खैरनार व अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली. सुदैवाने टेकडीवर ही आग ब्रेक होऊन टेकडीच्या खाली न वळल्याने मोठे नुकसान टळले आहे.

तब्बल नवव्यांदा लावली आग

दि. ३ रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांनी फटाके फोडल्याने ही आग लागली. चार मुले पळाली तर ४ रोजीदेखील पुन्हा साडेचार वाजेच्या सुमारास आग लागली. त्यावेळी देखील काही तरुण तेथून पळाल्याचे समजले. याआधीदेखील आगीमुळे मोठे नुकसान वृक्षांचे झाले आहे. 

टेकडीवर रिकामटेकड्यांना बंदी घाला

श्री अंबरीश महाराज टेकडीवर दररोज सकाळी टेकडी ग्रुपचे सदस्य रहात असल्याने झाडे सुरक्षित राहतात. मात्र दुपारी व सायंकाळी अनेक लफडेखोर, दारुडे आणि गंजोडे यांचा याठिकाणी राबता असतो. याशिवाय अनेकजण पार्ट्या खील उडवत असतात. त्यामुळेच असे कृत्य करणाऱ्यांना संधी मिळत आहे. टेकडी वाचवायची असेल तर प्रशासनाने टेकडीवर दुपारनंतर रिकाम टेकड्याना बंदी आणावी आणि विनापरवानगी होणाऱ्या पार्ट्या बंद कराव्यात, अशी मागणी टेकडी ग्रुपने केली आहे. 

टॅग्स :JalgaonजळगावAmalnerअमळनेरfireआग