शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आजपासून ' पॉलिटेक्निक' च्या अंतिम वर्षाच्या परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 9:36 AM

जळगाव :   खाजगी व शासकीय तंत्रनिकेतन  महाविद्यालयातील डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन लेखी परीक्षांना आजपासून सुरुवात होत आहे. ...

जळगाव :   खाजगी व शासकीय तंत्रनिकेतन  महाविद्यालयातील डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन लेखी परीक्षांना आजपासून सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे परीक्षा काळात विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून परीक्षेचा मॉक टेस्टद्वारे आधीच सराव करून घेण्यात आला आहे. मात्र जरी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पेपर देत असताना अडचणी उद्भवल्यास, त्याबाबत लागलीच महाविद्यालय किंवा आरबीटीईच्या टोल फ्री क्रमांकावर अडचणीबाबत तक्रार नोंदवू शकता येणार आहे.महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने काही दिवसांपूर्वी अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात सूचना तसेच वेळापत्रक जाहीर केले होते. जळगाव जिल्हयातून सुमारे तीन ते चार हजाराच्यावर विद़यार्थी डिप्लोमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा देणार आहेत. ही परीक्षाही बहुपर्यायी असणार आहे. नुकतीच शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद़यालयातर्फे गुगल मिट व झुम ॲपद्वारे विद़यार्थ्यांची ऑनलाईन तोंडी घेण्यात आली. आता मंगळवारपासून रेग्युलर अंतिम सत्राच्या विद़यार्थ्यांची परीक्षा होणार आहे. त्यानंरतर ३१ ऑक्टोंबरला निकाल जाहीर केला जाईल.४० पैकी ३० प्रश्न सोडविणे आवश्यक डिप्लोमा अंतिम सत्राची लेखी परीक्षा ही एमसीक्यू वापरून ऑनलाईन पध्‍दतीने मंडळस्तरावर होणार आहे. परीक्षा विद़यार्थी स्मार्ट मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, डेस्कटॉप इत्यादींचा वापर करून ज्या ठिकाणी आहेत, तेथून देवू शकतील. परीक्षेत विद़यार्थ्यांना ४० पैकी ३० प्रश्न सोडविणे आवश्यक असेल. प्रत्येक प्रश्न एक गुणांचा असणार असून परीक्षेसाठी १ तासाचा कालावधी दिला जाणार आहे. बॅकलॉक विषयांची परीक्षा ही संस्थास्तरावर ऑनलाईन पध्‍दतीन होणार आहे.विभागीय समन्वयकाकडे नोंदविता येणार तक्रारअंतिम सत्राची परीक्षा ही सुरळीत पार पडण्‍यासाठी समिती गठीत करण्‍याच्या सूचना मंडळकडून करण्‍यात आली आहे. त्याचबरोबर परीक्षेसाठी मुख्य समन्वय व विभागीय समन्वयक देखील नेमण्यात आले आहे. डिप्लोमा अंतिम वर्षाच्या परीक्षा संपूर्ण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना लॉगिन आणि पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मागील आठवड्यात विद्यार्थ्यांनी मॉक टेस्टद्वारे परीक्षा कशी होईल, याबाबत जाणून घेतला आहे. दुसरीकडे ऑनलाइन परीक्षा देत असताना तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित विभागीय समन्वयकाकडे तक्रार करू शकणार आहे. त्यांनंतर विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यात येतील.दोन सत्रात होणार परीक्षाडिप्लोमा अंतिम वर्षाची परीक्षा ही सकाळ व दुपारच्या दोन सत्रांमध्ये होईल. सकाळी नऊ ते दुपारी एक तर दुपारी दोन ते सायंकाळी सहा या कालावधीत ही परीक्षा विद्यार्थ्यांना देता येईल. विद्यार्थ्याने लॉगिन करतातच परीक्षेचा एक तासाचा कालावधी त्यावेळेपासून सुरू होईल अशी माहिती तंत्रनिकेतन महाविद्यालयातर्फे देण्यात आली आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रJalgaonजळगाव