शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुणासाठी वैरण तर कुणासाठी सरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 22:36 IST

नुकत्याच झालेल्या वादळाने परिसरातील केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. केळी बागांमधून वाया गेलेले खांब जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्यासाठी गिरणा काठावरील गावांतून पशुपालक शेतकरी ट्रॅक्टर, पिकअप आदी मिळेल त्या वाहनातून नेत होते.

ठळक मुद्देकेळी खांबांसाठी जत्रागिरणाकाठच्या पाच तालुक्यांतून चारा नेण्यासाठी लागली रीघवादळाने केल्या केळीबागा उद्ध्वस्तअवाढव्य खर्च करून हाती काहीच नाही

संजय हिरेखेडगाव, ता. भडगाव, जि.जळगाव : नुकत्याच झालेल्या वादळाने परिसरातील केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. केळी बागांमधून वाया गेलेले खांब जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्यासाठी गिरणा काठावरील गावांतून पशुपालक शेतकरी ट्रॅक्टर, पिकअप आदी मिळेल त्या वाहनातून नेत होते. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव या तालुक्यांतील तीव्र चाराटंचाई असलेल्या गावांतील शेतकरी पशुपालकांचा समावेश होता.‘लोकमत’ने ‘अशा केळीखांबाचा चारा म्हणून वापर’ या मथळ््याखाली केळीखांब चारा म्हणून वाहून नेत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी या ठिकाणी तोबा गर्दी वाढली. समाजमाध्यमांवर हे छायाचित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पारोळा तालुक्यातील तरवाडे, शिवरे, म्हसवे, जोगलखेडे, हनुमंतखेडे, वलवाडी ते अमळनेर तालुक्यातील गलवाडे येथून केळी खांबांचा चारा नेण्यासाठी शेतकरी आल होते. आजूबाजूच्या जुवार्डी, पथराड, पेंडगाव, शिंदी आदी १५ ते २० गावांतील काही पशुपालकांनी अक्षरश: मोटारसायकलने केळीखांब वाहून नेले. यामुळे आठवडाभरात हे शेत रिकामे होण्याची शक्यता आहे.काहींना टाईमपास... काहींच्या जीवाला कासचारा संपल्याने पाऊस येऊन चाºयाची सोय होईपर्यंत हिरव्या चाºयाची वैरण म्हणून तेवढेच दहा-पंधरा दिवस जनावरांना टाईमपास होईल, असे काहींचे धोरण आहे. केवळ या आशेने वाहनांचे भाडे परवडत नसूनदेखील रान हिरवे होईपर्यंत जनावरे जगवायची म्हणून पशुपालकांची येथे रीघ लागली. दुसरीकडे वर्षभर जीवापाड जपलेली केळी क्षणात मातीमोल झाल्याने मोठे नुकसान होऊन खचलेले उत्पादक खंत व्यक्त करीत होते....अन् त्यांच्या डोळ््यांतून ओघळले अश्रू‘लोकमत’ने प्रातिनिधिक स्वरुपात बात्सर येथील शालिक दयाराम पाटील यांच्या वाया गेलेल्या केळीबागेस भेट दिली. तेव्हा तिथे दहा बैलगाड्या, सहा ट्रॅक्टर केळीखांब घेण्यासाठी आले होते. कोयता चालू लागताच केळीखांबातून वाहणाºया द्रवरुपी धारांप्रमाणे त्यांच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळले. त्यांनी शेतातच बसून घेतले. चारा घेण्यासाठी आलेले भरत पाटील यांनी, त्यांना ‘हयाती राह्यनी तर कमाडी लेसुत’, (कमवून घेऊ), असा धीर दिला. अडीच हजार केळीखोड, ८० हजार खर्च करून पंधरा दिवसांत बाग कटाईला लागणार होता. मात्र, वादळाने सर्वकाही संपवले. अडीच लाखांचे उत्पन्न मिळण्याची आशा होती. आता डोक्यावर तीन-चार लाखांचे कर्ज झाले आहे. कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत ते आहेत. शासनाकडून भरपाई मिळेल तेव्हा मिळेल. मात्र, आज कोणताच थारा राहिलेला नाही.पशुपालक म्हणतात...माझ्याकडे सहा जनावरे आहेत. गव्हाचे कुटार, मक्का कुट्टी असा कोरडा चारा खाऊन जनावरांना ढास लागतेय. ‘लोकमत’मधील फोटो बघितला अन बदल म्हणून केळीखाबांचा हिरवा चारा नेण्यासाठी आलो. यात दहा ते पंधरा दिवस गुरांचा टाईमपास होईल. इतक्या दूर भागत येण्यासाठी परवडत नाही, पण चाºयासाठी आमचा नाईलाज आहे.-गोकुळ आभिमन पाटील, वलवाडी, ता.पारोळा

टॅग्स :FarmerशेतकरीBhadgaon भडगाव