शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
5
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
6
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
7
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
8
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
9
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
10
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
11
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
12
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
13
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
14
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
15
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
16
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
17
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
18
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
19
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
20
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल

कुणासाठी वैरण तर कुणासाठी सरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 22:36 IST

नुकत्याच झालेल्या वादळाने परिसरातील केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. केळी बागांमधून वाया गेलेले खांब जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्यासाठी गिरणा काठावरील गावांतून पशुपालक शेतकरी ट्रॅक्टर, पिकअप आदी मिळेल त्या वाहनातून नेत होते.

ठळक मुद्देकेळी खांबांसाठी जत्रागिरणाकाठच्या पाच तालुक्यांतून चारा नेण्यासाठी लागली रीघवादळाने केल्या केळीबागा उद्ध्वस्तअवाढव्य खर्च करून हाती काहीच नाही

संजय हिरेखेडगाव, ता. भडगाव, जि.जळगाव : नुकत्याच झालेल्या वादळाने परिसरातील केळीबागा भुईसपाट झाल्या आहेत. केळी बागांमधून वाया गेलेले खांब जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्यासाठी गिरणा काठावरील गावांतून पशुपालक शेतकरी ट्रॅक्टर, पिकअप आदी मिळेल त्या वाहनातून नेत होते. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव या तालुक्यांतील तीव्र चाराटंचाई असलेल्या गावांतील शेतकरी पशुपालकांचा समावेश होता.‘लोकमत’ने ‘अशा केळीखांबाचा चारा म्हणून वापर’ या मथळ््याखाली केळीखांब चारा म्हणून वाहून नेत असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी या ठिकाणी तोबा गर्दी वाढली. समाजमाध्यमांवर हे छायाचित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पारोळा तालुक्यातील तरवाडे, शिवरे, म्हसवे, जोगलखेडे, हनुमंतखेडे, वलवाडी ते अमळनेर तालुक्यातील गलवाडे येथून केळी खांबांचा चारा नेण्यासाठी शेतकरी आल होते. आजूबाजूच्या जुवार्डी, पथराड, पेंडगाव, शिंदी आदी १५ ते २० गावांतील काही पशुपालकांनी अक्षरश: मोटारसायकलने केळीखांब वाहून नेले. यामुळे आठवडाभरात हे शेत रिकामे होण्याची शक्यता आहे.काहींना टाईमपास... काहींच्या जीवाला कासचारा संपल्याने पाऊस येऊन चाºयाची सोय होईपर्यंत हिरव्या चाºयाची वैरण म्हणून तेवढेच दहा-पंधरा दिवस जनावरांना टाईमपास होईल, असे काहींचे धोरण आहे. केवळ या आशेने वाहनांचे भाडे परवडत नसूनदेखील रान हिरवे होईपर्यंत जनावरे जगवायची म्हणून पशुपालकांची येथे रीघ लागली. दुसरीकडे वर्षभर जीवापाड जपलेली केळी क्षणात मातीमोल झाल्याने मोठे नुकसान होऊन खचलेले उत्पादक खंत व्यक्त करीत होते....अन् त्यांच्या डोळ््यांतून ओघळले अश्रू‘लोकमत’ने प्रातिनिधिक स्वरुपात बात्सर येथील शालिक दयाराम पाटील यांच्या वाया गेलेल्या केळीबागेस भेट दिली. तेव्हा तिथे दहा बैलगाड्या, सहा ट्रॅक्टर केळीखांब घेण्यासाठी आले होते. कोयता चालू लागताच केळीखांबातून वाहणाºया द्रवरुपी धारांप्रमाणे त्यांच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळले. त्यांनी शेतातच बसून घेतले. चारा घेण्यासाठी आलेले भरत पाटील यांनी, त्यांना ‘हयाती राह्यनी तर कमाडी लेसुत’, (कमवून घेऊ), असा धीर दिला. अडीच हजार केळीखोड, ८० हजार खर्च करून पंधरा दिवसांत बाग कटाईला लागणार होता. मात्र, वादळाने सर्वकाही संपवले. अडीच लाखांचे उत्पन्न मिळण्याची आशा होती. आता डोक्यावर तीन-चार लाखांचे कर्ज झाले आहे. कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत ते आहेत. शासनाकडून भरपाई मिळेल तेव्हा मिळेल. मात्र, आज कोणताच थारा राहिलेला नाही.पशुपालक म्हणतात...माझ्याकडे सहा जनावरे आहेत. गव्हाचे कुटार, मक्का कुट्टी असा कोरडा चारा खाऊन जनावरांना ढास लागतेय. ‘लोकमत’मधील फोटो बघितला अन बदल म्हणून केळीखाबांचा हिरवा चारा नेण्यासाठी आलो. यात दहा ते पंधरा दिवस गुरांचा टाईमपास होईल. इतक्या दूर भागत येण्यासाठी परवडत नाही, पण चाºयासाठी आमचा नाईलाज आहे.-गोकुळ आभिमन पाटील, वलवाडी, ता.पारोळा

टॅग्स :FarmerशेतकरीBhadgaon भडगाव