शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा पितृपक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 3:51 PM

दिवंगत व्यक्ती तथा पूर्वजांविषयी स्मरण व त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पितृपक्षास आज २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.

ठळक मुद्देपितृपंधरवडा आजपासून सुरुहिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्वहिंदू संस्कृतीमध्ये पितृपक्ष पंधरवाड्याला भावनिक महत्त्व

प्रसाद धर्माधिकारीनशिराबाद, जि.जळगाव : दिवंगत व्यक्ती तथा पूर्वजांविषयी स्मरण व त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पितृपक्षास आज २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. हिंदू संस्कृतीमध्ये पितृपक्ष पंधरवड्याला भावनिक महत्त्व असून, सर्वपित्री अमावस्येला पितृपक्षाची सांगता होणार आहे.ग्रामीण भाग असो वा शहरी, पितृपक्ष पंधरवडा सर्वत्र पाळला जातो. भाद्रपद महिन्यातील वद्यपक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. दिवंगत व्यक्ती, वाडवडिलांच्या, पूर्वजांच्या मृत्यूतिथीला या पंधरवड्यात त्या-त्या तिथीला श्राद्ध (तर्पण) केले जाते. तर्पण केल्याने मृत पितरांना सुख लाभते ते संतुष्ट होतात अशी भावना आहे.स्नेहवृद्धीसाठी यांचा वापरगोपीचंदन, काळी तीळ, जव, जानवे, पुष्प, तुळशी पाने, दर्भ, पवित्री, फुले, हार, भात श्राद्ध कर्मात वापरत असतात. काळी तीळ स्नेहाचे तर जव हे समृद्धीचे प्रतीक आहे. पिंडदानासाठी भातात मध, तुळशीपत्र, तूप, तीळ, जव यांचा वापर करतात.तिथींचे महत्त्वपितृपक्षात तिथींना अनन्य महत्त्व आहे. शस्त्राने मृत झालेले, संन्यास घेऊन मृत झालेले, माहेरपणी मृत्यू झालेल्या सवाष्णी वगैरेंसाठी ठरावीक तिथीला श्राद्ध केले जाते. त्यात सर्वपित्री अमावस्या साºया पितरांसाठी आहे.श्राद्धाचे प्रकारश्राद्ध क्रियेत तत श्राद्धम म्हणजेच श्रद्धेने केलेले कार्य किंवा यालाच श्राद्ध असे म्हणतात. और्ध्ददेहिक श्राद्ध, संवत्सारिक, पार्वणी, तीर्थ, त्रिपिंडी, हिरण्यश्राद्ध, महालय श्राद्ध आदी श्राद्धाचे प्रकार आहेत.तिथीनुसार श्राद्धश्राद्ध हे तिथीनुसार करावे असे शास्त्रवचन आहे. आज २५ रोजी महालय श्राद्धारंभ असून प्रतिपदा श्राद्ध, २६ रोजी द्धितीया श्राद्ध, २७ रोजी तृतीया श्राद्ध, २८ रोजी चतुर्थी श्राद्ध, भरणी श्राद्ध, २९ रोजी पंचमी श्राद्ध, ३० रोजी पष्ठी श्राद्ध, १ आॅक्टोबरला सप्तमी श्राद्ध, २ रोजी अष्टमी श्राद्ध, ३ रोजी अविधवा नवमी श्राद्ध, ४ रोजी दशमी श्राद्ध, ५ रोजी एकादशी श्राद्ध, ६ रोजी द्वादशी श्राद्ध, ७ रोजी त्रयोदशी-चतुर्दशी श्राद्ध, ८ रोजी सर्वपित्री अमावस्या श्राद्ध, ९ रोजी मातामह श्राद्ध आहे.पितृपक्ष म्हटला की मनात एक अनामिक भीती निर्माण होते. शरीर आणि मनाला जडत्व येते. तसे पाहिले तर पूर्वजांच्या स्मरणाचा हा काळ आहे. पुढच्या पिढीला संस्कारित करण्याचे कार्य पूर्वीच्या पिढीने केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याचा कालखंड आहे. तेव्हा मनात भीती न बाळगता पूर्वजांचे स्मरण व्हायला हवे. बदलत्या काळाची ती मागणी आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव