शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
3
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
4
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
8
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
9
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
10
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
11
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
12
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
13
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
14
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
15
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
16
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
17
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
18
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
19
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
20
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं

शेतातील पिकांचे नुकसान केल्याचा जाब विचारल्याने पिता-पुत्रांवर विळ्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:17 IST

जळगाव : आमच्या शेतात घोडे चारून पिकांचे नुकसान का केले याचा जाब विचारल्याचे वाईट वाटून चौघांनी अरुण नामदेव कोळी ...

जळगाव : आमच्या शेतात घोडे चारून पिकांचे नुकसान का केले याचा जाब विचारल्याचे वाईट वाटून चौघांनी अरुण नामदेव कोळी (६०) यांच्यासह जितेंद्र कोळी (२६) व खुशाल कोळी (२१) या पिता-पुत्रांवर भाजीपाला चिरण्याच्या विळ्याने वार केल्याची घटना सोमवारी रात्री ८.४० वाजता पिंप्राळ्यातील मढी चौकात घडली. या हल्ल्यात पिता-पुत्र जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी हल्लेखोर सुपडू चंदू ठाकूर, चंदू ठाकूर, मितेश जाधव, आशाबाई ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण कोळी हे पत्नी शोभाबाई, मुले जितेंद्र व खुशाल यांच्यासह पिंप्राळ्यातील कोळीवाडा येथे वास्तव्यास आहेत. खोटेनगरजवळील वाटिकाश्रमाजवळ त्यांचे शेत आहे. शेती व्यवसाय करून ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही दिवसांपूर्वी मढी चौकातील रहिवासी सुपडू ठाकूर याचे तीन घोडे त्यांच्या शेतात चरण्यासाठी येत होते. यामुळे पिकांचे नुकसान होत असल्यामुळे अरुण कोळी व मुलगा जितेंद्र यांनी सुपडू याचे घर गाठून घोडे शेतात चारू नकोस असे सांगितले. त्यावेळी सुपडू याने त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

घोड्यांना काही केलेस तर जिवंत सोडणार नाही

सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सुपडू ठाकूर याच्या घोड्यांनी कोळी यांच्या शेतात शिरून गहूच्या पिकांचे नुकसान केले. हा प्रकार जितेंद्र याला कळताच, त्याने सुपडूला संपर्क साधून घोडे घेऊन जाण्यास सांगितले, त्यावर त्याने घोड्यांना काही झाले तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. रात्री कोळी कुटुंबीय जेवण करीत असताना सुपडू याने जितेंद्रला फोन करून तुमचे घोड्यांबाबतचे दुखणे बंद करून टाकतो, मढी चौकात या असे सांगून त्यांना बोलविले. अरुण कोळी व त्यांची दोन्ही मुले मढी चौकात आल्यानंतर सुपडू व त्याचे वडील चंदू, मित्र मितेश आणि आई आशाबाई त्या ठिकाणी उभे होते.

आज तुझा विषयच संपवितो...

मढी चौकात आल्यावर पिता-पुत्रांना आशाबाई हिने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यांची एकदाची कटकट मिटवून टाका अशी ती म्हणताच सुपडू याने भाजीपाला चिरण्याच्या विळ्याने अरुण कोळी यांच्या हातावर वार केला. नंतर जितेंद्र याच्या खांद्यावर वार केला. आज तुझा विषयच संपवितो म्हणत मितेश याने खुशाल याच्या हातावर चॉपरने वार केला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत तिघांना पाहून हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांना रिक्षात बसवून पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर पोलिसांनी जखमींना तात्काळ उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात नेले.

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जखमी पिता-पुत्रांनी उपचार घेतल्यानंतर मंगळवारी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले होते. त्यानंतर जितेंद्र कोळी याने तक्रार दिली. त्यानुसार सुपडू चंदू ठाकूर, चंदू ठाकूर, मितेश जाधव, आशाबाई ठाकूर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.