शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

मातब्बरांनाही स्पर्धकाविषयी उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:48 IST

एकनाथराव खडसे, जयकुमार रावल, डॉ.विजयकुमार गावीत, गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द उमेदवार कोण?, बंडखोरी, नाराजीनाट्य टाळण्यासाठी जागावाटप, अधिकृत उमेदवार यादीविषयी दिल्ली-मुंबईत घोळ

मिलिंद कुलकर्णीविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे चार दिवस शिल्लक असताना भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्टÑवादी यांच्यातील जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. जागावाटप नसल्याने अधिकृत उमेदवारांची यादीही लटकलेली आहे. शेवटच्या दिवशी ४ रोजी अधिकृत उमेदवाराच्या हाती थेट एबी फॉर्म दिला जाईल, असे वाटते. बंडखोरी, नाराजीनाट्य टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून ही खबरदारी बाळगली जात असली तरी मातब्बर नेत्यांविरोधात उमेदवार कोण हेदेखील अद्याप निश्चित झालेले नाही. लढतीची उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणार असे दिसते.विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असली तरी युती आणि आघाडीचे जागावाटप सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करायला चार दिवस उरलेले असताना अधिकृत उमेदवार यादीची प्रतीक्षा आहे.राजकीय वर्तुळातील चर्चा आणि त्याचे उमटलेले पडसाद लक्षात घेता काँग्रेस-राष्टÑवादीची आघाडी निश्चित झालेली आहे. खान्देशातील २० जागांपैकी काँग्रेस ९ तर राष्टÑवादी ११ जागा लढवेल, असे सूत्र आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर आणि जळगाव शहर या दोन जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर धुळ्यात विद्यमान आमदार असलेल्या धुळे ग्रामीण, शिरपूर व साक्री या जागा तर नंदुरबार जिल्ह्यातील सर्व चार म्हणजे नंदुरबार, नवापूर, शहादा व अक्कलकुवा या जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील ९, धुळ्यातील धुळे शहर व शिंदखेडा अशा ११ जागा राष्टÑवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत.जागावाटप अधिकृत जाहीर झाले नसले तरी त्याची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्याने काँग्रेस व राष्टÑवादीमध्ये पडसाद उमटले. जळगावातील काँग्रेस भवनात नेते व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन रोष व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन कैफीयत मांडली. राष्टÑवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी पदाचा राजीनामा दिला. केवळ जागावाटपाचे सूत्र अनधिकृतपणे जाहीर होताच, ही प्रतिक्रिया उमटली. सत्ताधारी भाजप-सेना युतीचे जागावाटप आणि उमेदवार यादी जाहीर झाल्यावर किती मोठी प्रतिक्रिया उमटेल, याची कल्पना केलेली बरी.याची पुरेपूर कल्पना पक्षश्रेष्ठींना असल्याने सावधपणे व गोपनीयता बाळगून युती-आघाडीची बोलणी सुरु आहे. अगदी राज्याचे लक्ष लागून असलेल्या मातब्बरांच्या मतदारसंघातही अद्याप लढती निश्चित झालेल्या नाहीत, यावरुन परिस्थिती किती नाजूक आहे, हे स्पष्ट होते.एकनाथराव खडसे यांच्याविरोधात कोण उभे राहणार हे अद्याप निश्चित नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे अपक्ष उभे राहतील काय? राष्टÑवादी कुणाला संधी देते? पाटील यांना पाठिंबा देते काय? जयकुमार रावळ यांच्या विरोधात संदीप बेडसे की, श्यामकांत सनेर? गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द विशाल देवकर, ज्ञानेश्वर महाजन, लकी टेलर की आणखी कोणी? डॉ.विजयकुमार गावीत यांच्याविरोधात कोण राहील? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.पुढच्या सोमवारी, ७ आॅक्टोबरला माघार आहे, तेव्हाच खरे चित्र स्पष्ट होईल. तोवर प्रत्येक पैलवान शड्डू ठोकून मैदानात जोर बैठका मारताना दिसेल.एकनाथराव खडसे यांच्याविरुध्द चंद्रकांत पाटील, रवींद्र पाटील हेच पारंपरिक प्रतिस्पर्धी राहतील का? जयकुमार रावल यांना पुन्हा संदीप बेडसे, श्यामकांत सनेर यांच्याशी मुकाबला करावा लागेल का? सलगपणे विजय मिळविणाऱ्या डॉ.विजयकुमार गावीत यांच्यासमोर प्रबळ उमेदवार देण्याचा शोध अद्याप संपलेला नाही. कुणाल वसावे, डॉ.राजेश वळवी यांच्यासोबत अ‍ॅड.पद्माकर वळवी यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्याने लढत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव