शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

मातब्बरांनाही स्पर्धकाविषयी उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:48 IST

एकनाथराव खडसे, जयकुमार रावल, डॉ.विजयकुमार गावीत, गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द उमेदवार कोण?, बंडखोरी, नाराजीनाट्य टाळण्यासाठी जागावाटप, अधिकृत उमेदवार यादीविषयी दिल्ली-मुंबईत घोळ

मिलिंद कुलकर्णीविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे चार दिवस शिल्लक असताना भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्टÑवादी यांच्यातील जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. जागावाटप नसल्याने अधिकृत उमेदवारांची यादीही लटकलेली आहे. शेवटच्या दिवशी ४ रोजी अधिकृत उमेदवाराच्या हाती थेट एबी फॉर्म दिला जाईल, असे वाटते. बंडखोरी, नाराजीनाट्य टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून ही खबरदारी बाळगली जात असली तरी मातब्बर नेत्यांविरोधात उमेदवार कोण हेदेखील अद्याप निश्चित झालेले नाही. लढतीची उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहणार असे दिसते.विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असली तरी युती आणि आघाडीचे जागावाटप सूत्र अद्याप जाहीर झालेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करायला चार दिवस उरलेले असताना अधिकृत उमेदवार यादीची प्रतीक्षा आहे.राजकीय वर्तुळातील चर्चा आणि त्याचे उमटलेले पडसाद लक्षात घेता काँग्रेस-राष्टÑवादीची आघाडी निश्चित झालेली आहे. खान्देशातील २० जागांपैकी काँग्रेस ९ तर राष्टÑवादी ११ जागा लढवेल, असे सूत्र आहे. जळगाव जिल्ह्यात रावेर आणि जळगाव शहर या दोन जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर धुळ्यात विद्यमान आमदार असलेल्या धुळे ग्रामीण, शिरपूर व साक्री या जागा तर नंदुरबार जिल्ह्यातील सर्व चार म्हणजे नंदुरबार, नवापूर, शहादा व अक्कलकुवा या जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील ९, धुळ्यातील धुळे शहर व शिंदखेडा अशा ११ जागा राष्टÑवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत.जागावाटप अधिकृत जाहीर झाले नसले तरी त्याची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्याने काँग्रेस व राष्टÑवादीमध्ये पडसाद उमटले. जळगावातील काँग्रेस भवनात नेते व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन रोष व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन कैफीयत मांडली. राष्टÑवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी पदाचा राजीनामा दिला. केवळ जागावाटपाचे सूत्र अनधिकृतपणे जाहीर होताच, ही प्रतिक्रिया उमटली. सत्ताधारी भाजप-सेना युतीचे जागावाटप आणि उमेदवार यादी जाहीर झाल्यावर किती मोठी प्रतिक्रिया उमटेल, याची कल्पना केलेली बरी.याची पुरेपूर कल्पना पक्षश्रेष्ठींना असल्याने सावधपणे व गोपनीयता बाळगून युती-आघाडीची बोलणी सुरु आहे. अगदी राज्याचे लक्ष लागून असलेल्या मातब्बरांच्या मतदारसंघातही अद्याप लढती निश्चित झालेल्या नाहीत, यावरुन परिस्थिती किती नाजूक आहे, हे स्पष्ट होते.एकनाथराव खडसे यांच्याविरोधात कोण उभे राहणार हे अद्याप निश्चित नाही. शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे अपक्ष उभे राहतील काय? राष्टÑवादी कुणाला संधी देते? पाटील यांना पाठिंबा देते काय? जयकुमार रावळ यांच्या विरोधात संदीप बेडसे की, श्यामकांत सनेर? गुलाबराव पाटील यांच्याविरुध्द विशाल देवकर, ज्ञानेश्वर महाजन, लकी टेलर की आणखी कोणी? डॉ.विजयकुमार गावीत यांच्याविरोधात कोण राहील? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.पुढच्या सोमवारी, ७ आॅक्टोबरला माघार आहे, तेव्हाच खरे चित्र स्पष्ट होईल. तोवर प्रत्येक पैलवान शड्डू ठोकून मैदानात जोर बैठका मारताना दिसेल.एकनाथराव खडसे यांच्याविरुध्द चंद्रकांत पाटील, रवींद्र पाटील हेच पारंपरिक प्रतिस्पर्धी राहतील का? जयकुमार रावल यांना पुन्हा संदीप बेडसे, श्यामकांत सनेर यांच्याशी मुकाबला करावा लागेल का? सलगपणे विजय मिळविणाऱ्या डॉ.विजयकुमार गावीत यांच्यासमोर प्रबळ उमेदवार देण्याचा शोध अद्याप संपलेला नाही. कुणाल वसावे, डॉ.राजेश वळवी यांच्यासोबत अ‍ॅड.पद्माकर वळवी यांच्या नावाची चर्चा सुरु झाल्याने लढत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.

टॅग्स :Jalgaonजळगाव