शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पॅनलला मतदान केले नाही म्हणून कुटुंबाला जाती बाहेर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 2:24 PM

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनलला मतदान केले नाही म्हणून एका कुटुंबाला जात पंचायतीच्या बाहेर काढल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे.

जळगाव - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनलला मतदान केले नाही म्हणून एका कुटुंबाला जात पंचायतीच्या बाहेर काढल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे. या घटनेमुळे तळवाडे येथील सरपंचसह 17 जणांवर जातपंचायतीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तळवाडे येथील शरद उखा पाटील यांनी मारवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की 25 मार्च 2019 रोजी तळवाडे ग्रामपंचायतीची निवडणूक झाली तेव्हा मी रामकृष्ण पाटील यांच्या पॅनलला मदत न करता युवराज फकीरा पाटील यांच्या पॅनलला मदत केली म्हणून माझेच नातेवाईक असलेले कौतिक तोताराम पाटील , सरपंच रामकृष्ण अभिमन पाटील , मनोहर श्रीराम पाटील , नाना श्रीराम पाटील , राजेंद्र विठ्ठल पाटील , श्रीराम महिपत पाटील , समाधान नाना पाटील , बापू मोतीराम पाटील , छोटू बापू  पाटील , किशोर नाना पाटील , अशोक श्रीराम पाटील , नंदलाल कौतिक पाटील , मगन रामदास पाटील, सुदाम अभिमन पाटील , लोटन अभिमन पाटील , हिम्मत अभिमन पाटील , शिवाजी अशोक पाटील , नामदेव कौतीक पाटील सर्व रा तळवाडे  यांना राग आल्याने सर्वांनी संमती करून मला जात समूहातून बाहेर काढले व आमच्या व मानवी हक्क व नैसर्गिक तत्वानुसार असलेले सर्व रोटी व बेटी व्यवहार बंद केल्याचा आरोप केला  तसेच सामाजिक व आर्थिक पिळवणूक केली शाळा, सामाजिक कार्यक्रम स्मशानभूमी , धार्मिक कार्यक्रम मिरवणूक आदी ठिकाणी सहभागी होण्यास प्रतिबंध केला आरोपींचे समाजविघातक वर्तन कुटुंबाला जीविताला व सामाजिक राहणीमानाला घातक ठरले आहे  तसेच इतर लोकांकडून व नातेवाईकांकडून बहिष्कार टाकला नुकताच भाऊबंदकीतील 6 मे रोजी झालेल्या विवाहात व 7 मे रोजी अक्षय्य तृतीयेला  शरद पाटील यांना बहिष्कृत केल्याचा अनुभव आला तसेच रामकृष्ण पाटील याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी 17 जंणाविरुद्ध  महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार पासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम 2016 चे कलम 3, 4, 5 ,6 , 7 प्रमाणे जातपंचायत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :Jalgaonजळगाव