शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

‘अमृत’ पाणी योजनेची संपली मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:33 PM

फक्त ४० टक्के काम पूर्र्ण : मनपाकडून होणार दंडात्मक कारवाई

जळगाव : ‘अमृत’ अंतर्गत शहरात सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची दोन वर्षाची मुदत १६ नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी संपुष्टात आली आहे. दोन वर्षात या योजेनेचे संपूर्ण काम होणे अपेक्षित होते. मात्र, केवळ ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. संथ कामामुळे मनपाकडून मक्तेदारावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी दिली.अमृत अंतर्गत शहरासाठी पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजना मंजूर आहे. त्यापैकी पाणी पुरवठा योजनेला २३ जून २०१६ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर १७ नोव्हेंबर २०१७ पासून अमृतच्या कामाला सुरुवात झाली होती. १६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ४० टक्केच काम पूर्ण झाले आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरु असल्याने मनपा प्रशासनाकडून मक्तेदाराला नोटीस देखील बजावण्यात आली होती. मात्र, कामात कोणतीही गती मिळाली नसल्याने आता पुन्हा वर्षभराची मुदतवाढ मनपा प्रशासनाकडून मक्तेदाराला देण्याची शक्यता आहे.जलवाहिन्यांचे काम ६० टक्केपाणी पुरवठा योजनेतंर्गत ६४४.३६ किमीच्या ११० मीमी ते ६०० मीमीच्या पाईपांव्दारे जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. आतापर्यंत डीआय प्रकारात एकूण ५७.९४ किमी पैकी २५.५० किमीचे काम पूर्ण झाले आहे. एच.डी.पी.आई प्रकारात ५८६ किमी पैकी ३६० किमीचे काम पूर्णअमृत पाणी पुरवठा योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. हे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र ते होवू शकलेले नाही. त्यामुळे संबधित मक्तेदारावर दंडात्मक कारवाई करून त्यांना मुदतवाढ दिली जाणार आहे. -डॉ.उदय टेकाळे, आयुक्त, मनपाआतापर्यंत पाणी पुरवठा योजनेचे काम ४० टक्के झाले आहे. कामात गती आणण्याची गरज आहे. दरम्यान, कामाची मुदत संपली असली तरी आता मुदतवाढ दिली जाणार आहे. कारवाईबाबत मनपा प्रशासन निर्णय घेवू शकते. -एस.व्ही.निकम, कार्यकारी अभियंता, मजिप्रा

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव