शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

उत्कंठावर्धक निवडणुकीची चाचणी रंगतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 16:03 IST

यंदाची लोकसभा निवडणूक उत्कंठावर्धक होणार आहे. मोदींच्या नावाची जादू कायम आहे काय?, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची कामगिरी कशी राहील? महत्त्वाकांक्षी प्रादेशिक नेत्यांच्या महाआघाडीचे भवितव्य काय? याची उत्तरे मिळणार आहेत.

मिलिंद कुळकर्णीलोकसभा निवडणुकीला एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे की, प्रत्येक राजकीय पक्ष ताक फुंकून पित आहे. भाजपाच्या विद्यमान चार खासदारांसह कोणत्याही पक्षाच्या एकाही उमेदवाराला तिकिटाची शाश्वती आजच्या घडीला नाही. मतदारसंघातील समीकरणे, इच्छुक उमेदवाराची बलस्थाने आणि कमकुवत दुवे, प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवाराची कामगिरी, मतदारसंघातील राजकीय घडामोडी यावर बारकाईने लक्ष ठेवून उमेदवार निश्चित केला जाईल. ही पहिली चाचणी रंगतदार अवस्थेत आहे.खान्देशातील चार जागांपैकी भाजपा-शिवसेना युतीअंतर्गत भाजपाकडे चारही जागा आहेत. काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीअंतर्गत धुळे, नंदुरबार काँग्रेसकडे तर जळगाव, रावेर राष्टÑवादी काँग्रेस पक्षाकडे आहेत. रावेरची जागा काँग्रेसला हवी आहे, तर नंदुरबारच्या जागेसाठी राष्टÑवादी काँग्रेस इच्छुक आहे. राज्यपातळीवर ज्या ८ जागांचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. बहुदा त्यात या दोन जागांचा समावेश असू शकतो. स्थानिक नेते प्रतिष्ठा पणाला किती लावतात त्यावर या जागा रोखणे वा खेचणे अवलंबून राहणार आहे.माझी उमेदवारी निश्चित आहे, असे कोणत्याही राजकीय पक्षाचा इच्छूक उमेदवार किंवा विद्यमान खासदार म्हणू शकत नाही, एवढ्या अटीतटीची आणि चूरसपूर्ण स्थिती लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दिसून येत आहे. २०१४ च्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक उत्कंठावर्धक होणार आहे, हे निश्चित असले तरी उमेदवारी निश्चितीची पहिली चाचणी एवढी रंगतदार होईल, अशी अपेक्षा नव्हती. पण तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि राफेलप्रकरणी सुरु झालेला वादंग पाहता प्रत्येक राजकीय पक्ष उमेदवारी निश्चितीपासूनच सावधता आणि सतर्कता बाळगत आहे.भाजपाने खूप गांभीर्याने ही निवडणूक घेतली आहे. खान्देशातील चारपैकी ए.टी.पाटील वगळता तिन्ही खासदार पहिल्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे अनुभवी आणि पहिल्यांदाच निवडून आलेल्या अशा चौघा खासदारांच्या कामगिरीचे अचूक आणि सखोल मूल्यमापन केले जात आहे. सहा महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणाचा कौल या खासदारांना सांगून काही सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचा काय परिणाम झाला, याची माहिती पक्षपातळीवर घेतली जात आहे. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, मातब्बर नेत्यांच्या नातलग असलेल्या रक्षा खडसे व डॉ.हीना गावीत आणि दुसऱ्यांदा निवडून आलेल्या ए.टी.पाटील यांना अद्याप पक्षाने उमेदवारीविषयी हिरवा कंदील दिलेला नाही. यापैकी काहींनी मुंबई आणि दिल्लीत शिष्टमंडळे पाठवून प्रयत्न चालविले आहेत.नंदुरबारात डॉ.हीना गावीत यांच्या उमेदवारीविषयी वेगवेगळ्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. मध्यंतरी त्या काँग्रेस पक्षात जातील, अशी चर्चा होती. आता राष्टÑवादी कॉंग्रेसकडून त्या निवडणूक लढवतील आणि त्यासाठी ही जागा कॉंग्रेसकडून मागण्याचा राष्टÑवादीचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरु आहे.पुढील विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन डॉ.विजयकुमार गावीत स्वगृही परतण्याचा विचार करु शकतात, त्याची सुरुवात लोकसभा निवडणुकीपासून होऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे. भाजपाने चार वर्षांत डॉ.गावीत यांना मंत्री केलेले नाही, हे त्यामागे कारण म्हटले जात आहे.डॉ.सुभाष भामरे यांच्यापुढे मालेगावमधील मतदान मिळविण्याचे मोठे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अमरीशभाई पटेल असल्याने मराठा समाजाची मते भामरेंकडे वळली. परंतु, यंदा रोहिदास पाटील हे उमेदवार असण्याची शक्यता असल्याने भामरे यांच्या मतांचे विभाजन होणार आहे. पुन्हा धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांचा उपद्रव हे मोठे आव्हान राहणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाला नव्या रणनीतीनुसार डॉ.भामरे यांना मैदानात उतरवावे लागणार आहे. भामरे यांच्या तुलनेत मातब्बर दुसरा उमेदवार पक्षात नसला तरी आयात उमेदवाराचा पर्याय हाताशी आहे.ए.टी.पाटील यांना तिसºयांदा उमेदवारी मिळण्यात अडचणी दिसून येत आहेत. मुळात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे पाठबळ कुणाला मिळते, यावर जळगावची उमेदवारी अवलंबून आहे.चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील, विधान परिषद सदस्य स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पाटील, निवृत्त अभियंता प्रकाश पाटील, बेटी बचाव अभियानाच्या प्रा.डॉ.अस्मिता पाटील असे अनेक इच्छुक भाजपाकडे आहेत. रावेरमध्ये निर्णय घेणे भाजपासाठी अवघड आहे. कारण या मतदारसंघावर खडसे यांचा असलेला प्रभाव पक्षाला विचारात घ्यावा लागेल. एकेका जागेसाठी प्रयत्न करायचे असल्याने ही जागा सहजसहजी जाऊ दिली जाणार नाही. त्यामुळे खडसे आणि पक्षश्रेष्ठींमध्ये काय चर्चा होते, त्यावर उमेदवारी अवलंबून आहे. स्वत: खडसे यांनी निवडणूक लढवावी, विधानसभेसाठी रक्षा खडसेंना उमेदवारी देऊ, अशा प्रस्तावाची चर्चा आहे. आमदार हरिभाऊ जावळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन ही नावे दावेदारांच्या यादीत आहेत.आघाडीत नंदुरबारला आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी, जळगावला राष्टÑवादीतर्फे अनिल भाईदास पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. रावेरविषयी कॉंग्रेस आग्रही असून डॉ.उल्हास पाटील हे दावेदार आहेत.खडसे, गावीतांकडे लक्षएकनाथराव खडसे काय निर्णय घेतात, यावर रावेरच्या जागेविषयी सर्वच पक्षांची रणनीती अवलंबून आहे. रक्षा खडसेंचे तिकीट निश्चित असल्याची ग्वाही भाजपाकडून मिळत असेल तर खडसे अन्य विचार करणार नाहीत, असा अंदाज आहे. तिकडे डॉ.विजयकुमार गावीत हे विधानसभा निवडणूक लक्षात घेत स्वगृही परतण्याचा विचार करु शकतात, हा एक अंदाज आहे. काँग्रेस नेते प्रथमच एकवटले आहेत.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव