शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

बेसुमार वाळू उपशामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:41 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : वाळू उपशाला कोठेही परवानगी नसताना जळगाव शहरासह जिल्हाभरात वाळूचा सर्रास उपसा होत असल्याने गिरणा नदीपात्राचे ...

विजयकुमार सैतवाल

जळगाव : वाळू उपशाला कोठेही परवानगी नसताना जळगाव शहरासह जिल्हाभरात वाळूचा सर्रास उपसा होत असल्याने गिरणा नदीपात्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सततच्या वाळू उपशामुळे नदीपात्राची खोली वाढत असून, रुंदीदेखील वाढत आहे. यामुळे परिसरातदेखील धोका निर्माण होत असून, पर्यावरणाचे होणारे हे नुकसान कधीही न भरुन निघणारे आहे, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.

पात्र रूंदावल्याने परिसरात पसरते पाणी

बेसुमार वाळू उपशामुळे गिरणा नदी पात्राची रुंदी व खोलीदेखील वाढत आहे. पात्रातील रुंदी जिल्ह्यात कोठे कमी-जास्त होते; मात्र सरासरी ३०० मीटर रुंदी असलेली रुंदी आता ३२० ते ३२५ मीटरपर्यंत वाढली असल्याचे चित्र आहे. पात्राची रुंदी वाढल्याने पावसाळ्यात नदीला पूर आला की नदीचे पाणी आजूबाजूला पसरून परिसरात धोका निर्माण होऊ पाहत आहे. अवैध वाळू उपशामुळे नदीपात्रही विस्कटले जात असून, त्यामुळे आजूबाजूच्या शेतात पावसाळ्यात नदीचे पाणी शिरते व शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसतो.

पोलीस व महसूल कर्मचारी तैनात

वाळू उपशाविरोधात आव्हाणे येथील शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर नदी परिसरात सीसी टीव्ही बसविण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात ते बसलेच नाहीत; मात्र आव्हाणे, निमखेडी परिसरात पोलीस व महसूल कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

वाळूच्या बेसुमार उपशामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यात नदीपात्राची रुंदी, खोली वाढून नदी पात्राच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. नदीची खोली वाढताना ती वेगवेगळ्या ठिकाणी कमी-अधिक असल्याने ही खोली जीवघेणी ठरत आहे. यासोबतच पाणी साठून न राहता दुष्काळाचे संकट उभे राहते.

- बाळकृष्ण देवरे, पर्यावरण तज्ज्ञ

बेसुमार वाळू उपशामुळे नदी पात्र तर धोक्यात येतच आहे, सोबतच शेतीलाही त्याचा फटका बसत आहे. एकतर पावसाळ्यात शेतात पाणी शिरण्याची भीती असते व वर्षभर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे शेतरस्तेही खराब होऊन शेतात जाणे कठीण होते.

- हर्षल चौधरी, शेतकरी.